शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

बालाश्रम, वृद्धाश्रमांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: January 22, 2016 01:56 IST

केंद्र शासनाकडून कल्याणकारी योजनेअंतर्गत सामाजिक संस्था, शासकीय वसतिगृह, वृद्धाश्रम, बालाश्रमांना पुरवठा करण्यात येणारे धान्य आॅक्टोबरपासून बंद करण्यात आले आहे

पुणे : केंद्र शासनाकडून कल्याणकारी योजनेअंतर्गत सामाजिक संस्था, शासकीय वसतिगृह, वृद्धाश्रम, बालाश्रमांना पुरवठा करण्यात येणारे धान्य आॅक्टोबरपासून बंद करण्यात आले आहे. यामुळे शहरातील सुमारे २३ सामाजिक संस्थांच्या वसतिगृहातील मुले, वृद्ध व्यक्ती, लहान मुलांना दोन वेळचे अन्न देण्यासाठी खासगी व्यक्तींकडे हात पसरून ‘कोणी धान्य देता का धान्य’ म्हण्याची वेळ आली आहे.शासनाच्या वतीने कल्याणकारी योजनेअंतर्गत शहर आणि जिल्ह्यातील सामाजिक संस्था, वसतिगृह, वृद्धाश्रम, कारागृह, बालाश्रम, आश्रमशाळांना दर महिन्याला रेशनिंगवर मिळणारे धान्य उपलब्ध करून दिले जाते. यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने धान्याची मागणी असणाऱ्या संस्थांना रेशनकार्डप्रमाणे स्वतंत्र ‘अस्थापना कार्ड’ उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये संस्था, वसतिगृहात असलेल्या मुले, व्यक्तींना एका व्यक्तीमागे पाच किलो गहू व तांदूळ उपलब्ध करून दिले जाते. हे धान्य रेशनिंगवर मिळणाऱ्या दरामध्येच म्हणजे २ रुपये किलो गहू आणि ३ रुपये किलो तांदूळ या दराने उपलब्ध करून दिले जाते.यासाठी राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याकडे कल्याणकारी योजनेअंतर्गत किती धान्याची मागणी आहे याचा प्रस्ताव मागविला जातो. त्यानंतर राज्य शासन हा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवते आणि केंद्राकडून मागणीप्रमाणे धान्य उपलब्ध करून दिले जाते. परंतु राज्य शासनाने आॅक्टोबर महिन्यापासून असा प्रस्तावच केंद्राकडे पाठविलेला नसल्याने धान्य उपलब्ध करून दिलेले नाही. शहर अन्नधान्य वितरण विभागाच्या वतीने पुणे शहरातील सुमारे २३ संस्थांना या योजनेअंतर्गत धान्य उपलब्ध करून दिले जाते. गेल्या काही महिन्यांपासून या संस्था पुरवठा विभागाकडे दररोज हेलपाटे मारत आहेत. परंतु शासनाकडून धान्यच आले नसल्याने आम्ही तुम्हाला धान्य उपलब्ध करून देऊ शकत नाही, असे उत्तर ऐकावे लागत आहे. या संस्थांना आॅक्टोबर महिन्यापासून धान्य न मिळाल्याने संस्थेमधील मुले, व्यक्तींवर उपासमारीची वेळ आली आहे.तीन रुपये किलोचा तांदूळ २५ रुपये किलोने घेण्याची वेळहमाल पंचायतीच्या वतीने ‘कष्टकऱ्याची भाकरी’ नावाने गोरगरिबांसाठी स्वस्तात जेवण उपलब्ध करून दिले जाते. यासाठी शासनाकडून २ रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध करून दिले जाते. शासनाकडून आॅगस्टमध्ये ३५ क्विंटल गहू व ९० क्व्ािंटल तांदूळ उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर धान्यच आले नाही, तर कोठून देणार, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात येते. परंतु यामुळे तीन रुपये किलोचे तांदूळ २५ रुपये दराने खरेदीची वेळ आली असल्याचे, दिलीप मानकर यांनी सांगितले.धान्य न मिळाल्याने अनेक अडचणी पुणे शहरातील विद्यार्थी सहायक समितीलादेखील शासनाच्या कल्याणकारी योजनेंतर्गत धान्य उपलब्ध करून दिले जाते. वसतिगृहात सुमारे ७००पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. खुल्या बाजारातून धान्य घेणे समितीला परवडणारे नाही. यामुळे शासनाने धान्य उपलब्ध करून द्यावे, यासाठी पुरवठा विभागाला अर्ज दिला आहे. - प्रभाकर पाटील, संचालक विद्यार्थी सहायक समिती