शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

नारायण राणे यांच्या याचिकेवर आज सुनावणी, मुख्यमंत्र्यांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 11:13 IST

२३ ऑगस्ट २०२१ रोजी राणे यांनी रायगड येथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवावरून मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबाबत धुळे पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका प्रलंबित असेपर्यंत धुळे पोलिसांना कठोर कारवाई न करण्याचे व सदर प्रकरणी आरोपपत्र दाखल न करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी राणे यांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी ठेवण्यात आली आहे. 

२३ ऑगस्ट २०२१ रोजी राणे यांनी रायगड येथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवावरून मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्या विधानावरून राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. धुळे पोलीस ठाण्यात २४ ऑगस्टला गुन्हा नोंदविण्यात आला. धुळे येथे गुन्हा दाखल झाल्याने सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या अधिकार क्षेत्रात येत असले तरी पत्रकार परिषद मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात घेण्यात आली आहे, असे राणे यांनी याचिकेत म्हटले आहे. एफआयआरमध्ये केलेले आरोप खोटे आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राणे आणि ठाकरे सरकार यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दोघेही आरोपाची एकही संधी सोडत नसल्याने राज्यातील राजकारणही यामुळे चांगलेच तापलेले दिसत आहे.

‘ते शब्द चिथावणी  देणारे नाहीत’- राजकीय हेतूने आरोप करण्यात आले आहेत आणि तक्रारदार शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. - राणेंच्या वर्तनामुळे विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढेल किंवा विविध धार्मिंक, वांशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गटांमधील सलोखा टिकवून ठेवण्यास बाधा आणण्यात आली आहे, असे म्हणता येणार नाही. - पत्रकार परिषदेत जे शब्द उच्चारले आहेत ते चिथावणी देणारे किंवा भडकवणारे नाहीत, असे राणे यांनी याचिकेत म्हटले आहे. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाCourtन्यायालय