शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

‘अच्छे दिन’साठी युतीबरोबरच

By admin | Updated: March 21, 2015 22:43 IST

देशातील गोरगरीब जनतेला दोन वेळचे जेवण मिळायला हवे, मात्र आघाडी सरकारच्या राज्यात वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला उपाशी झोपण्याची वेळ आली होती.

महाड : देशातील गोरगरीब जनतेला दोन वेळचे जेवण मिळायला हवे, मात्र आघाडी सरकारच्या राज्यात वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला उपाशी झोपण्याची वेळ आली होती. देशातील जनतेला चांगले दिवस यावेत यासाठी सेना-भाजपासोबत गेलो, असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी महाड येथे चवदारतळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत केले.चवदारतळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी हजेरी लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भीमसैनिकांना चांगल्या सोयी-सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या सभेला महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, दक्षिण मुंबईचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, आरपीआयचे रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड, दलित मित्र केशव हाटे, महाड तालुका अध्यक्ष मोहन खांबे आदी मान्यवर उपस्थित होते.आमदार गोगावले यांनी, आपल्या नेहमीच्या शैलीत कुणाचे नाव न घेता काही मतलबी लोक कधी येतील कधी येणार नाहीत. आम्ही २० मार्चला दरवर्षी येतच राहू, असे सांगत शिवसृष्टी आणि भीमसृष्टी उभी करण्यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. यावेळी जगदीश गायकवाड यांनीही आपल्या छोटेखानी भाषणात या कार्यक्रमासाठी शासनाकडून जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी केली. दरम्यान, सायंकाळी आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.