शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

टोल कंपन्यांना मिळणार लॉकडाऊन काळातली नुकसानभरपाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 07:01 IST

केंद्राच्या सूचनेनुसार एमएसआरडीसीचा प्रस्ताव; १४ टोल नाक्यांसाठी १७४ कोटींच्या भरपाईची शिफारस

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने टोल माफी जाहीर केली. त्यानंतर आता केंद्राच्या सूचनेनुसार राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) १४ टोल नाक्यांवरील कंत्राटदारांसाठी जवळपास १७४ कोटींची नुकसानभरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.लॉकडाऊनमध्ये आपत्कालीन परिस्थितीत अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ये-जा करण्यात अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २४ मार्च रोजी टोलमाफी जाहीर केली. त्यानंतर २० एप्रिलपासून पुन्हा टोलवसुली सुरू झाली. लॉकडाऊन काळातील नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे विनंती करण्यात आली.या विभागाने टोल कंपन्यांना झालेल्या नुकसानीची माहिती संकलित करून ती सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केल्याची माहिती एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.१४ टोल नाके एमएसआरडीसीच्या अखत्यारीत असून, त्यात मुंबई एन्ट्री पॉइंटसह मुंबई-पुणे एस्क्स्प्रेस-वे, सी-लिंक यांचाही समावेश आहे. या टोल कंपन्यांचा साधारणत: १७४ कोटींचा महसूल बुडाला असून करारानुसार कंपन्यांना भरपाई मिळावी, अशी विनंती करण्यात आल्याचे अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. याबाबत राज्य सरकारची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.जनहित याचिका करणार दाखलया आदेशामुळे टोल कंपन्यांना भविष्यात नुकसानभरपाई मागण्याची संधी मिळेल. त्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी करू नये, अशी तक्रार मी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्या वेळी व्यक्त केलेली भीती आता खरी ठरली. लॉकडाऊनच्या झळा प्रत्येक नागरिकाला सोसाव्या लागल्या असताना गब्बर टोल कंपन्यांनाच भरपाई देण्याच्या हालचाली धक्कादायक आहेत. त्याविरोधात पुढील आठवड्यात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे टोलविरोधात सातत्याने लढा देणाºया प्रवीण वाटेगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :tollplazaटोलनाका