शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

बालाश्रम, वृद्धाश्रमांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: January 22, 2016 01:56 IST

केंद्र शासनाकडून कल्याणकारी योजनेअंतर्गत सामाजिक संस्था, शासकीय वसतिगृह, वृद्धाश्रम, बालाश्रमांना पुरवठा करण्यात येणारे धान्य आॅक्टोबरपासून बंद करण्यात आले आहे

पुणे : केंद्र शासनाकडून कल्याणकारी योजनेअंतर्गत सामाजिक संस्था, शासकीय वसतिगृह, वृद्धाश्रम, बालाश्रमांना पुरवठा करण्यात येणारे धान्य आॅक्टोबरपासून बंद करण्यात आले आहे. यामुळे शहरातील सुमारे २३ सामाजिक संस्थांच्या वसतिगृहातील मुले, वृद्ध व्यक्ती, लहान मुलांना दोन वेळचे अन्न देण्यासाठी खासगी व्यक्तींकडे हात पसरून ‘कोणी धान्य देता का धान्य’ म्हण्याची वेळ आली आहे.शासनाच्या वतीने कल्याणकारी योजनेअंतर्गत शहर आणि जिल्ह्यातील सामाजिक संस्था, वसतिगृह, वृद्धाश्रम, कारागृह, बालाश्रम, आश्रमशाळांना दर महिन्याला रेशनिंगवर मिळणारे धान्य उपलब्ध करून दिले जाते. यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने धान्याची मागणी असणाऱ्या संस्थांना रेशनकार्डप्रमाणे स्वतंत्र ‘अस्थापना कार्ड’ उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये संस्था, वसतिगृहात असलेल्या मुले, व्यक्तींना एका व्यक्तीमागे पाच किलो गहू व तांदूळ उपलब्ध करून दिले जाते. हे धान्य रेशनिंगवर मिळणाऱ्या दरामध्येच म्हणजे २ रुपये किलो गहू आणि ३ रुपये किलो तांदूळ या दराने उपलब्ध करून दिले जाते.यासाठी राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याकडे कल्याणकारी योजनेअंतर्गत किती धान्याची मागणी आहे याचा प्रस्ताव मागविला जातो. त्यानंतर राज्य शासन हा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवते आणि केंद्राकडून मागणीप्रमाणे धान्य उपलब्ध करून दिले जाते. परंतु राज्य शासनाने आॅक्टोबर महिन्यापासून असा प्रस्तावच केंद्राकडे पाठविलेला नसल्याने धान्य उपलब्ध करून दिलेले नाही. शहर अन्नधान्य वितरण विभागाच्या वतीने पुणे शहरातील सुमारे २३ संस्थांना या योजनेअंतर्गत धान्य उपलब्ध करून दिले जाते. गेल्या काही महिन्यांपासून या संस्था पुरवठा विभागाकडे दररोज हेलपाटे मारत आहेत. परंतु शासनाकडून धान्यच आले नसल्याने आम्ही तुम्हाला धान्य उपलब्ध करून देऊ शकत नाही, असे उत्तर ऐकावे लागत आहे. या संस्थांना आॅक्टोबर महिन्यापासून धान्य न मिळाल्याने संस्थेमधील मुले, व्यक्तींवर उपासमारीची वेळ आली आहे.तीन रुपये किलोचा तांदूळ २५ रुपये किलोने घेण्याची वेळहमाल पंचायतीच्या वतीने ‘कष्टकऱ्याची भाकरी’ नावाने गोरगरिबांसाठी स्वस्तात जेवण उपलब्ध करून दिले जाते. यासाठी शासनाकडून २ रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध करून दिले जाते. शासनाकडून आॅगस्टमध्ये ३५ क्विंटल गहू व ९० क्व्ािंटल तांदूळ उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर धान्यच आले नाही, तर कोठून देणार, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात येते. परंतु यामुळे तीन रुपये किलोचे तांदूळ २५ रुपये दराने खरेदीची वेळ आली असल्याचे, दिलीप मानकर यांनी सांगितले.धान्य न मिळाल्याने अनेक अडचणी पुणे शहरातील विद्यार्थी सहायक समितीलादेखील शासनाच्या कल्याणकारी योजनेंतर्गत धान्य उपलब्ध करून दिले जाते. वसतिगृहात सुमारे ७००पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. खुल्या बाजारातून धान्य घेणे समितीला परवडणारे नाही. यामुळे शासनाने धान्य उपलब्ध करून द्यावे, यासाठी पुरवठा विभागाला अर्ज दिला आहे. - प्रभाकर पाटील, संचालक विद्यार्थी सहायक समिती