शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर महापालिकेसाठी आज मतदान

By admin | Updated: November 1, 2015 03:31 IST

कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता रविवार १ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. शिवसेना व भाजपा या राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये

डोंबिवली/कोल्हापूर : कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता रविवार १ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. शिवसेना व भाजपा या राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेवर सत्ता काबीज करण्याकरिता बिग फाईट असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. तर कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. कोल्हापूरात ८१ जागांच्या लढतीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना स्वबळावर तर भाजपाने ताराराणी आघाडीशी युती केली असल्याने सर्वच प्रभागात चुरशीची लढत होणार आहे.
मतदानाचा टक्का वाढावा याकरिता निवडणूक आयोगाने व राजकीय पक्षांनी केलेल्या प्रयत्नांना किती यश लाभते याबाबतही औत्सुक्य आहे. शनिवारी दिवसभर सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी छुप्या प्रचारासह सोशल मिडीयाद्वारे प्रचार केला.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत अगोदर २७ गावांचा समावेश करून ती वगळण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने त्या गावांमधील संघर्ष समिती व काही राजकीय पक्ष यांच्यात प्रचारादरम्यान संघर्षाचे वातावरण राहिल्याने सध्या या परिसरात तणावाचे वातावरण आहे. मात्र ३२ वर्षांत प्रथमच या २७ गावांत महापालिकेकरिता मतदान होणार असल्याने तेथील मतदारांमध्ये मतदानाबाबत उत्सुकताही असल्याचे बोलले जात आहे.
महापालिका निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेले वाकयुद्ध गाजले. वाघाचा पंजा, वाघाच्या तोंडातील दात, सरकार तडीपार करण्याचे इशारे अशा अनेक वादग्रस्त विधानांमुळे प्रचार तापला होता. राज ठाकरे यांनी नाशिकमधील विकास कामांचा हवाला देत मतदारांना साकडे घातले. आता कुठला पक्ष आपले किती संघटनात्मक बळ लावून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणतो त्यावर निकालाचे गणित अवलंबून राहील.
 
जास्तीतजास्त मतदानासाठी 
निवडणूक आयोग सज्ज झाला असून मतदारांनीही कोणत्याही दबावतंत्राला बळी न पडता मतदान करावे असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी केले. 
 
कल्याण-डोंबिवली महापालिकासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी २१९ मतदान केंद्रे आणि १०१० बुथ आहेत. ११७ झोनल आॅफीसर १२ निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे. आतापर्यंत ८००हून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ५५ केंद्रे ही संवेदनशील असून त्यात २७ गावांमधील केंद्रांचाही समावेश आहे.
 
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या रिंगणात ७५०  उमेदवार असून त्यामध्ये शिवसेना ११५, भाजपा १०९, मनसे ८५, काँग्रेस ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ४६, बसपा २५, बहुजन विकास आघाडी २०, सीपीआय ४, सीपीएम १, सपा २, रासपा ८, रिपाइं (आठवले) ६, एमआयएम ६, भारिप बहुजन महासंघ ६, आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक ९ व अपक्ष २५२ यांचा समावेश आहे. तसेच, निवडणुकीच्या एकूण १२२ प्रभागांपैकी प्रभाग क्र. ४६, १०५ व ११३ ची निवडणूक बिनविरोध झाली आहे तर प्रभाग क्र. ११४ व ११९ मध्ये एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही.