शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
4
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
5
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
6
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
7
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
8
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
9
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
10
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
11
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
12
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
13
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
14
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
15
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
16
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
17
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
18
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
19
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
20
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करा”; तृप्ती देसाईंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 17:12 IST

Maharashtra News: साईबाबांना देव मानत नसतील तर धीरेंद्र शास्त्रींना महाराज म्हणायची काहीच गरज नाही, या शब्दांत तृप्ती देसाई यांनी टीका केली.

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांवरून बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. यानंतर बागेश्वर बागेश्वर बाबा यांनी आता कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा यांनाच देव मानण्यास नकार दिला आहे. यातच साईबाबांवर केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. यातच आता भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

साईबाबांची पूजा केली पाहिजे की नाही? असा प्रश्न बागेश्वर बाबा यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना बागेश्वर बाबा म्हणाले की, गिधाडाचे चामडे पांघरून कोणी सिंह होत नाही, असे विधान केले. तसेच शंकराचार्यांनी साई बाबांना देवाचे स्थान दिलेले नाही. साई बाबा संत असू शकतात. फकिर असू शकतात. पण ते देव होऊ शकत नाही, असे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्पष्टपणे सांगितले. यानंतर आता तृप्ती देसाई आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

तुमचा सनातन धर्म कोणता आहे? आणि तो साईबाबांना देव का मानत नाही?

धीरेंद्र शास्त्रीजी, साईबाबा हे कोट्यवधी भक्तांसाठी देवच आहेत. तुमचा सनातन धर्म कोणता आहे? आणि तो साईबाबांना देव का मानत नाही? हे मला माहिती नाही. परंतु जे लाखो भक्त साईबाबांना देव मानतात, त्यांची श्रद्धा दुखावली आहे. तुम्ही त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ते साईबाबांना देव मानत नसतील तर धीरेंद्र शास्त्रींना महाराज म्हणायची काहीच गरज नाही. ते आधीच जोकरसारख्या टाळ्या वाजवत असतात. मध्येच हसत असतात. पण आम्ही तुम्हाला जोकर म्हणणार नाही. कारण आमचा धर्म आम्हाला असे काही शिकवत नाही. आम्ही माणुसकी हाच धर्म मानतो. तो धर्म आम्हाला कुणाच्यात भेदभाव करायला शिकवत नाही. त्यामुळे तुम्ही तातडीने साईभक्तांची माफी मागितली पाहिजे. धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आपल्या शंकराचार्यांनी साई बाबांना देवाचे स्थान दिलेले नाही. शंकराचार्यांचे म्हणणे हे बंधनकारक आहे. प्रत्येक सनातनी धर्माने शंकराचार्यांचे ऐकले पाहिजे. कारण शंकराचार्य हे धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणताही संत असतील, मग ते आपल्या धर्माचा का असेना, ते देव होऊ शकत नाहीत. कोणतेही संत असू द्या, मग गोस्वामी तुलसीदास असो, सूरदास असो हे सर्व संत आहेत. काही महापुरुष आहेत. काही युगपुरुष आहेत. काही कल्प पुरुष आहेत. परंतु यात कोणीही देव नाही. आम्ही कुणाच्याच भावनेचा अपमान करत नाही, असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Trupti Desaiतृप्ती देसाईbageshwar dhamबागेश्वर धाम