शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे यांच्या विधानांमागील षडयंत्राचा योग्य वेळी पर्दाफाश; शिंदे, फडणवीसांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 05:39 IST

कायदा- सुव्यवस्था बिघडविण्यासाठी जे जबाबदार असतील त्यांना माफ केले जाणार नाही, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मनोज जरांगे पाटील हे शरद पवार, उद्धव ठाकरे यांची स्क्रिप्ट बोलत आहेत. त्यांच्या विधानांमागील षडयंत्राचा लवकरच पर्दाफाश होईल, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्र परिषदेत केला. कायदा- सुव्यवस्था बिघडविण्यासाठी जे जबाबदार असतील त्यांना माफ केले जाणार नाही, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले.

मुख्यमंत्री म्हणाले, अराजकता पसरविण्याचे काही लोकांचे कारस्थान आहे. जे काही चालले आहे त्याबाबतची माहिती सरकारला नाही असे समजू नका, गृह खात्याला सगळे कळते. जनता समजदार आहे. मराठा आंदोलनाला गालबोट लावण्याचे काम जे कोणी करत असेल त्यांच्यापासून समाजाने सावध राहिले पाहिजे. जरांगे पाटील प्रामाणिकपणे समाजाची बाजू मांडत असताना मी स्वतः जालन्याला जाऊन त्यांना भेटलो, नवी मुंबईत गेलो. १० टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर केला. सारथी तसेच समाजासाठीच्या महामंडळाला मोठे बळ दिले. मात्र, आज जरांगे यांची भाषा राजकीय वाटत आहे. त्यांचा बोलविता धनी कोणीतरी आहे, याचा वास येत आहे, असा संशय शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबद्दल ते खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्र अशी भाषा सहन करत नाही. हे लक्षात ठेवा. कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. प्रत्येकाने मर्यादित राहिले पाहिजे, फडणवीस यांच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत. ते मुख्यमंत्री असताना दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात व ते मुख्यमंत्री असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही टिकले. नंतरच्या सरकारने ते घालविले, असे शिंदे म्हणाले.

'माझ्यावरील आरोपांवर समाजाचा विश्वास नाही'

  • मनोज जरांगे पाटील यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत त्यावर मराठा समाजाचा विश्वास नाही, मी या समाजासाठी मुख्यमंत्री असताना आणि नंतरही काय काय केले याची समाजाला पूर्ण कल्पना आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 
  • पत्र परिषदेत ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री असेपर्यंत उच्च न्यायालयातच नाही तर सर्वोच्च न्यायालयातही मराठा आरक्षण टिकले. माझ्यावर नैराश्यातून आरोप केले जात आहेत. हे आरोप बिनबुडाचे आहेत आणि हे समाजालाही कळते. सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत समाजासाठी अनेक योजना माझ्या काळात सुरू झाल्या.
  • जी स्क्रिप्ट आतापर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे बोलत होते तीच जरांगे पाटील यांनी का बोलावी, हा प्रश्न मला पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेच आहे की आमच्याकडे माहिती आहे. योग्यवेळी काय ते बाहेर नक्कीच येईल.
  • कायदा कोणी हातात घेणार असेल तर पोलिसांना कारवाई करावीच लागेल. फडणवीस मला सलाइनमधून विष देणार होते या जरांगे पाटील यांच्या आरोपाबाबत फडणवीस यांनी, 'तुमचा तरी यावर विश्वास आहे का', असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण