शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

गेल्या तीन वर्षांत झालेल्या तीन निवडणुकांमध्ये दिसली नाही ‘परंपरा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 09:56 IST

परंपरांचा दाखला देत भाजपने माघार घेतली असली तरी २०१९ नंतर झालेल्या तीन विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीत या परंपरेचा विसर भाजपला पडला होता, हे स्पष्ट होते. 

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रथा, परंपरांचा दाखला देत भाजपने माघार घेतली असली तरी २०१९ नंतर झालेल्या तीन विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीत या परंपरेचा विसर भाजपला पडला होता, हे स्पष्ट होते. 

आधीच्या तिन्ही निवडणुकांत निधन झालेल्या आमदारांचे अगदी सख्खे नातेवाईकच भाजपच्या विरोधात उभे  होते; पण भाजपने माघार घेतली नाही. उलट या तिन्ही निवडणुका भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या. त्यापैकी एका जागेवर भाजपला यशदेखील मिळाले; पण दोन जागांवर दारुण पराभव पत्करावा लागला होता. सर्वात आधी आ. भारत भालके यांच्या निधनाने पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक झाली. त्यांचे पुत्र भगीरथ हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली. भालके ३,७३३ मतांनी पराभूत झाले. भाजपचे विधानसभेतील संख्याबळ १०५ वरून १०६ झाले. 

देगलूर (जि. नांदेड)  येथील रावसाहेब अंतारपूरकर (काँग्रेस) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे पुत्र जितेश यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. भाजपने शिवसेनेचे पराभूत उमेदवार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली. पण अंतापूरकर ४१,९३३ एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. नंतर चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उत्तर कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसने जाधव यांच्या पत्नी जयश्री यांना उमेदवारी दिली. तिथेही भाजपने सर्व शक्ती पणाला लावली; पण जयश्री जाधव १९,२१० मताधिक्याने जिंकल्या.

परंपरा पाळल्याचीही उदाहरणे

  • राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे तासगाव (जि. सांगली) मतदारसंघात एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्या विरोधात भाजपसह कोणत्याही प्रमुख पक्षाने उमेदवार दिला नव्हता. अपक्ष रिंगणात कायम राहिले आणि सुमनताई एक लाख १२ हजारांवर मतांनी जिंकल्या होत्या.
  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर मे २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र विश्वजित काँग्रेसचे उमेदवार होते. तेव्हा भाजप व इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने ते बिनविरोध विजयी झाले होते. 
  • भाजपचे ज्येष्ठ नेते व तत्कालीन केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे विक्रमी मतांनी जिंकल्या. काँग्रेसचे अशोक पाटील त्यांच्या विरोधात लढले होते. 
  • यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे तत्कालीन आमदार नीलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनाने झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी नंदिनी पारवेकर (काँग्रेस) जिंकल्या. तेव्हा भाजपचे सध्याचे आमदार मदन येरावार हे उमेदवार होते.

अंधेरी पोटनिवडणूक-भाजपच्या माघारीपर्यंतचा घटनाक्रम

  • ३ ऑक्टोबर, २०२२ - अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर.
  • ५ ऑक्टोबर - दसरा मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन.
  • ७ ऑक्टोबर - धनुष्यबाण चिन्हावर दोन्ही गटांचा दावा, निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल.
  • ८ ऑक्टोबर - धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव निवडणूक आयोगाने गोठवले.
  • ९ ऑक्टोबर - उद्धव ठाकरे गटाकडून तीन चिन्हे आणि तीन नावांचा पर्याय निवडणूक आयोगाला सादर.
  • १० ऑक्टोबर - केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव 
  • ११ ऑक्टोबर - निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता. ‘दोन तलवार व ढाल’ चिन्ह प्रदान
  • १२ ऑक्टोबर - ऋतुजा लटकेंना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची उमेदवारी जाहीर. लटकेंच्या नोकरीचा राजीनामा मुंबई महापालिकेने रोखला. लटकेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव.
  • १३ ऑक्टोबर - लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश. भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर.
  • १४ ऑक्टोबर - लटके व पटेल यांचे  अर्ज दाखल.
  • १६ ऑक्टोबर - पोटनिवडणूक बिनविरोध करण्याबाबत राज ठाकरेंचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र, शरद पवारांचेही निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन, प्रताप सरनाईकांचेही पत्र
  • १७ ऑक्टोबर - मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे.
टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपा