शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

दाेन दिवसांत ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या करा बदल्या, निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 07:42 IST

निवडणुका पारदर्शी आणि मुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी आयोगाकडून निवडणुकांपूर्वी असे बदल्यांचे आदेश निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांना दिले जातात. 

मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, राज्य प्रशासनाच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. निवडणुका पारदर्शी आणि मुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी आयोगाकडून निवडणुकांपूर्वी असे बदल्यांचे आदेश निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांना दिले जातात. 

यात एकाच विधानसभा मतदारसंघात तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले अधिकारी तसेच त्याच जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोग देत असते. यावेळीही राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

विशेष म्हणजे, या बदल्या तातडीने करण्याचे आदेश आयोगाने दिले असून, त्यासाठी येत्या मंगळवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात राज्य प्रशासनात मोठे फेरबदल झालेले पाहायला मिळतील. महसूल, पोलिस, उत्पादनशुल्क, महापालिका, महामंडळे या विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या होतील. 

कुणाच्या होणार बदल्या?  एकाच पदावर तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहिलेले किंवा गृह जिल्हा असलेले पोलिस दलातील आयुक्त, पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपायुक्त, निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच महसूल विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पालिका आयुक्त आदी अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या होतील.

यादी करण्यास सुरुवातनिवडणूक आयोगाने बदलीचे आदेश देताना त्यासाठी कमी कालावधी दिल्याने पोलिस, महसूल तसेच इतर विभागांनी बदली पात्र अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. येत्या एक-दोन दिवसांत यासंदर्भातील बदली आदेश जारी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग