शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

साईबाबांच्या निर्वाणाची आज शताब्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 06:43 IST

शुक्रवारी सोहळयाचा समारोप : पंतप्रधान राहणार उपस्थित

- प्रमोद आहेर 

शिर्डी : जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या महानिर्वाणाला सोमवारी शंभर वर्षे होत आहेत़ सोमवारी विविध कार्यक्रम होणार आहेत.

नित्यनेमाने फेरीला जाणारे बाबा २८ सप्टेंबर १९१८ रोजी दोन-तीन दिवस तापाने आजारी पडले. त्यानंतर त्यांनी अन्न जवळपास वर्ज्य केले. बाबांनी २ आॅक्टोबरपासून द्वारकामाईत वझे नावाच्या भक्ताकडून रामविजय ग्रंथाची दोन पारायणे करवून घेतली. त्यानंतर बाबांनी ११ आॅक्टोबरला वझे यांना श्रीफळ व दक्षिणा देऊन पोथीची समाप्ती केली.

भिक्षेला जाताना बापूसाहेब बुटी व निमोणकर यांना बाबांना जवळपास उचलूनच न्यावे लागे. १३ आॅक्टोबरपासून सकाळची भिक्षा बंद झाली होती.१५ आॅक्टोबरला दुपारच्या आरतीनंतर बाबांनी नेहमी आपल्याबरोबर मशिदीत जेवणाºया बापूसाहेब बुटी, काकासाहेब दीक्षित आदी मंडळींना घरोघर जेवणासाठी पाठवून दिले. बाबांनी अंतसमयी लक्ष्मीबाई शिंदे यांना खिशातून नऊ रूपये काढून दिले व थोड्या वेळाने म्हणू लागले, ‘अरे मला आता इथे बरे वाटत नाही, दगडी वाड्यात (बुटीवाडा) घेऊन चला म्हणजे बरे वाटेल!’ हीच बाबांची शेवटची आज्ञा. बाबांनी त्यानंतर बयाजी कोतेंच्या अंगावर टेकून प्राण सोडला.वर्षभर उपक्रमशताब्दी वर्षाचा राष्ट्रपतींच्या हस्ते प्रारंभ झाला होता, तर समारोप पंतप्रधानांच्या उपस्थितीत १९ आॅक्टोबरला होत आहे. साई संस्थानने साई पादुकांचा देश-विदेशातही वर्षभर दौरा आयोजित केला होता. राज्य सरकारने मात्र शताब्दी वर्षात शिर्डीच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी दिला नाही.

टॅग्स :Saibaba Mandirसाईबाबा मंदिरsaibabaसाईबाबा