शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

वाघ जगवायचा, हत्ती पाेसायचा की माणूस वाचवायचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 14:37 IST

एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत वाघाने १० बळी घेतले आहेत. 

राजेश शेगाेकार, वृत्तसंपादक, नागपूर -वाढत्या वनवैभवामुळे, टायगर कॅपिटल असे बिरूद मिरवण्याचा मान विदर्भाला मिळाला असला तरी मानव वन्यजिवांच्या संघर्षात शेकडाे निरपराध नागरिकांची अडकलेली ‘मान’ साेडवायची कशी, असा प्रश्न आता गंभीर झाला आहे. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत वाघाने १० बळी घेतले आहेत. 

भारतीय वन्यजीव संस्था व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार देशात ३,१६७ वाघ आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक  ४४६ वाघ आहेत. विशेष म्हणजे, विदर्भात वाघांची संख्या २३ टक्क्यांनी वाढली आहे. सर्वाधिक २०६ ते २४८ वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात असून ६२५ चौ. कि. मी. वनक्षेत्रात पसरलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा वाघांसाठी सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास ठरला आहे.  वाघांचे हे वैभव जगभरात मिरवत असतानाच स्थानिक पातळीवर मात्र  मानव व वन्यजीव संघर्ष माेठा आहे. त्यात आता हत्तींचीही भर पडली आहे. 

‘घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे’ अशी एक म्हण आपल्याकडे आहे. आधीच घरात अनेक जनावरे आहेत, त्यांचीच व्यवस्था नीट हाेत नाही त्यात व्याह्यांकडून थेट घाेडेच सांभाळण्यासाठी पाठविल्यावर व्याह्यांना नाही म्हणता येत नाही अन् त्यांना सांभाळताना नवीनच संकट उभे राहते, अशी विचित्र स्थिती निर्माण हाेते. नेमका असाच अनुभव गडचिराेली, गाेंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना येत आहे. या भागात सरकार नावाच्या व्याह्याकडून घाेड्यांऐवजी थेट हत्तीच पाठविल्याने नव्या संकटाची भर पडली आहे.

काय केल्या आहेत उपाययोजनाचंद्रपूरच्या सीताराम पेठ येथे आभासी भिंतीचा प्रयोग तयार केला. या गावाभोवती सहा कॅमेरे वापरून संरक्षण भिंत तयार केली मानवासाठी धोकादायक ठरलेल्या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावणे, त्याचा मागोवा घेणे, लोकांत जनजागृती  वाघाचे अस्तित्व असलेल्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला जातो.एकाच वाघाकडून सतत हल्ले होत असतील तर घटनेचे स्वरूप पाहून जेरबंद केले जाते गस्त घालण्यासाठी गावातील युवकांची प्रायमरी रिस्पॉन्स टिम तयार केल्या. गावकऱ्यांचे जंगलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी श्यामा प्रसाद मुखर्जीसह अनेक योजनांचा अंमल.

४६ हजार काेटींचा फटका- ग्रामीण भागाची वनांबरोबर असलेली सहजीवनाची भूमिका लोप पावली असतानाच वाघांच्या संवर्धनासाठी १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प ही योजना अमलात आली. - आज भारतात एकूण ५० व्याघ्र प्रकल्प आहेत. वाघांचे संवर्धन झाले. मात्र संघर्षही वाढला. मानव व वन्यजीव संघर्षात मृत्युमुखी पडलेल्यांना मदतीच्या पाेटी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात तब्बल ४६ हजार काेटींचा खर्च राज्य शासनाला करावा लागला आहे.  

झुंजीही वाढल्या अन् शिकारीहीमानव-वन्यजीव संघर्षासोबतच वाघांच्या झुंजींत वाढ झाली आहे. यामध्ये वाघांचे मृत्यूही होत आहेत. अलीकडेच ताडोबाच्या बफरमध्ये येत असलेल्या चंद्रपूर वन परिक्षेत्रातील झुंजीत दोन्ही वाघांचा मृत्यू झाला. दुसरीकडे वाघांपासून संरक्षण करण्यासाठी शेतात लावण्यात येणारे विद्युतप्रवाह हेसुद्धा प्राण्यांच्या जिवावर उठले असून, १० वाघ विद्युतप्रवाहाचे बळी ठरले आहेत. 

गडचिरोली जिल्ह्यात दुहेरी मरण- मुळातच जंगलव्याप्त गडचिराेली जिल्ह्यात १९८० ते ९० च्या दशकात वाघांचा वावर हाेता. शिकारींमुळे वाघांची संख्या घटली. २०१० पर्यंत वाघांच्या पाऊलखुणाही नव्हत्या.  - चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातून वडसा वन विभागात वाघ स्थलांतरित झाले. त्यानंतर २०१९ पासून जिल्ह्यात आरमाेरी वन परिक्षेत्रापासून वाघांच्या हल्ल्यास सुरुवात झाली. - ऑक्टाेबर २०२१ मध्ये ओडिशातील २५ ते २६ रानटी हत्तींनी छत्तीसगडमधून गडचिराेलीत प्रवेश केला. दीड वर्षापूर्वी हत्ती छत्तीसगड राज्यात गेले हाेते. दाेन वर्षांत वाघाने ११, तर हत्तींनी ९ बळी घेतले आहेत. 

टॅग्स :Tigerवाघ