शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीचा होतोय खेळखंडोबा

By admin | Updated: April 4, 2017 01:44 IST

मुंबई-बंगळुरू महामार्गावर पुनावळे ते किवळे रस्त्याच्या दरम्यान महामार्गाची दुरवस्था झाली

रावेत : मुंबई-बंगळुरू महामार्गावर पुनावळे ते किवळे रस्त्याच्या दरम्यान महामार्गाची दुरवस्था झाली असून, महामार्गावरील रुंदीकरण आणि दुरुस्तीचे कामे रखडल्याने वाहतुकीचा खेळ खंडोबा होत असल्याचे चित्र आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी सेवा रस्त्यांची दैना झाल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब बनली आहे. यातच या महामार्गावर पवना नदी पात्रावरील सेवा रस्त्यावरील दोन नवीन पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाल्याने काही प्रमाणात वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या पुलावर असणारे संरक्षक कठडे अपूर्ण अवस्थेत असताना प्रशासनाने मात्र रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कोठेही फलक लावले गेले नाहीत. पुनावळे ते किवळेदरम्यान सेवा रस्ता संपूर्ण उखडला आहे. मुकाई चौक ते पुनावळेदरम्यान ठिकठिकाणी सेवा रास्त्याची अत्यंत वाईट अवस्था आहे. याचदरम्यान ऐन महामार्गावर ठिकठिकाणी अनधिकृतपणे मोठी अवजड वाहने उभी असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे. पुनावळे ते किवळेदरम्यान ठिकठिकाणी अनधिकृत वाहनतळ थाटण्यात आली आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग नियमानामध्ये महामार्गावर अशाप्रकारे वाहने पार्किं ग करण्याचा अधिकार नसून हे सर्व नियमबाह्य आहे. आणि याचा मोठा अडथळा वाहतुकीला होत आहे. त्यातच रस्त्याच्या मधोमध आणि कडेला लावण्यात आलेल्या संरक्षक बॅरिकेट ठिकठिकाणी तुटले आहेत तर काही ठिकाणचे गायब झाले आहेत. नागरिक स्वत:चा जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडतात. त्यामुळे काहीवेळा अपघात घडून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील काही महिन्यांपासून अनेक ठिकाणी रस्त्याच्या, पुलाच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. परंतु अद्याप हे काम पूर्ण झाले नसल्याने येथे सर्वांची फरफट सुरू आहे. त्यातच या पतिसरात दोनही बाजूंचे सेवा रस्ते या कामामुळे उचकटल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील कामाचे सर्व साहित्य राडारोडा सेवा रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा होत आहे. या दरम्यान, दिशादर्शक फलकांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे कोणता रस्ता कोणीकडे जातो हे वाहनचालकांना लक्षात येत नाही. आवश्यक त्या ठिकाणी पथदिवे, रिफ्लेकटर बसविणे आवश्यक असताना येथे मात्र याचा अभाव दिसून येतो. (वार्ताहर)>तुटलेले कठडे : अपघाताची शक्यता रावेतच्या पवना नदीवरील पुलाचे कठडे अनेक ठिकाणी तुटल्याने येथील वाहतूक धोकादायक झाली आहे. अनेकवेळा येथे किरकोळ अपघात घडले आहेत. तर नव्याने बांधण्यात आलेल्या सेवा रस्त्यावरील पुलावर कठडे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास सरळ नदीपात्रात वाहन जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे.