शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
3
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
4
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
5
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
6
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
7
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
8
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
9
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
10
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
11
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
12
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
13
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
14
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
15
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
16
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
17
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
18
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
19
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
20
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

टोल पूर्णपणे बंद होणं शक्य नाही - गडकरी

By admin | Updated: May 21, 2015 12:18 IST

निवडणुकीदरम्यान टोल बंद करण्याचे आश्वासन देणा-या नितीन गडकरी यांनी 'टोल पूर्णपणे बंद होऊ शकत नाही' असे सांगत या मुद्यावरून चक्क यू-टर्न घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २१ - निवडणुकीदरम्यान टोल बंद करण्याचे आश्वासन देणा-या नितीन गडकरी यांनी 'टोल पूर्णपणे बंद होऊ शकत नाही' असे सांगत या मुद्यावरून चक्क यू-टर्न घेतला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या गडकरींनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल्याने सरकारने घूमजाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.

'जनतेला चांगले रस्त हवे असतील तर टोल राहणारच' असे सांगत टोल पूर्णपणे बंद होणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याच गडकरींनी विधानसभा निवडणुक प्रचारादरम्यान 'आपण टोलचा खेळ सुरू केला होता आणि आता आपणच तो बंद करू' असे आश्वासन देत जनतेला गाजर दाखवलं होतंं. मात्र सरकार सत्तेवर येऊन अवघे वर्ष पूर्ण होते न होते तोच त्यांनी आपल्या विधानावरून पलटी मारली आहे.

भाजपात लोकशाही आहे

केंद्रात मोदी, अमित शाह आणि जेटली हे तिघेच सरकार चालवत आहेत, बाकीच्या ज्येष्ठ मंत्र्यांचे मत विचारात घेतले जात नाही, असे सरकारवर होत असलेले आरोप चुकीचे असून भाजपामध्ये लोकशाहीच आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. भाजपात फक्त तिघांचेच सरकार नाही, पंतप्रधान मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून मगच निर्णय घेतात, असेही त्यांनी सांगितले.