शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

टोल, कर रद्द करा

By admin | Updated: November 21, 2014 02:34 IST

सटीला आर्थिक संकटात सापडण्यास अनेक कारणे असून यात टोल आणि प्रवासी करामुळे मोठा फटका बसत आहे. त्यामुळे टोल आणि

मुंबई : एसटीला आर्थिक संकटात सापडण्यास अनेक कारणे असून यात टोल आणि प्रवासी करामुळे मोठा फटका बसत आहे. त्यामुळे टोल आणि प्रवासी कर रद्द करावा, अशी मागणी अनेक वेळा एसटी महामंडळाकडून शासनाकडे करण्यात आली आहे. आता एसटी महामंडळाने हीच मागणी नव्या सरकारकडे लावून धरली असून तसे एक मागणीपत्रही पाठविले आहे. २00८-0९ साली एसटी महामंडळाकडून तब्बल ६0 कोटी ९७ लाख रुपये टोल टॅक्सचे भरण्यात आले होते. तर २00९-१0 साली हाच आकडा ६८ कोटी ६३ लाख रुपये एवढा होता. २0१३-२0१४ साली तर हाच आकडा जवळपास १२0 कोटी रुपये एवढा झाला आहे. टोल टॅक्सचा भार वाढतच जात असल्यामुळे महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. त्याचबरोबर प्रवासी सेवेवर १७.५ टक्के तर शहरी भागातील प्रवासी सेवेवर ३.५ टक्के प्रवासी कर आकारला जातो. या कराचाही फटका एसटीला बसतो. त्यामुळे हे दोन्ही कर रद्द करण्यात यावे, अशी मागणी एसटी महामंडळाकडून राज्य सरकारकडे करण्यात येत होती. मात्र त्यावर निर्णय होत नव्हता. महत्त्वाची बाब म्हणजे शासनाच्या विविध विभागांना देण्यात येणाऱ्या सवलतींमुळेही महामंडळावर शेकडो कोटींचा बोजा पडत आहे. त्यामुळे या सवलतींवरही विचार केला जावा, अशी मागणीही होत होती. अखेर नवीन सरकार स्थापन होताच एसटी महामंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे टोल, प्रवासी कर रद्द करण्याबरोबरच सवलतींचाही विचार करावा, अशी लेखी मागणी केल्याचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)