शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

टोलमाफी झाली; एसटीची दररोज दोन लाखांची बचत; दोन हजार फेऱ्या करणाऱ्या गाड्यांना फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 11:11 IST

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या गाड्या राज्यातून मुंबईत ये-जा करतात. या गाड्यांच्या सुमारे दोन हजार फेऱ्या होतात. टोलमाफीचा फायदा या दोन हजार फेऱ्या करणाऱ्या गाड्यांना होणार आहे.

मुंबई : मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाच टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी केली आहे. या हलक्या वाहनांमध्ये एसटी गाड्यांचाही समावेश आहे. या टोलमाफीमुळे एसटीची दररोज सुमारे दोन लाखांची बचत होणार आहे. राज्य सरकारने वाशी, दहीसर, मुलुंड, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री या मुंबईच्या प्रवेशद्वारावर आकारण्यात येणाऱ्या टोलमधून हलक्या वाहनांना वगळले आहे.

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या गाड्या राज्यातून मुंबईत ये-जा करतात. या गाड्यांच्या सुमारे दोन हजार फेऱ्या होतात. टोलमाफीचा फायदा या दोन हजार फेऱ्या करणाऱ्या गाड्यांना होणार आहे. त्यामुळे एसटीचे टोलच्या माध्यमातून खर्च होणारे सुमारे २ लाख रुपये दिवसाला वाचणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. 

तिकीट दर कमी करा राज्यातून मुंबईत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या एसटीच्या गाड्यांच्या २००० फेऱ्या होतात. ज्यामध्ये मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी गाड्यांच्या ३०० फेऱ्यांचा समावेश आहे. एसटीला एका फेरीसाठी साधारण १०० रुपये इतका टोल द्यावा लागतो. टोलच्या माध्यमातून एसटीला दिवसाला सुमारे २ लाख तर महिन्याला ६० लाख रुपयांचा भरावा लागणारा टोल वाचणार आहे.  एसटीचा खर्च काही प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे एसटीने प्रवासी तिकीट दरही कमी करावे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारtollplazaटोलनाका