शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळळा, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

यंदाही मुलींची बाजी

By admin | Updated: May 31, 2017 05:01 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८९.५० टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ३ टक्क्यांनी वाढली आहे. निकालामध्ये यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला असून पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर तर मुंबई विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी बुधवारी सकाळी निकालाची माहिती दिली. या वेळी मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता आॅनलाइन निकाल उपलब्ध करून देण्यात आले. परीक्षा मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागांमध्ये अव्वल ठरण्याची परंपरा कोकण विभागाने यंदा कायम राखली आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमाच्या एकूण १४ लाख २९ हजार ४७८ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी १२ लाख ७९ हजार ४०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी ७३ हजार ९२६ पुनर्परीक्षार्थींपैकी २९ हजार ७७९ उत्तीर्ण झाले असून, त्यांच्या निकालाची टक्केवारी ४०.८३ टक्के इतकी आहे. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९३.०१ टक्के लागला आहे. गुणपत्रिका मिळणार ९ जूनला आॅनलाइन निकाल जाहीर झाला तरी गुणपत्रिका ९ जून रोजी दुपारी ३ वाजता कॉलेजात मिळेल. गुणपडताळणीसाठी ३१ मे ते ९ जून या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. आजपासून करता येणार गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्जपरीक्षेचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्यानंतर लगेचच आजपासून (बुधवार) गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी आवश्यक अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. गुणपडताळणीसाठी गुणपत्रिकेच्या स्वयंसाक्षांकित प्रतीसह ३१ मे ते ९ जूनपर्यंत विहीत शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी प्रति विषय ४०० रुपये शुल्क रोखीने अथवा डिमांड ड्राफ्टने मंडळाकडे जमा करावे लागेल.फेरपरीक्षा ११ जुलैलानापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष फुकट जाऊ नये, म्हणून दहावीप्रमाणे यंदा बारावीच्या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. फेरपरीक्षा ११ जुलै रोजी घेण्यात येईल, असे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी जाहीर केले.ठळक वैशिष्ट्ये मुलींच्या निकालातील दबदबा कायम, एकूण ९३.०५ टक्के उत्तीर्णमुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.६५%अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९३.०१%एकूण १६२ विषयांची परीक्षा झाली, त्यापैकी ११ विषयांत सर्व मुले पासखासगीरीत्या परीक्षेत बसलेले ६८.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्णविज्ञान शाखेतील ९५.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेतवाणिज्य शाखेतील ९०.५७%कला शाखेतून ८१.९१ %व्यवसाय अभ्यासक्रम ८६.२७%खासगीरीत्या परीक्षा देणाऱ्यांपैकी ६८.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.