शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

चराईबंदीमुळे मेंढपाळ अडचणीत

By admin | Updated: July 18, 2014 00:58 IST

मेंढीपालन हा धनगर समाजाचा पिढीजात व्यवसाय आहे. त्यांचा उदरनिर्वाहच या व्यवसायावर आहे. मात्र वनविभागाने त्यांना चाराबंदी केल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे.

मेंढपाळांचा सवाल : ११ लाख मेंढ्यांच्या चराईचा प्रश्न, मोफत पासेसला वनविभागाचा ब्रेकरूपेश उत्तरवार - यवतमाळ मेंढीपालन हा धनगर समाजाचा पिढीजात व्यवसाय आहे. त्यांचा उदरनिर्वाहच या व्यवसायावर आहे. मात्र वनविभागाने त्यांना चाराबंदी केल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे आता जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. आम्हाला न्याय द्या अन्यथा आमच्या हातात बंदुका देवून नक्षलवादी बनण्याची परवानगी द्या अशी लेखी मागणी मेंढपाळ अन्याय निवारण समितीने वनविभागाकडे केली आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये १० हजार मेंढपाळ आहेत. त्यांच्याकडे ११ लाख मेंढ्या आहेत. कोरड्या दुष्काळाने या मेंढपाळांपुढे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मेंढ्या चराईसाठी वनविभागाने बंदी घातली आहे. मेंढी चराईसाठी आरक्षित वनजमीन वन्यप्राण्यासाठी आरक्षित करण्यात आली आहे. मेंढ्यांना चराई करण्यासाठी क्षेत्रच शिल्लक राहीले नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात मेंढ्या चारायच्या कुठे? असा गंभीर प्रश्न मेंढपाळांपुढे निर्माण झाला आहे. संपूर्ण राज्यातच मेंढी चराईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. राज्यात ४८ वन विभाग आहेत. पैकी २७ विभागात मेंढी चराईला बंदी घालण्यात आली आहे. २१ पैकी काही जिल्ह्यात अंशत: परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी वनविभाग सप्टेंबर ते मे पर्यंत मेंढी चराईच्या पासेस देतात. विदर्भात वनविभागाने चराईसाठी मोेजके क्षेत्र आरक्षित केले आहे. त्यावर एक हजार मेंढ्यांना चारा पास मिळण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात तीन लाख मेंढ्यांना चाऱ्यास मुकावे लागणार आहे. पावसाळ्यात शेतजमिनी रिकाम्या नसतात. अशा स्थितीत मेंढ्यांना वाचवायचे कसे ? असा गंभीर पेच त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. परंपरागत मेंढीव्यवसाय भुईसपाट होण्याचा धोका आहे. यामुळे त्यांचे उपजिविकेचे साधनच हिरावल्या जाणार आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर मेंढपाळ आता आक्रमक झाले आहेत. हातात बंदूका देण्यासाठी वनविभागाला परवानगी मागितली आहे. यामुळे वनविभाग हादरला असून मेंढपाळ आणि वनविभागात ठिणगी पडण्याचे संकेत आहेत. याप्रकरणी वनविभागाने मात्र आपले हात वर केले आहेत.मेंढपाळांची मुले शाळाबाह्यरानावनात राहणाऱ्या मेंढपाळांची मुले शाळेत जात नाही. त्यामुळे ही मुले शाळाबाह्य झाली आहेत. त्यांच्यासाठी वस्तीशाळा सुरू करण्याकरिता शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.