शहरं
Join us  
Trending Stories
1
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
2
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
3
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
4
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
5
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
6
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
7
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
8
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
9
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
10
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
11
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
12
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
13
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
14
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
15
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
16
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
17
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
18
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
19
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
20
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना

वाघ जगवायचा, हत्ती पाेसायचा की माणूस वाचवायचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 14:37 IST

एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत वाघाने १० बळी घेतले आहेत. 

राजेश शेगाेकार, वृत्तसंपादक, नागपूर -वाढत्या वनवैभवामुळे, टायगर कॅपिटल असे बिरूद मिरवण्याचा मान विदर्भाला मिळाला असला तरी मानव वन्यजिवांच्या संघर्षात शेकडाे निरपराध नागरिकांची अडकलेली ‘मान’ साेडवायची कशी, असा प्रश्न आता गंभीर झाला आहे. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत वाघाने १० बळी घेतले आहेत. 

भारतीय वन्यजीव संस्था व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार देशात ३,१६७ वाघ आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक  ४४६ वाघ आहेत. विशेष म्हणजे, विदर्भात वाघांची संख्या २३ टक्क्यांनी वाढली आहे. सर्वाधिक २०६ ते २४८ वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात असून ६२५ चौ. कि. मी. वनक्षेत्रात पसरलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा वाघांसाठी सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास ठरला आहे.  वाघांचे हे वैभव जगभरात मिरवत असतानाच स्थानिक पातळीवर मात्र  मानव व वन्यजीव संघर्ष माेठा आहे. त्यात आता हत्तींचीही भर पडली आहे. 

‘घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे’ अशी एक म्हण आपल्याकडे आहे. आधीच घरात अनेक जनावरे आहेत, त्यांचीच व्यवस्था नीट हाेत नाही त्यात व्याह्यांकडून थेट घाेडेच सांभाळण्यासाठी पाठविल्यावर व्याह्यांना नाही म्हणता येत नाही अन् त्यांना सांभाळताना नवीनच संकट उभे राहते, अशी विचित्र स्थिती निर्माण हाेते. नेमका असाच अनुभव गडचिराेली, गाेंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना येत आहे. या भागात सरकार नावाच्या व्याह्याकडून घाेड्यांऐवजी थेट हत्तीच पाठविल्याने नव्या संकटाची भर पडली आहे.

काय केल्या आहेत उपाययोजनाचंद्रपूरच्या सीताराम पेठ येथे आभासी भिंतीचा प्रयोग तयार केला. या गावाभोवती सहा कॅमेरे वापरून संरक्षण भिंत तयार केली मानवासाठी धोकादायक ठरलेल्या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावणे, त्याचा मागोवा घेणे, लोकांत जनजागृती  वाघाचे अस्तित्व असलेल्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला जातो.एकाच वाघाकडून सतत हल्ले होत असतील तर घटनेचे स्वरूप पाहून जेरबंद केले जाते गस्त घालण्यासाठी गावातील युवकांची प्रायमरी रिस्पॉन्स टिम तयार केल्या. गावकऱ्यांचे जंगलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी श्यामा प्रसाद मुखर्जीसह अनेक योजनांचा अंमल.

४६ हजार काेटींचा फटका- ग्रामीण भागाची वनांबरोबर असलेली सहजीवनाची भूमिका लोप पावली असतानाच वाघांच्या संवर्धनासाठी १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प ही योजना अमलात आली. - आज भारतात एकूण ५० व्याघ्र प्रकल्प आहेत. वाघांचे संवर्धन झाले. मात्र संघर्षही वाढला. मानव व वन्यजीव संघर्षात मृत्युमुखी पडलेल्यांना मदतीच्या पाेटी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात तब्बल ४६ हजार काेटींचा खर्च राज्य शासनाला करावा लागला आहे.  

झुंजीही वाढल्या अन् शिकारीहीमानव-वन्यजीव संघर्षासोबतच वाघांच्या झुंजींत वाढ झाली आहे. यामध्ये वाघांचे मृत्यूही होत आहेत. अलीकडेच ताडोबाच्या बफरमध्ये येत असलेल्या चंद्रपूर वन परिक्षेत्रातील झुंजीत दोन्ही वाघांचा मृत्यू झाला. दुसरीकडे वाघांपासून संरक्षण करण्यासाठी शेतात लावण्यात येणारे विद्युतप्रवाह हेसुद्धा प्राण्यांच्या जिवावर उठले असून, १० वाघ विद्युतप्रवाहाचे बळी ठरले आहेत. 

गडचिरोली जिल्ह्यात दुहेरी मरण- मुळातच जंगलव्याप्त गडचिराेली जिल्ह्यात १९८० ते ९० च्या दशकात वाघांचा वावर हाेता. शिकारींमुळे वाघांची संख्या घटली. २०१० पर्यंत वाघांच्या पाऊलखुणाही नव्हत्या.  - चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातून वडसा वन विभागात वाघ स्थलांतरित झाले. त्यानंतर २०१९ पासून जिल्ह्यात आरमाेरी वन परिक्षेत्रापासून वाघांच्या हल्ल्यास सुरुवात झाली. - ऑक्टाेबर २०२१ मध्ये ओडिशातील २५ ते २६ रानटी हत्तींनी छत्तीसगडमधून गडचिराेलीत प्रवेश केला. दीड वर्षापूर्वी हत्ती छत्तीसगड राज्यात गेले हाेते. दाेन वर्षांत वाघाने ११, तर हत्तींनी ९ बळी घेतले आहेत. 

टॅग्स :Tigerवाघ