शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

‘समृद्धी’वर शेवटपर्यंत कुठेही नसेल ‘टोल प्लाझा’, महामार्गावरून बाहेर पडताना ‘टोल बुथ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 08:32 IST

Samrudhi Highway : वाहनधारकांना न थांबता अखंडपणे प्रवास करता येणार आहे. मात्र, महामार्गावरून बाहेर पडताना ‘स्लीप रोड’वर टोल बुथ असतील व तेथे ‘फास्टॅग’च्या माध्यमातून ‘टोल’ आकारला जाईल.

- विजय सरवदे

औरंगाबाद : समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून औरंगाबाद जिल्ह्यातील या महामार्गाचे काम ऑक्टोबरअखेरपर्यंत शंभर टक्के पूर्ण होईल. तथापि, या महामार्गावर फक्त चारचाकी व अवजड वाहनांसाठीच प्रवेश असेल. दुचाकी, तीनचाकी, ट्रॅक्टर या वाहनांसाठी प्रवेश नसणार आहे. विशेष म्हणजे या शीघ्रगती महामार्गावर नागपूर ते मुंबईपर्यंत कुठेही ‘टोल प्लाझा’ राहणार नाही. वाहनधारकांना न थांबता अखंडपणे प्रवास करता येणार आहे. मात्र, महामार्गावरून बाहेर पडताना ‘स्लीप रोड’वर टोल बुथ असतील व तेथे ‘फास्टॅग’च्या माध्यमातून ‘टोल’ आकारला जाईल.‘नागपूर ते मुंबई’मार्गे औरंगाबाद या समृद्धी महामार्गावर एकूण २४ ठिकाणी इंटरचेंजेस आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात शेंद्रा औद्योगिक वसाहत, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या पाच ठिकाणी इंटरचेंजेस आहेत. या ठिकाणांवरूनच वाहनधारकांना महामार्गावर प्रवेश करता येईल व बाहेर पडता येणार आहे. अधुन-मधून कुठेही या महामार्गावर प्रवेशही करता येणार नाही किंवा बाहेरही पडता येणार नाही. 

‘एक्झिट बेस टोल’ची अशी आहे संकल्पनायासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता बी. पी. साळुंके यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गावर ‘एक्झिट बेस टोल’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. ज्यामुळे वाहनधारकांना विनाअडथळा अखंडपणे प्रवास करता येईल. सध्या आपल्या राज्यामध्ये ‘एन्ट्रीबेस टोल’ अर्थात महामार्गावरून प्रवास करतानाच टोल द्यावा लागतो. त्यासाठी अनेकदा टोल प्लाझावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. या महामार्गाची संकल्पना मुळातच ‘सुपर एक्स्प्रेस-वे’ (शीघ्रगती महामार्ग) असल्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना टोल देण्यासाठी कुठेही थांबावे लागणार नाही. या महामार्गावर जेथून प्रवेश केला, तिथे संबंधित वाहनाची नोंद होईल व जिथे ते बाहेर पडेल तिथे ‘स्लीप रोड’वर असलेल्या टोल बुथवर एकूण किलोमीटरनुसार आपोआप टोल आकारला जाईल.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग