शहरं
Join us  
Trending Stories
1
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
2
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
3
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
4
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
5
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
6
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
7
धक्कादायक! प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या; मनोरंजन विश्वात खळबळ
8
खळबळजनक! वहिनीचं भयंकर 'सरप्राईज गिफ्ट'; नणंदेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तव्याने केले ५० वार
9
IND vs SA: टी२० मध्ये सुपरफास्ट ४००० धावा, तिलक वर्माचा नवा विक्रम, विराटलाही टाकलं मागं!
10
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
11
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
12
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
13
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
14
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
15
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
16
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
17
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
18
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
19
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
20
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात हिंदीची सक्ती होणार का? नरेंद्र जाधव म्हणाले, “त्रिभाषा सूत्राच्या वादावर आता...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:03 IST

Narendra Jadhav News: लवकरच या समितीतील सदस्यांची घोषणा होणार असल्याची माहिती डॉ. नरेंद्र जाधव यांनी दिली.

Narendra Jadhav News: राज्यात पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्यावरून अलीकडच्या काळात बराच विरोध पाहायला मिळाला. त्रिभाषा अंतर्गत हिंदी भाषेच्या सक्तीला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला. हिंदी सक्तीविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ना कुठला झेंडा, मराठीच अजेंडा अशी हाक देत सर्व मराठी भाषिकांचा मोर्चा काढण्याची घोषणा केली. राज यांच्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही हिंदी सक्तीला विरोध केला. त्यानंतर अनेक सामाजिक संघटना, संस्था, साहित्यिक, कलाकार यांनीही सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकांमधील आक्रोश पाहून फडणवीस सरकारने तात्काळ त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही जीआर रद्द करण्याची घोषणा करत यावर समिती स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी राज्यातील हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्रावर भाष्य केले.

यापूर्वी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालाशी सुसंगत अशी अधिसूचना राज्य सरकारने काढली होती. सर्वांना वाटले होते की, माझी समिती डॉ. माशेलकरांच्या समितीच्या अभ्यासावर शिक्कामोर्तब करेल आणि तीन भाषा शिकण्याची सक्ती केली जाईल. मात्र, तसे होणार नव्हते. लहान मुले खेळताना किंवा संभाषणातून भाषा शिकू शकतात. मात्र, त्यांना पुस्तक व वही दिली, अभ्यास करायला लावला, लिहायला लावले तर त्यांची पंचाईत होते. कारण प्रत्येक भाषेचे व्याकरण वेगळे असते. त्यातून विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. ते धेडगुजरी भाषा बोलू लागतात, असे डॉ. नरेंद्र जाधव यांनी म्हटले आहे. 

या आठवड्याच्या अखेरिस समितीतील सदस्यांची घोषणा

सरकार, शिक्षण विभाग व विविध विद्यापीठांकडून माहिती मागवली असून, त्रिभाषा सूत्रावर व शैक्षणिक धोरणावर अभ्यास सुरू केला आहे. आमच्या समितीमधील सदस्य ठरले आहेत. परंतु, त्यांची घोषणा झालेली नाही. या आठवड्याच्या अखेरिस समितीतील सदस्यांची घोषणा केली जाईल. तीन भाषा व हिंदी भाषेच्या सक्तीवरून वाद चालू असतानाच दोन दिवसांपूर्वी एक महत्त्वाची घटना घडली. संसदेत केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने सांगितले की, आम्ही कुठेही भाषांची सक्ती केलेली नाही. इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकणे बंधनकारक नाही. ही टिप्पणी खूप महत्त्वाची आहे. लोकांनी गृहीत धरले होते की, आता तीन भाषा शिकवल्या जाणार, तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकण्याची सक्ती केली जाणार, असे डॉ. जाधव म्हणाले. 

दरम्यान, इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याचा प्रयत्न केला तर मुख्य गोष्टी सोडून इतर विषयांवर भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या घोकमपट्टीवर भर दिला जातो. जे टाळणे आवश्यक होते. माझ्या समितीत ते पुढे आले असते. सुदैवाने केंद्र सरकारने ही गोष्ट आधीच स्पष्ट केली आहे, असे डॉ. जाधव यांनी नमूद केले.

 

टॅग्स :marathiमराठीhindiहिंदीState Governmentराज्य सरकार