शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

तब्बल बारा तास वीज गुल

By admin | Updated: May 18, 2016 02:00 IST

ऐन उन्हाळ्यात मध्यरात्री एक ते दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल १२ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रचंड उकाड्याने व डासांच्या त्रासाने नागरिक हैराण झाले

देहूगाव : ऐन उन्हाळ्यात मध्यरात्री एक ते दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल १२ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रचंड उकाड्याने व डासांच्या त्रासाने नागरिक हैराण झाले. यामुळे नागरिकांनी रात्र जागून काढली. यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयास टाळे ठोकले. महावितरणचा भोंगळ कारभाराचा फटका हा वारंवार नागरिकांना बसत आहे. समस्यांचा पाढाच मंगळवारी पुन्हा ग्रामस्थांनी या अधिकाऱ्यांच्या पुढे वाचत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अशा विविध समस्यांबाबत ‘लोकमत’ने मागील आठवड्यात वृत्तमालिका प्रसिद्ध केली.वीज पुरवठ्यामुळे पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला असल्याने येथील नागरिक हैराण झाले होते. तब्बल १२ तासांनतर तात्पुरत्या स्वरूपात चेंज ओव्हर घेऊन हा पुरवठा सुरळीत करण्यात आला. विद्युतपुरवठा खंडित होऊन १० तास उलटले, तरी वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने सरपंच हेमा मोरे यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले. या वेळी उपसरपंच सचिन साळुंके, हेमलता काळोखे, सुनीता टिळेकर, संतोष हगवणे, दिनेश बोडके, राणी मुसुडगे, संभाजी बाळसराफ उपस्थित होते.सोमवार रात्री सुमारे एकच्या सुमारास तळवडे येथे विद्युतपुरवठा खंडित झाल्याने त्याचा परिणाम स्वरूप देहू-आळंदी रस्त्यावर देहू इंजिनिअरिंग कंपनीच्या जवळ तांत्रिक दोष निर्माण झाला होता. मात्र तळवडे हद्दीतील दोष दुरुस्त करून तेथील विद्युतपुरवठा पहाटेच सुरळीत करण्यात आला होता. मात्र देहूगावचा विद्युतपुरवठा १० वाजले, तरी सुरळीत झाला नव्हता. यामुळे आज गावात पिण्याचे पाणी येऊ शकले नाही. तर नागरिकांना रात्री एकपासून घरातील एसी, एअर कुलर, पंखे बंद राहिल्याने डासांसह प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याने प्रतिसाद न दिल्याने चिडलेल्या सरपंच मोरे व उपसरपंच साळुंके, सदस्य, ग्रामस्थांनी थेट कार्यालयच गाठले. तेथे त्यांना कोणीही अधिकारी न भेटल्याने वरिष्ठाशी संपर्क करून देहूकरांच्या समस्या ताबडतोब सोडवाव्यात, अशी मागणी करीत भेट देण्याची मागणी केली. त्याशिवाय हे टाळे खोलणार नाही असा पवित्रा घेतला. (वार्ताहर)निगडी प्राधिकरण कार्यालयाचे उपअभियंते गुजर हे तातडीने देहूत दाखल झाले. त्यांनी समस्या ऐकून घेत आठ दिवसांत या समस्यांवर कायमस्वरूपी मार्ग काढण्याची ग्वाही दिली. यानंतर कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले. गुजर यांनी समस्यांवर कायमचा तोडगा काढण्यासाठी येत्या आठवड्यात स्विचिंग स्टेशन सुरू करू. त्याचप्रमाणे वीज बिले वेळेवर व अचूक रिडिंग घेऊन वेळेत वाटप करण्यासंदर्भात संबंधितांना सूचनाही दिल्या आहेत. येथील कनिष्ठ अभियंता मोहनन यांनी ग्रामस्थांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी, अशा सूचनाही केल्या आहेत.