शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

यंदाही मुलींची बाजी

By admin | Updated: May 31, 2017 05:01 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८९.५० टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ३ टक्क्यांनी वाढली आहे. निकालामध्ये यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला असून पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर तर मुंबई विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी बुधवारी सकाळी निकालाची माहिती दिली. या वेळी मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता आॅनलाइन निकाल उपलब्ध करून देण्यात आले. परीक्षा मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागांमध्ये अव्वल ठरण्याची परंपरा कोकण विभागाने यंदा कायम राखली आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमाच्या एकूण १४ लाख २९ हजार ४७८ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी १२ लाख ७९ हजार ४०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी ७३ हजार ९२६ पुनर्परीक्षार्थींपैकी २९ हजार ७७९ उत्तीर्ण झाले असून, त्यांच्या निकालाची टक्केवारी ४०.८३ टक्के इतकी आहे. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९३.०१ टक्के लागला आहे. गुणपत्रिका मिळणार ९ जूनला आॅनलाइन निकाल जाहीर झाला तरी गुणपत्रिका ९ जून रोजी दुपारी ३ वाजता कॉलेजात मिळेल. गुणपडताळणीसाठी ३१ मे ते ९ जून या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. आजपासून करता येणार गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्जपरीक्षेचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्यानंतर लगेचच आजपासून (बुधवार) गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी आवश्यक अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. गुणपडताळणीसाठी गुणपत्रिकेच्या स्वयंसाक्षांकित प्रतीसह ३१ मे ते ९ जूनपर्यंत विहीत शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी प्रति विषय ४०० रुपये शुल्क रोखीने अथवा डिमांड ड्राफ्टने मंडळाकडे जमा करावे लागेल.फेरपरीक्षा ११ जुलैलानापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष फुकट जाऊ नये, म्हणून दहावीप्रमाणे यंदा बारावीच्या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. फेरपरीक्षा ११ जुलै रोजी घेण्यात येईल, असे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी जाहीर केले.ठळक वैशिष्ट्ये मुलींच्या निकालातील दबदबा कायम, एकूण ९३.०५ टक्के उत्तीर्णमुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.६५%अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९३.०१%एकूण १६२ विषयांची परीक्षा झाली, त्यापैकी ११ विषयांत सर्व मुले पासखासगीरीत्या परीक्षेत बसलेले ६८.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्णविज्ञान शाखेतील ९५.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेतवाणिज्य शाखेतील ९०.५७%कला शाखेतून ८१.९१ %व्यवसाय अभ्यासक्रम ८६.२७%खासगीरीत्या परीक्षा देणाऱ्यांपैकी ६८.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.