शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही बारावी प्रवेश ऑफलाइन होणार; ऑनलाइनचा मुहूर्त नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 06:46 IST

२०२०-२१ चे बारावीचे प्रवेश महाविद्यालयीन स्तरावर राबविण्याच्या प्रक्रियेस उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत

मुंबई : अकरावीत पाहिजे त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही म्हणून अनेक विद्यार्थी बारावीत महाविद्यालय बदलतात. मात्र ही प्रक्रिया ऑफलाइन होत असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो. परिणामी ही प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा मानस शिक्षण विभाग दरवर्षी व्यक्त करत असला तरी अद्याप या प्रक्रियेबाबत शासनस्तरावर कोणत्याही हालचाली सुरू झाल्या नाहीत. परिणामी, यंदाही हे प्रवेश ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहेत.यामुळे २०२०-२१ चे बारावीचे प्रवेश महाविद्यालयीन स्तरावर राबविण्याच्या प्रक्रियेस उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये अकरावीत मुले नापास होतात किंवा काही कारणांमुळे महाविद्यालय सोडून जातात. परिणामी तेथेही बारावीसाठी काही जागा रिक्त होतात. त्यामुळे त्या जागांवर प्रवेश प्रक्रिया पार पडते. अकरावी आॅनलाइनमध्ये आपल्याला पाहिजे ते महाविद्यालय मिळाले नाही म्हणून सुमारे ३० टक्के विद्यार्थी बारावीच्या या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होत असल्याची माहिती दरवर्षीच्या प्रवेशावरून समोर आली आहे.ही सर्व प्रक्रिया आॅफलाइनच होत असल्यामुळे येथे अनेक आर्थिक व्यवहार होतात. त्यामुळे अकरावी प्रवेश आॅनलाइन करण्याच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. त्यामुळे मागील चार वर्षांपासून ही प्रक्रिया आॅनलाइन करण्याची मागणी होत असूनही शिक्षण विभागाकडून मात्र याला केराची टोपली दाखवल्याचा आरोप शिक्षण संघटनांकडून होत आहे.विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या ठिकाणाहून महाविद्यालय लांब असणे, पालकांची बदली होणे, वैद्यकीय कारणास्तव घराजवळील परिसरात कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळणे, विद्यार्थ्यांचा राहण्याचा पत्ता बदलणे, शाखा बदलणे अशा कारणांसाठी विद्यार्थ्यांना बारावीत महाविद्यालय बदलण्याची संधी मिळते. आता यामुळे महाविद्यालये बदलणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत भर पडणार आहे. त्यामुळे अकरावी आॅनलाइन प्रवेश नावालाच उरण्याची शक्यता आहे.अकरावी प्रवेशाची गुरुवारपर्यंतची माहितीनोंदणी केलेले विद्यार्थी259348अर्ज पडताळणी झालेले विद्यार्थी214087पसंतीक्रम भरलेले विद्यार्थी84146अर्ज लॉक केलेले विद्यार्थी218531

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या