शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

आजच्या श्यामच्या आईसाठी

By admin | Updated: March 19, 2017 00:51 IST

धनश्री लेले कबिराचा हवाला देत म्हणतात, ‘वरून थपडा मारत मारत पण आतून आधाराचा हात देत मडकं घडवायचं असतं. कच्चं मडकं मग पक्कं करण्यासाठी अनुभवाच्या

- रविप्रकाश कुलकर्णी

धनश्री लेले कबिराचा हवाला देत म्हणतात, ‘वरून थपडा मारत मारत पण आतून आधाराचा हात देत मडकं घडवायचं असतं. कच्चं मडकं मग पक्कं करण्यासाठी अनुभवाच्या भट्टीत भाजायचं असतं. ते मडकं पक्कं होण्यासाठी शिशुरूपी कुंभाराला वेळ द्यायचा असतो. त्याचे अनुभव त्याला घेऊ द्यायचे असतात. त्या अनुभवाच्या भट्टीतून त्याला बाहेर काढण्याची घाई कुंभाराने करायची नसते. त्याने दिलेल्या आकारावर व केलेल्या संस्कारावर विश्वास हवा. काही अनुभवांची कितीही धग लागली तरी आपलं मडकं फुटणार नाही, याची त्याला खात्री हवी.साने गुरुजीकृत ‘श्यामची आई’नं मागच्या पिढ्यांची जडणघडण नक्कीच केली. मनाचं भरणपोषण केलं. समोर एक आदर्श ठेवला. ज्याचं आकर्षण आजही वाटावं, म्हणूनच म्हटलं आहे-मांगल्यासह प्रकाश देईदेवघरातील समईमहाराष्ट्राच्या घरोघरी वसेतशी श्यामची आई!!पण जग झपाट्यानं बदललं. विशेषत: अलीकडच्या काळात फारच झपाट्यानं. तरीही आज श्याम जसे आहेत तसंच श्यामच्या आईपण नक्कीच आहेत. मात्र आजच्या श्यामला त्याची आई किती वाट्याला येते? त्याचबरोबर श्यामच्या आईच्या वाट्याला तरी श्याम कितीसा येतो? दुहेरी पेचाचा हा प्रसंग आहे खरा याची जाणीव आजच्या कितीतरी श्यामच्या आईला आणि वडिलांना असणार. पण प्रकर्षानं बोच लागली ती व्यास क्रिएशनच्या नीलेश गायकवाड यांना. ते स्वत: ‘श्यामच्या आई’चे निस्सीम चाहते. ही गोष्ट घरोघरी पोहोचावी म्हणून त्यांनी ‘श्यामची आई’ पुस्तक वाटले आहे. जिथं वाचन पोहोचणार नाही तेथे श्यामची आई चित्रपट दाखवला आहे. त्याच्या सिड्या वाटल्या आहेत.हे सर्व कशापोटी? आजच्या श्यामची जडणघडण होण्यासाठी!या काळजीला नवे वळण मिळाले. त्याला निमित्त होते श्यामची आई म्हणजे साने गुरुजींच्या आई - यशोदासदाशिव साने यांच्या स्मृतिशताब्दीचं वर्ष २ नोव्हेंबर १९१७. नीलेश गायकवाड यांनी हेरलं की, ‘श्यामची आई’ हे पुस्तक आज जसंच्या तसं देऊन चालणार नाही. कारण परिस्थितीत खूप बदल झाला आहे. यातून त्यांना श्यामच्या आईमधील कथाभाग सुटसुटीत करणं अगत्याचं वाटलं.श्यामची आई पुस्तकाची कॉपी राईट गेल्यापासून अनेक प्रकाशकांनी ज्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे त्याच्या आवृत्त्या काढल्या. पण या आवृत्त्या बेजबाबदारपणे, निष्काळजीपणाने काढलेल्या दिसतात. या पार्श्वभूमीवर नीलेश गायकवाड यांनी सदर पुस्तकाचे नव्याने संपादन डॉ. मुरलीधर गोडे यांच्याकडून करून घेतले. यावरून गायकवाड आणि डॉ. मुरलीधर गोडे यांना सद्य:स्थितीचे भान आहे हे जाणवतं. पुस्तकासाठी नीलेश गायकवाड यांनी महाराष्ट्रात मुलांसाठी काम करण्यात वेगवेगळ्या प्रकारे सक्रिय आहेत त्यांना साद घातली ज्यात हेरंब कुलकर्णी, रेणू दांडेकर, अच्युत गोडबोले यांच्यापासून रेणू गावसकर, उमा दीक्षित, एकनाथ आव्हाड, धनश्री लेले, गिरिजा कीर, उत्तम कांबळे, उल्हास कोल्हटकर, अंजली बापट यांच्यासारख्यांनी या प्रश्नाची तीव्रता आणि त्यावर मात कशी करता येईल याबाबत विचारमंथन केले आहे. हेरंब कुलकर्णी म्हणतात, ‘आजच्या मध्यम वर्ग - उच्च मध्यम वर्गात मुलांवर सुखाचा मारा होतो. त्यातून त्यांच्या संवेदना तरल राहत नाहीत. अभाव वाट्याला न आल्याने गरिबी, वंचितता याची वेदना कळत नाही किंवा आजूबाजूचे जग हेही सुखवस्तू असल्याने या गरिबांच्या जगण्याचा परिघच परिचित होत नाही. पुन्हा वाचन, संगीत, निसर्ग असे अनुभव बहुतेक घरांत न मिळाल्याने मुले टीव्ही, मोबाइल, कार्टून, दंगामस्ती असले स्वस्त आनंदाचे मार्ग शोधतात. परिणामी, त्यांची विचारशक्ती व संवेदना विकसित होत नाही.धनश्री लेले कबिराचा हवाला देत म्हणतात, ‘वरून थपडा मारत मारत पण आतून आधाराचा हात देत मडकं घडवायचं असतं. कच्चं मडकं मग पक्कं करण्यासाठी अनुभवाच्या भट्टीत भाजायचं असतं. ते मडकं पक्कं होण्यासाठी शिशुरूपी कुंभाराला वेळ द्यायचा असतो. त्याचे अनुभव त्याला घेऊ द्यायचे असतात. त्या अनुभवाच्या भट्टीतून त्याला बाहेर काढण्याची घाई कुंभाराने करायची नसते. त्याने दिलेल्या आकारावर व केलेल्या संस्कारावर विश्वास हवा. काही अनुभवांची कितीही धग लागली तरी आपलं मडकं फुटणार नाही, याची त्याला खात्री हवी.अशा तऱ्हेने आजच्या श्यामबाबत विचार मांडलेले आहेत. फरक इतकाच साने गुरुजी सांगतात ती गोष्ट. त्यामुळे ती ऐकता ऐकता वा वाचताना नकळत त्याचा संस्कार होतो - होऊ लागतो. तर आजच्या श्यामच्या निमित्ताने लिहिलेले अनुभव लेख पातळीवरच राहतात. ते बोधामृत वाटायला लागतं... याचा अर्थच आजच्या श्यामला घडवणं ही कठीण गोष्ट आहे, हेच खरं. पण यानिमित्ताने श्यामच्या आईकडे नव्याने, नव्या दृष्टीकोनातून पाहायला सुरुवात झाली. तरी पुष्कळ झाले.