शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

तंबाखूमुळे वर्षाला १ टक्का नागरिकांचा होतो मृत्यू

By admin | Updated: May 31, 2016 02:19 IST

भारतामध्ये दर वर्षी जवळपास १ टक्के लोकांचा मृत्यू हा तंबाखू सेवनामुळे होतो. जर २०२० पर्यंत ही परिस्थिती बदलली नाही, तर तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा १३ टक्क्यांपर्यंत पोहोचेल

पुणे : भारतामध्ये दर वर्षी जवळपास १ टक्के लोकांचा मृत्यू हा तंबाखू सेवनामुळे होतो. जर २०२० पर्यंत ही परिस्थिती बदलली नाही, तर तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा १३ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. धूम्रपान जगभरामध्ये मानवी आरोग्याला असणाऱ्या महत्त्वाच्या धोक्यांपैकी एक असल्याचेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. सिगारेट, सिगार व तंबाखूची इतर उत्पादने धोकादायक व व्यसन लावणारी असतात. तंबाखूमधील निकोटिन हा घटक मेंदूतल्या रसायनांची पातळी वाढवतो व त्याचे व्यसन लावतो.तंबाखूसेवन करणारे लोक हे त्यांच्या आरोग्याबरोबर दुसऱ्यांचे आरोग्य धोक्यात टाकतात. सुमारे २७ टक्के युवक सिगारेटच्या धुराचा त्रास घरी सहन करतात व ४० टक्के युवक धुराचा त्रास हा सार्वजनिक जागेमध्ये सहन करतात.एका सर्वेक्षणानुसार भारताच्या एकूण लोकसंख्येतील २२७ दशलक्ष लोक तंबाखूचं सेवन करतात. यामध्ये ४७ टक्के पुरुष, २० टक्के महिला व १२ टक्के युवकांचा समावेश आहे.त्यामुळे अशाप्रकारच्या समस्येला सामोरे जायचे नसेल, तर सिगारेटचे व्यसन सोडणे गरजेचे आहे. सिगारेट सोडणे हा एका दिवसाचा चमत्कार नसून त्यासाठी सातत्याने चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. याबाबत डॉ. तुषार पाटील म्हणाले, की मेग्नेशियमकार्बोनेट हा तंबाखूमधील सर्वांत हानीकारक घटक आहे. त्यामुळे कर्करोग व तंबाखूशी संबंधित रोगांशी लढण्यासाठी जीवनशैलीतील बदल आवश्यक आहेत. डॉ. बर्नार्ड फॅदम म्हणाले, की कर्करोगानंतर किडनीचे आजार, दातांचे आजार, वंधत्वदेखील तंबाखूसेवनामुळे येऊ शकते.तंबाखूच्या सेवनाने श्वसननलिकेत बिघाड होऊन, कफ, अशक्तपणा, रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे असेही आजार होऊ शकतात. तंबाखूमध्ये असलेल्या निकोटीनमुळे होणाऱ्या समस्यांमध्ये दीर्घकालीन रक्तदाबाचे विकार, अल्सर तसेच दातांच्या आजारांचा समावेश आहे. तसेच विशिष्ट कालावधीनंतर निकोटिन न मिळाल्यामुळे नैराश्य, वजन वाढणे, अस्वस्थता, निद्रानाश, तसेच तंबाखूसाठी तीव्र इच्छा होण्याचे प्रमाण वाढणे अशा समस्या जाणवतात. तंबाखूमुळे श्वसनसंस्था, मेंदू, हृदय, तसेच रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होतात.पुण्यातील एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार सिगारेटमुळे सीओपीडी या आजाराचा धोका सर्वाधिक आहे. सीओपीडी हे महाराष्ट्रातील मृत्यूचे सर्वांत मोठे कारण आहे. याबरोबरच महिलांमध्ये वाढत असलेल्या वंध्यत्वाच्या समस्येलाही तंबाखू हे एक मोठे कारण असल्याचे या सर्वेक्षणातील निष्कर्षांवरून समजते. सिगारेट ओढणे हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सर्वांत प्रमुख कारण आहे. एका वर्षात तंबाखूमुळे कर्करोग होणाऱ्या ३० ते ५० वयोगटातील १५० हून अधिक रुग्णांवर उपचार करावे लागतात, ही खेदाची बाब आहे. - डॉ. विनोद गोरे, कर्करोग शस्त्रक्रियातज्ज्ञ