शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

‘अच्छे दिन’साठी युतीबरोबरच

By admin | Updated: March 21, 2015 22:43 IST

देशातील गोरगरीब जनतेला दोन वेळचे जेवण मिळायला हवे, मात्र आघाडी सरकारच्या राज्यात वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला उपाशी झोपण्याची वेळ आली होती.

महाड : देशातील गोरगरीब जनतेला दोन वेळचे जेवण मिळायला हवे, मात्र आघाडी सरकारच्या राज्यात वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला उपाशी झोपण्याची वेळ आली होती. देशातील जनतेला चांगले दिवस यावेत यासाठी सेना-भाजपासोबत गेलो, असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी महाड येथे चवदारतळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत केले.चवदारतळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी हजेरी लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भीमसैनिकांना चांगल्या सोयी-सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या सभेला महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, दक्षिण मुंबईचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, आरपीआयचे रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड, दलित मित्र केशव हाटे, महाड तालुका अध्यक्ष मोहन खांबे आदी मान्यवर उपस्थित होते.आमदार गोगावले यांनी, आपल्या नेहमीच्या शैलीत कुणाचे नाव न घेता काही मतलबी लोक कधी येतील कधी येणार नाहीत. आम्ही २० मार्चला दरवर्षी येतच राहू, असे सांगत शिवसृष्टी आणि भीमसृष्टी उभी करण्यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. यावेळी जगदीश गायकवाड यांनीही आपल्या छोटेखानी भाषणात या कार्यक्रमासाठी शासनाकडून जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी केली. दरम्यान, सायंकाळी आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.