शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

आजचा मोर्चा ही सुरुवात; महाराष्ट्र द्रोह्यांना गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, महामोर्चात उद्धव ठाकरेंचा हुंकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 14:41 IST

"या महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकारणात शेवट केल्याशिवाय आता स्वस्त बसता येणार नाही."

आज आम्ही पक्ष वैगेरे सर्व बाजूला ठेऊन, महाराष्ट्राच्या प्रेमासाठी, महाराष्ट्र द्रोह्यांना या मातीत गाडण्यासाठी एकवटलो आहोत आणि ते गाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. हीच एक शिवचरणी शपथ घेतो, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आणि शिवसेनेवर (एकनाथ शिंदे गट) निशाणा साधला आहे. ते आज मुंबईत शिंदे-फडणवीस सरकारला टार्गेट करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या महामोर्चात बोलत होते.

...तर हे रस्त्यावर जमलेला आगडोंब पेटल्याशिवाय राहणार नाही -उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्ही सर्वजन ही आमची मातृभूमी मानतो. मुंबई काय महाराष्ट्र काय ही आमची मातृभूमी आहे. पण आमचे पालकमंत्री मुंबईचा हिशेब स्क्वेअर फुठात करतात. ती विकली जाणारी जागा नाही. ती आमची माय आहे. आमची माय माऊली आहे. मुंबा आई आहे आणि तिच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केला, तर हे रस्त्यावर जमलेला आगडोंब पेटल्याशिवाय राहणार नाही." 

या महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकारणात शेवट केल्याशिवाय स्वस्त बसता येणार नाही - "कर्नाटकसह हे सर्वजण एकत्रितपणे महाराष्ट्रावर तुटून पडत आहेत. म्हणजे एकाबाजूला महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवायची, त्यांचा अपमान करायचा, येऊ शकणारे आणि येणारे, म्हणजे महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर असणारे उद्योग धंदे दुसऱ्या राज्यात पळवून न्यायचे. गावं कुर्तडायला लागायची. म्हणजे चहूबाजूंनी महाराष्ट्र कसा भिकेला लागेल, हा यांचा प्रयत्न आहे. या महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकारणात शेवट केल्याशिवाय आता स्वस्त बसता येणार नाही," असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

हीच महाराष्ट्राची वज्रमूठ -यावेळी, "आजचा मोर्चा ही सुरुवात आहे. या मोर्चाची ताकद बघायची असेल तर, मी सर्वांना एकच विनंती करतोय. की आपापल्या हातांच्या मुठी उंचावून वळा आणि वर करा. हीच महाराष्ट्राची ताकद आहे. हीच महाराष्ट्राची वज्रमूठ आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईMahavikas Aghadiमहाविकास आघाडी