शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे यांच्या विधानांमागील षडयंत्राचा योग्य वेळी पर्दाफाश; शिंदे, फडणवीसांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 05:39 IST

कायदा- सुव्यवस्था बिघडविण्यासाठी जे जबाबदार असतील त्यांना माफ केले जाणार नाही, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मनोज जरांगे पाटील हे शरद पवार, उद्धव ठाकरे यांची स्क्रिप्ट बोलत आहेत. त्यांच्या विधानांमागील षडयंत्राचा लवकरच पर्दाफाश होईल, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्र परिषदेत केला. कायदा- सुव्यवस्था बिघडविण्यासाठी जे जबाबदार असतील त्यांना माफ केले जाणार नाही, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले.

मुख्यमंत्री म्हणाले, अराजकता पसरविण्याचे काही लोकांचे कारस्थान आहे. जे काही चालले आहे त्याबाबतची माहिती सरकारला नाही असे समजू नका, गृह खात्याला सगळे कळते. जनता समजदार आहे. मराठा आंदोलनाला गालबोट लावण्याचे काम जे कोणी करत असेल त्यांच्यापासून समाजाने सावध राहिले पाहिजे. जरांगे पाटील प्रामाणिकपणे समाजाची बाजू मांडत असताना मी स्वतः जालन्याला जाऊन त्यांना भेटलो, नवी मुंबईत गेलो. १० टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर केला. सारथी तसेच समाजासाठीच्या महामंडळाला मोठे बळ दिले. मात्र, आज जरांगे यांची भाषा राजकीय वाटत आहे. त्यांचा बोलविता धनी कोणीतरी आहे, याचा वास येत आहे, असा संशय शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबद्दल ते खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्र अशी भाषा सहन करत नाही. हे लक्षात ठेवा. कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. प्रत्येकाने मर्यादित राहिले पाहिजे, फडणवीस यांच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत. ते मुख्यमंत्री असताना दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात व ते मुख्यमंत्री असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही टिकले. नंतरच्या सरकारने ते घालविले, असे शिंदे म्हणाले.

'माझ्यावरील आरोपांवर समाजाचा विश्वास नाही'

  • मनोज जरांगे पाटील यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत त्यावर मराठा समाजाचा विश्वास नाही, मी या समाजासाठी मुख्यमंत्री असताना आणि नंतरही काय काय केले याची समाजाला पूर्ण कल्पना आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 
  • पत्र परिषदेत ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री असेपर्यंत उच्च न्यायालयातच नाही तर सर्वोच्च न्यायालयातही मराठा आरक्षण टिकले. माझ्यावर नैराश्यातून आरोप केले जात आहेत. हे आरोप बिनबुडाचे आहेत आणि हे समाजालाही कळते. सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत समाजासाठी अनेक योजना माझ्या काळात सुरू झाल्या.
  • जी स्क्रिप्ट आतापर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे बोलत होते तीच जरांगे पाटील यांनी का बोलावी, हा प्रश्न मला पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेच आहे की आमच्याकडे माहिती आहे. योग्यवेळी काय ते बाहेर नक्कीच येईल.
  • कायदा कोणी हातात घेणार असेल तर पोलिसांना कारवाई करावीच लागेल. फडणवीस मला सलाइनमधून विष देणार होते या जरांगे पाटील यांच्या आरोपाबाबत फडणवीस यांनी, 'तुमचा तरी यावर विश्वास आहे का', असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण