शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

आश्चर्यकारक! वृक्षाच्छादन वाढले पण वनक्षेत्र कमी झाले ! राज्याने ५४.४७ चौ.कि.मी. वनक्षेत्र गमावले

By निशांत वानखेडे | Updated: December 26, 2024 19:14 IST

Forest in Maharashtra: महाराष्ट्र देशातील सर्वात जास्त वृक्षाच्छादन (१४,५२५ चौ.कि.मी.) आणि कृषिवनीकरण साठ्यांमध्ये पहिल्या स्थानी आहे, तरीही राज्याने एकूण ५४.४७ चौ.कि.मी. वनक्षेत्र गमावले आहे, जे विभागवार आणि जिल्हानिहाय आहे.

- निशांत वानखेडे नागपूर - महाराष्ट्र देशातील सर्वात जास्त वृक्षाच्छादन (१४,५२५ चौ.कि.मी.) आणि कृषिवनीकरण साठ्यांमध्ये पहिल्या स्थानी आहे, तरीही राज्याने एकूण ५४.४७ चौ.कि.मी. वनक्षेत्र गमावले आहे, जे विभागवार आणि जिल्हानिहाय आहे. द्विवार्षिक ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ (आयएसएफआर) नुसार, राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांनी वनक्षेत्र गमावले आहे.

आयएसएफआरने विविध श्रेणींमध्ये रेकॉर्डेड फॉरेस्ट एरिया (आरएफए) किंवा ग्रीन वॉश क्षेत्राच्या आत आणि बाहेरचे वनक्षेत्र विश्लेषण केले आहे. त्यानुसार अत्यंत गडद जंगल, मध्यम गडद जंगल आणि खुले जंगल या श्रेणीतील वनक्षेत्र ३६,१११ चौ.कि.मी. आहे, तर आरएफए बाहेरील त्याच श्रेणीतील क्षेत्र १४,७४७ चौ.कि.मी. आहे.

२०२१ ते २०२३ दरम्यानच्या वनक्षेत्र बदल मॅट्रिक्सनुसार घनदाट जंगल १०४१ चौ.कि.मी. आणि मध्यम वनक्षेत्रात ७२३ चौ.कि.मी. चे प्रमाण वाढले आहे. मात्र याच कालावधीत राज्याने १७७८ चौ.कि.मी. खुले जंगल आणि २६७ चौ.कि.मी. झुडपी जंगल गमावले आहे. आरएफए बाहेरील वनक्षेत्राचे प्रमाण २३ चौ.कि.मी. ने वाढले आणि मध्यम २५४ चौ.कि.मी. चा वाढले आहे. मात्र राज्याने २९७ चौ.कि.मी. खुले आणि ३३३ चौ.कि.मी. झुडपी जंगल गमावले.

काेणत्या जिल्ह्यात घटले?|सर्वाधिक वनक्षेत्र कमी झालेल्या २४ जिल्ह्यांमध्ये पालघर (८७ चौ.कि.मी.), नंदुरबार (६५ चौ.कि.मी.), कोल्हापूर (२१ चौ.कि.मी.), गडचिरोली (२० चौ.कि.मी.), यवतमाळ (१२ चौ.कि.मी.), अकोला (१२ चौ.कि.मी.), चंद्रपूर (९ चौ.कि.मी.), धुळे (९ चौ.कि.मी.) इत्यादींचा समावेश आहे. विदर्भात गडचिराेलीत सर्वाधिक वनक्षेत्र घटण्यामागे सुरजागड खाणींसाठी जमिनीचा उपयोग, तसेच एफडीसीएमचे लाँगिंग ऑपरेशन्स व वनपट्टे वितरणाचे कारण तज्ज्ञांकडून दिले जात आहे.

या प्रकल्पातही घटले वनबोरने ४७ हेक्टर (०.४७ चौ.कि.मी.), पेंच ०.८० चौ.कि.मी. (८० हेक्टर), ताडोबा कोर १.२९ चौ.कि.मी., ताडोबा बफर २.२३ चौ.कि.मी., पुणे ५ चौ.कि.मी., संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई ८.६१ चौ.कि.मी., नाशिक २.१२ चौ.कि.मी., मेळघाट २.३३ चौ.कि.मी., पांढरकवडा १.८३ चौ.कि.मी. आणि नवेगाव-नागझिराने १.७४ चौ.कि.मी. वनक्षेत्र गमावले आहे.

असे घटले झुडपी जंगल१९५० ते १९८० दरम्यान वेस्टलॅंड अॅटलसनुसार, महाराष्ट्रातील झुडपी जंगल ४६.५० लाख हेक्टर होते. परंतु १९८५ मध्ये प्रकाशित केलेल्या या अहवालानुसार ते ४.९२ लाख हेक्टरच दर्शविले गेले. म्हणजे राज्याने ४१.५ लाख हेक्टर झुडपी जमिनीचे वितरण सर्वोच्च न्यायालयाच्या आणि त्याच्या केंद्रीय सशक्तिकरण समितीच्या (सीईसी) परवानगीशिवाय केले, असे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे.

"वनक्षेत्र गमावणे हे वनविभागाच्या चुकीच्या व्यवस्थापनाचे आणि ३३ कोटी वृक्षारोपण योजनेच्या अपयशाचे दाखले आहेत. जर ही योजना यशस्वी झाली असती, तर वनक्षेत्र लक्षणीयरीत्या वाढले असते. वनजमिनींच्या हस्तांतरणासाठी केलेल्या पर्यायी वृक्षारोपणात अनियमितता आढळते.- अनसूया काले छाबरानी, पर्यावरण अभ्यासक

गेल्या दोन वर्षांत राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांसाठी लाखो झाडे तोडली गेली, पण योग्य प्रमाणात वृक्षारोपण केले गेले नाही. त्यामुळे वृक्षाच्छादनात वाढ झाल्याच्या दाव्यावर शंका येते.- डाॅ. जयदीप दास, पर्यावरण रक्षक

टॅग्स :forestजंगलMaharashtraमहाराष्ट्र