शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

सासरच्या छळाला कंटाळून महिलेचा मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: October 1, 2016 18:54 IST

एकापाठोपाठ दोन मुलींच झाल्याच्या कारणाववरुन सासरच्या मंडळीकडून होणा-या त्रासाला कंटाळून २२ वर्षिय विवाहितेने स्वत:च्या दोन मुलींना विष पाजले.

 ऑनलाइन लोकमत 

औरंगाबाद, दि. १ -  एकापाठोपाठ दोन मुली झाल्याच्या कारणावरुन सासरच्या मंडळीकडून होणा-या त्रासाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने स्वत:च्या ४ आणि २ वर्ष वयाच्या मुलींना विष पाजले आणि स्वत:ही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास औरंगाबाद तालुक्यातील महालपिंप्री येथे घडली. 
विवाहितेसह तिच्या दोन्ही मुलींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  निता सतिश भोळे (२२) , दिव्या सतीश भोळे(४) आणि दिप्ती सतीश भोळे(२)अशी मायलेकींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पोलिस आणि निताच्या नातेवाईकांनी सांगितले की, सहा वर्षापूर्वी महालपिंप्री येथे राहणा-या सतीशचा विवाह झाला. 
निताचे आईवडिल औरंगाबादेतील प्रकाशनगर येथे राहतात. ते मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. निताला दिव्या आणि दिप्ती या दोन मुली आहेत. लग्नानंतर माहेरून पैसे आणावे, म्हणून तिचा पती तिला सतत शिवीगाळ करीत मारहाण करायचा. तिने दोन मुलींना जन्म दिल्यापासून तर त्यांच्याकडून होणारा त्रास अधिक वाढला. 
हा त्रास असह्य झाल्याने नीताने शनिवारी सकाळी आत्महत्येचा निर्णय घेतला. मात्र आपल्या पश्चात आपल्या चिमुकल्यांचे काय होईल, या चिंतेपोटी तिने प्रथम दोन्ही चिमुकलींना विषाचा घोट दिला आणि नंतर स्वत:ही विष प्राशन केले. ही बाब तिच्या पतीसह सासरच्या मंडळींच्या लक्षात येताच त्यांनी दिव्या, दिप्ती आणि नीता यांना एका वाहनातून तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद चिकलठाणा पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे. याविषयी माहिती देताना चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, निताचा जबाब अद्याप झालेला नाही. त्यामुळे नेमकी ही घटना कशी घडली,याबाबतचा उलगडा होऊ शकला नाही.