शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीचा होतोय खेळखंडोबा

By admin | Updated: April 4, 2017 01:44 IST

मुंबई-बंगळुरू महामार्गावर पुनावळे ते किवळे रस्त्याच्या दरम्यान महामार्गाची दुरवस्था झाली

रावेत : मुंबई-बंगळुरू महामार्गावर पुनावळे ते किवळे रस्त्याच्या दरम्यान महामार्गाची दुरवस्था झाली असून, महामार्गावरील रुंदीकरण आणि दुरुस्तीचे कामे रखडल्याने वाहतुकीचा खेळ खंडोबा होत असल्याचे चित्र आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी सेवा रस्त्यांची दैना झाल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब बनली आहे. यातच या महामार्गावर पवना नदी पात्रावरील सेवा रस्त्यावरील दोन नवीन पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाल्याने काही प्रमाणात वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या पुलावर असणारे संरक्षक कठडे अपूर्ण अवस्थेत असताना प्रशासनाने मात्र रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कोठेही फलक लावले गेले नाहीत. पुनावळे ते किवळेदरम्यान सेवा रस्ता संपूर्ण उखडला आहे. मुकाई चौक ते पुनावळेदरम्यान ठिकठिकाणी सेवा रास्त्याची अत्यंत वाईट अवस्था आहे. याचदरम्यान ऐन महामार्गावर ठिकठिकाणी अनधिकृतपणे मोठी अवजड वाहने उभी असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे. पुनावळे ते किवळेदरम्यान ठिकठिकाणी अनधिकृत वाहनतळ थाटण्यात आली आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग नियमानामध्ये महामार्गावर अशाप्रकारे वाहने पार्किं ग करण्याचा अधिकार नसून हे सर्व नियमबाह्य आहे. आणि याचा मोठा अडथळा वाहतुकीला होत आहे. त्यातच रस्त्याच्या मधोमध आणि कडेला लावण्यात आलेल्या संरक्षक बॅरिकेट ठिकठिकाणी तुटले आहेत तर काही ठिकाणचे गायब झाले आहेत. नागरिक स्वत:चा जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडतात. त्यामुळे काहीवेळा अपघात घडून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील काही महिन्यांपासून अनेक ठिकाणी रस्त्याच्या, पुलाच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. परंतु अद्याप हे काम पूर्ण झाले नसल्याने येथे सर्वांची फरफट सुरू आहे. त्यातच या पतिसरात दोनही बाजूंचे सेवा रस्ते या कामामुळे उचकटल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील कामाचे सर्व साहित्य राडारोडा सेवा रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा होत आहे. या दरम्यान, दिशादर्शक फलकांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे कोणता रस्ता कोणीकडे जातो हे वाहनचालकांना लक्षात येत नाही. आवश्यक त्या ठिकाणी पथदिवे, रिफ्लेकटर बसविणे आवश्यक असताना येथे मात्र याचा अभाव दिसून येतो. (वार्ताहर)>तुटलेले कठडे : अपघाताची शक्यता रावेतच्या पवना नदीवरील पुलाचे कठडे अनेक ठिकाणी तुटल्याने येथील वाहतूक धोकादायक झाली आहे. अनेकवेळा येथे किरकोळ अपघात घडले आहेत. तर नव्याने बांधण्यात आलेल्या सेवा रस्त्यावरील पुलावर कठडे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास सरळ नदीपात्रात वाहन जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे.