शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर महापालिकेसाठी आज मतदान

By admin | Updated: November 1, 2015 03:31 IST

कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता रविवार १ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. शिवसेना व भाजपा या राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये

डोंबिवली/कोल्हापूर : कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता रविवार १ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. शिवसेना व भाजपा या राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेवर सत्ता काबीज करण्याकरिता बिग फाईट असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. तर कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. कोल्हापूरात ८१ जागांच्या लढतीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना स्वबळावर तर भाजपाने ताराराणी आघाडीशी युती केली असल्याने सर्वच प्रभागात चुरशीची लढत होणार आहे.
मतदानाचा टक्का वाढावा याकरिता निवडणूक आयोगाने व राजकीय पक्षांनी केलेल्या प्रयत्नांना किती यश लाभते याबाबतही औत्सुक्य आहे. शनिवारी दिवसभर सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी छुप्या प्रचारासह सोशल मिडीयाद्वारे प्रचार केला.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत अगोदर २७ गावांचा समावेश करून ती वगळण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने त्या गावांमधील संघर्ष समिती व काही राजकीय पक्ष यांच्यात प्रचारादरम्यान संघर्षाचे वातावरण राहिल्याने सध्या या परिसरात तणावाचे वातावरण आहे. मात्र ३२ वर्षांत प्रथमच या २७ गावांत महापालिकेकरिता मतदान होणार असल्याने तेथील मतदारांमध्ये मतदानाबाबत उत्सुकताही असल्याचे बोलले जात आहे.
महापालिका निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेले वाकयुद्ध गाजले. वाघाचा पंजा, वाघाच्या तोंडातील दात, सरकार तडीपार करण्याचे इशारे अशा अनेक वादग्रस्त विधानांमुळे प्रचार तापला होता. राज ठाकरे यांनी नाशिकमधील विकास कामांचा हवाला देत मतदारांना साकडे घातले. आता कुठला पक्ष आपले किती संघटनात्मक बळ लावून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणतो त्यावर निकालाचे गणित अवलंबून राहील.
 
जास्तीतजास्त मतदानासाठी 
निवडणूक आयोग सज्ज झाला असून मतदारांनीही कोणत्याही दबावतंत्राला बळी न पडता मतदान करावे असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी केले. 
 
कल्याण-डोंबिवली महापालिकासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी २१९ मतदान केंद्रे आणि १०१० बुथ आहेत. ११७ झोनल आॅफीसर १२ निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे. आतापर्यंत ८००हून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ५५ केंद्रे ही संवेदनशील असून त्यात २७ गावांमधील केंद्रांचाही समावेश आहे.
 
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या रिंगणात ७५०  उमेदवार असून त्यामध्ये शिवसेना ११५, भाजपा १०९, मनसे ८५, काँग्रेस ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ४६, बसपा २५, बहुजन विकास आघाडी २०, सीपीआय ४, सीपीएम १, सपा २, रासपा ८, रिपाइं (आठवले) ६, एमआयएम ६, भारिप बहुजन महासंघ ६, आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक ९ व अपक्ष २५२ यांचा समावेश आहे. तसेच, निवडणुकीच्या एकूण १२२ प्रभागांपैकी प्रभाग क्र. ४६, १०५ व ११३ ची निवडणूक बिनविरोध झाली आहे तर प्रभाग क्र. ११४ व ११९ मध्ये एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही.