शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

वाहतुकीचा होतोय खेळखंडोबा

By admin | Updated: April 4, 2017 01:44 IST

मुंबई-बंगळुरू महामार्गावर पुनावळे ते किवळे रस्त्याच्या दरम्यान महामार्गाची दुरवस्था झाली

रावेत : मुंबई-बंगळुरू महामार्गावर पुनावळे ते किवळे रस्त्याच्या दरम्यान महामार्गाची दुरवस्था झाली असून, महामार्गावरील रुंदीकरण आणि दुरुस्तीचे कामे रखडल्याने वाहतुकीचा खेळ खंडोबा होत असल्याचे चित्र आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी सेवा रस्त्यांची दैना झाल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब बनली आहे. यातच या महामार्गावर पवना नदी पात्रावरील सेवा रस्त्यावरील दोन नवीन पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाल्याने काही प्रमाणात वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या पुलावर असणारे संरक्षक कठडे अपूर्ण अवस्थेत असताना प्रशासनाने मात्र रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कोठेही फलक लावले गेले नाहीत. पुनावळे ते किवळेदरम्यान सेवा रस्ता संपूर्ण उखडला आहे. मुकाई चौक ते पुनावळेदरम्यान ठिकठिकाणी सेवा रास्त्याची अत्यंत वाईट अवस्था आहे. याचदरम्यान ऐन महामार्गावर ठिकठिकाणी अनधिकृतपणे मोठी अवजड वाहने उभी असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे. पुनावळे ते किवळेदरम्यान ठिकठिकाणी अनधिकृत वाहनतळ थाटण्यात आली आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग नियमानामध्ये महामार्गावर अशाप्रकारे वाहने पार्किं ग करण्याचा अधिकार नसून हे सर्व नियमबाह्य आहे. आणि याचा मोठा अडथळा वाहतुकीला होत आहे. त्यातच रस्त्याच्या मधोमध आणि कडेला लावण्यात आलेल्या संरक्षक बॅरिकेट ठिकठिकाणी तुटले आहेत तर काही ठिकाणचे गायब झाले आहेत. नागरिक स्वत:चा जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडतात. त्यामुळे काहीवेळा अपघात घडून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील काही महिन्यांपासून अनेक ठिकाणी रस्त्याच्या, पुलाच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. परंतु अद्याप हे काम पूर्ण झाले नसल्याने येथे सर्वांची फरफट सुरू आहे. त्यातच या पतिसरात दोनही बाजूंचे सेवा रस्ते या कामामुळे उचकटल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील कामाचे सर्व साहित्य राडारोडा सेवा रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा होत आहे. या दरम्यान, दिशादर्शक फलकांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे कोणता रस्ता कोणीकडे जातो हे वाहनचालकांना लक्षात येत नाही. आवश्यक त्या ठिकाणी पथदिवे, रिफ्लेकटर बसविणे आवश्यक असताना येथे मात्र याचा अभाव दिसून येतो. (वार्ताहर)>तुटलेले कठडे : अपघाताची शक्यता रावेतच्या पवना नदीवरील पुलाचे कठडे अनेक ठिकाणी तुटल्याने येथील वाहतूक धोकादायक झाली आहे. अनेकवेळा येथे किरकोळ अपघात घडले आहेत. तर नव्याने बांधण्यात आलेल्या सेवा रस्त्यावरील पुलावर कठडे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास सरळ नदीपात्रात वाहन जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे.