शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

आंग्रे जेटीपाशी पुढील वर्षापर्यंत पर्यटन केंद्र

By admin | Updated: June 6, 2015 01:55 IST

मुंबईच्या समुद्रातील कान्होजी आंग्रे जेटीपाशी ४७ कोटी रुपये खर्च करून एक नवे पर्यटन स्थळ मे २०१६ पर्यंत विकसीत करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केली

मुंबई : मुंबईच्या समुद्रातील कान्होजी आंग्रे जेटीपाशी ४७ कोटी रुपये खर्च करून एक नवे पर्यटन स्थळ मे २०१६ पर्यंत विकसीत करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केली तर रेवस बंदराच्या उभारणीला मंजुरी देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी महिनाभरात मान्य केली जाईल, असेही गडकरी यांनी जाहीर केले.महाराष्ट्रातील डहाणुजवळ वधवान पॉइंट येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन बंदरासंबंधी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्यातील सामंजस्य करारावर केंद्रीयमंत्री गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. गडकरी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नावे असलेल्या जेटीच्या ठिकाणी गेटवे आॅफ इंडियापासून ३५ कि.मी. अंतरावर नवे पर्यटन स्थळ सुरु करण्यासाठी ४७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या ठिकाणी मनोरंजना बरोबर छत्रपती शिवाजी महाराज व कान्होजी आंग्रे यांच्यावरील ध्वनीप्रकाशाचा एक कार्यक्रम सादर केला जाईल. आॅक्टोबर २०१५ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करुन मे २०१६ पर्यंत प्रकल्प पूर्ण केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. याखेरीज रत्नागिरी येथे मेरीटाईम विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्याकरिता १०० एकर जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. विजयदुर्ग येथे दोन तेल शुद्धीकरण केंद्र सुरु करण्यात येणार असून त्याकरिता केंद्र सरकार पैसे उपलब्ध करून देणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांची तक्रारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवस प्रकल्पाला केंद्राने मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. त्याकरिता केंद्राकडून केली जाणारी पैशाची मागणी अवास्तव असल्याची तक्रार फडणवीस यांनी केली. ही मागणी महिन्याभरात पूर्ण करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले.