शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही मुलींची बाजी

By admin | Updated: May 31, 2017 05:01 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८९.५० टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ३ टक्क्यांनी वाढली आहे. निकालामध्ये यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला असून पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर तर मुंबई विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी बुधवारी सकाळी निकालाची माहिती दिली. या वेळी मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता आॅनलाइन निकाल उपलब्ध करून देण्यात आले. परीक्षा मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागांमध्ये अव्वल ठरण्याची परंपरा कोकण विभागाने यंदा कायम राखली आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमाच्या एकूण १४ लाख २९ हजार ४७८ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी १२ लाख ७९ हजार ४०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी ७३ हजार ९२६ पुनर्परीक्षार्थींपैकी २९ हजार ७७९ उत्तीर्ण झाले असून, त्यांच्या निकालाची टक्केवारी ४०.८३ टक्के इतकी आहे. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९३.०१ टक्के लागला आहे. गुणपत्रिका मिळणार ९ जूनला आॅनलाइन निकाल जाहीर झाला तरी गुणपत्रिका ९ जून रोजी दुपारी ३ वाजता कॉलेजात मिळेल. गुणपडताळणीसाठी ३१ मे ते ९ जून या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. आजपासून करता येणार गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्जपरीक्षेचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्यानंतर लगेचच आजपासून (बुधवार) गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी आवश्यक अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. गुणपडताळणीसाठी गुणपत्रिकेच्या स्वयंसाक्षांकित प्रतीसह ३१ मे ते ९ जूनपर्यंत विहीत शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी प्रति विषय ४०० रुपये शुल्क रोखीने अथवा डिमांड ड्राफ्टने मंडळाकडे जमा करावे लागेल.फेरपरीक्षा ११ जुलैलानापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष फुकट जाऊ नये, म्हणून दहावीप्रमाणे यंदा बारावीच्या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. फेरपरीक्षा ११ जुलै रोजी घेण्यात येईल, असे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी जाहीर केले.ठळक वैशिष्ट्ये मुलींच्या निकालातील दबदबा कायम, एकूण ९३.०५ टक्के उत्तीर्णमुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.६५%अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९३.०१%एकूण १६२ विषयांची परीक्षा झाली, त्यापैकी ११ विषयांत सर्व मुले पासखासगीरीत्या परीक्षेत बसलेले ६८.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्णविज्ञान शाखेतील ९५.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेतवाणिज्य शाखेतील ९०.५७%कला शाखेतून ८१.९१ %व्यवसाय अभ्यासक्रम ८६.२७%खासगीरीत्या परीक्षा देणाऱ्यांपैकी ६८.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.