शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 23:30 IST

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकऱ्यांचे नेते डाॅ. बाबा आढाव यांचे सोमवारी रात्री निधन झाले.

Baba Adhav Passes Away: सत्यशोधक समाजवादी विचारांचे खंदे समर्थक, असंघटित मजुरांचे आधारस्तंभ आणि एक गाव एक पाणवठा चळवळीचे प्रणेते डॉ. बाबा आढावयांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचे निधन महाराष्ट्राच्या सामाजिक आणि परिवर्तनवादी इतिहासातील एका महत्त्वाच्या पर्वाचा शेवट मानला जात आहे. हमाल, मजूर, कष्टकरी आणि लाखो वंचितांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी बाबा आढाव यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या निधनानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.

कोण होते बाबा आढाव? 

बाबासाहेब पांडूरंग आढाव यांचा जन्म १ जून १९३० रोजी पुण्यात झाला. पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर असूनही, त्यांचे मन पूर्णपणे समाजवादी विचारसरणीकडे झुकलेले होते. लहानपणापासून राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारात वाढलेल्या बाबा आढाव यांनी आपले संपूर्ण जीवन संघर्ष आणि परिवर्तनासाठी वेचले. सार्वजनिक संघर्षाचा त्यांचा पहिला निर्णायक टप्पा १९५२ च्या दुष्काळात आला, जेव्हा त्यांनी धान्याच्या वाढत्या किमती आणि तुटपुंज्या शिधावाटपाविरोधात सत्याग्रह केला.

त्यांनी १९५५ मध्ये हमाल पंचायतीची स्थापना केली. ही असंघटित कामगारांना संघटित करण्याची देशातील एक मोठी चळवळ ठरली. दोन दशकांच्या संघर्षानंतर १९६९ साली राज्यात 'महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि असंघटित कामगार कायदा' लागू झाला. भारतातील असंघटित मजुरांसाठीचा हा पहिला संरक्षक कायदा होता, ज्यामुळे हमालांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर हक्कांची हमी मिळाली.

'कष्टाची भाकर' योजना

२ ऑक्टोबर १९७४ रोजी त्यांनी 'कष्टाची भाकर' योजना सुरू केली, ज्यामुळे हमाल समूहाला स्वस्तात पौष्टिक अन्न उपलब्ध झाले. ही योजना पुढे श्रमिक कल्याणाचे एक मॉडेल ठरली.

'एक गाव एक पाणवठा' चळवळ

जातीय व्यवस्थेवर थेट प्रहार करत त्यांनी ही चळवळ उभी केली. दलितांना पाण्याचा समान अधिकार मिळवून देत, सार्वजनिक विहिरी सर्वांसाठी खुल्या करण्याचा सामाजिक समतेचा पाया त्यांनी रचला. अंधश्रद्धाविरोधी लढा, रिक्षा पंचायत, कागद-काचा वेचणाऱ्यांची संघटना आणि ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी यांसारख्या अनेक जनआधारित व अहिंसात्मक आंदोलनांसाठी त्यांची ओळख होती.

राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

बाबा आढाव यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

"वंचित आणि असंघटित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. हमाल पंचायत, एक गाव-एक पाणवठा असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. त्यांचे विचार येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"भूमिका घेताना प्रस्थापित व्यवस्थेच्या रोषाची तमा न बाळगणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये डॉ. बाबा आढाव यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. त्यांची उणीव सदैव भासत राहील, " अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

"सामाजिक न्यायाचे एक मजबूत आधारस्तंभ आणि एक महान कामगार नेते बाबा आढाव जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचित, शोषित आणि कामगार वर्गाच्या हक्कांसाठी समर्पित केले. पुण्यातून निघालेल्या त्यांच्या संघर्षाच्या ज्योतीने देशभर सामाजिक न्यायाचा मार्ग उजळवला," असं राहुल गांधी म्हणाले.

"श्रमिक, कष्टकरी, दुर्बळ आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर झटणारा महान संघर्षयोद्धा आज हरपला. त्यांनी संघर्षमय जीवन जगत प्रत्यक्ष कामातून समाजवादाची मूर्त प्रतिमा उभी केली," असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं.

"बाबा, माझ्यासह अनेकांसाठी प्रेरणास्रोत होते. त्यांनी शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा, सत्यशोधकी विचारांचा मार्ग अधिक प्रशस्त केला. त्यांच्या जाण्याने सामाजिक चळवळींच्या अवकाशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे," असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बाबा आढाव यांचे संपूर्ण कार्य म्हणजे सामाजिक न्याय आणि तळागाळातील माणसाच्या सन्मानासाठी दिलेले निर्भीड आणि ज्वलंत आयुष्य होते.

टॅग्स :Baba Adhavबाबा आढावSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधी