शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
2
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
3
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
4
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
5
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
6
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
8
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
9
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
10
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
11
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
12
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
13
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
14
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
15
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
16
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
17
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
18
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
19
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
20
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 

दोनशे कोटींची उलाढाल ठप्प

By admin | Updated: February 27, 2015 23:17 IST

उद्योग बंदचा फटका : उद्योजकांच्या नाराजीत वाढ; तीव्र आंदोलनाचा इशारा

कुपवाड : महावितरणकडून करण्यात आलेल्या ३५ टक्के वीज दरवाढीच्या निषेधार्थ आज (शुक्रवारी) औद्योगिक वसाहतीमधून कडकडीत बंद पाळण्यात आला. इतर राज्यांच्या तुलनेत ही वाढ दुप्पट असल्याने उद्योजकांच्या नाराजीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळेच या औद्योगिक बंदला उद्योजकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदमुळे सांगली परिसरातील औद्योगिक वसाहतींमधून सुमारे दोनशे कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. औद्योगिक घटकासाठी शासनाकडून यापूर्वी ७०६ कोटीचे अनुदान देण्यात येत होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान दिले गेले. त्यानंतर नव्याने सत्तेवर आलेल्या भाजप शासनाने हे अनुदान बंद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. त्यामुळे महावितरण कंपनीने महसुली तूट भरून काढण्यासाठी औद्योगिक घटकासाठी २१ टक्के दरवाढ केली. या दरवाढीमुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. या दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन झाल्यानंतर शासनाने तात्पुरते अनुदान देऊन आंदोलन शांत केले. परंतु, अचानक पुन्हा महावितरणकडून ३१ टक्के दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगास सादर करण्यात आला आहे. ही वाढही पुढील महिन्यापासून लागू होणार असल्यामुळे उद्योजकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. राज्यभर आज आंदोलने झाली.जिल्ह्यातही सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कृष्णा व्हॅली चेंबर, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत, वसंतदादा औद्योगिक वसाहत, वाळवा चेंबर आॅफ कॉमर्स, संजय इंडस्ट्रीयल इस्टेट आदी औद्योगिक वसाहतींनी उद्योग बंद ठेवून शासनाच्या या निर्णयाचा निषेध केला. उद्योग बंदला औद्योगिक वसाहतीमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदमुळे सांगली परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील सुमारे दोनशे कोटीहून अधिक उलाढाल ठप्प झाली आहे. ही दरवाढ शासनाने मागे न घेतल्यास संघटनांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)महाराष्ट्राची चुकीच्या दिशेने वाटचालवीज दर कमी झाल्याशिवाय ‘मेक इन महाराष्ट्र’चे स्वप्न साकार होणार नाही. उद्योग वाढीसाठी व इतर राज्यांशी स्पर्धा करण्यासाठी वीज दरही कमी असावे लागतात. अच्छे दिनची अपेक्षा बाळगलेल्या उद्योजकांना वाईट वागणूक मिळत आहे. मुख्यमंत्र्यांची वाटचाल महाराष्ट्र मोडण्याच्या दिशेने सुरू आहे. ही वाढ कमी न झाल्यास यापुढील कालावधित कामगारांना घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत, असे मत सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, कृष्णा व्हॅलीचे माजी उपाध्यक्ष सतीश मालू यांनी व्यक्त केले.महावितरणने देशात सर्वाधिक दरवाढ केल्यामुळे उद्योजकांचे कंबरडेच मोडणार आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी कुपवाड एमआयडीसीमधील ७५ टक्के उद्योग बंद होते. बंदमुळे शंभर कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. ही दरवाढ कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार आहोत.- शिवाजी पाटील, अध्यक्ष, कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स, कुपवाडभ्रष्टाचार लपविण्यासाठी महावितरणने ही दरवाढ केली आहे. या दरवाढीमुळे इतर राज्यांच्या उत्पादनांशी उद्योजक स्पर्धा करू शकत नाहीत. यामुळे उद्योग बंद पडतील. महाराष्ट्र देशात अग्रेसर होणार नाही. म्हणून ही दरवाढ मागे घ्यावी.- डी. के. चौगुले, उपाध्यक्ष, कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स, एमआयडीसी, कुपवाड.