शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

मराठीची श्रीमंती टिकवा

By admin | Updated: September 19, 2016 00:44 IST

ज्ञानेश्वरांपासून पुढे अनेक प्रतिभावंत साहित्यिक देणारा महाराष्ट्र यामध्ये गरीब होत चालला आहे.

पुणे : ज्ञानेश्वरांपासून पुढे अनेक प्रतिभावंत साहित्यिक देणारा महाराष्ट्र यामध्ये गरीब होत चालला आहे. राष्ट्र उभारणीसाठी शब्दांइतके मौल्यवान शस्त्र कुठलेही नाही. ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता व प्रतिभा आहे, त्यांनी ही ताकद वाया जाऊ न देता लिहिते व्हावे. मराठीला गरीब होऊ देऊ नका, तिची श्रीमंती टिकवा, असे आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रविवारी येथे केले.मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृती पुरस्कारांचे वितरण पुरंदरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. नागपूर येथील डॉ. रवींद्र शोभणे यांना साहित्य पुरस्कार तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना समाजकार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा मृणालिनी सावंत आणि कार्यकारी विश्वस्त डॉ. सागर देशपांडे व्यासपीठावर होते. शब्द हे शस्त्र आणि रत्न असल्याचे सांगून बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, ‘‘शब्दांचा संसार मांडणारे लेखक, साहित्यिकांची ताकद राष्ट्र उभारणीसाठी मौल्यवान आहे. या शब्दांचा शस्त्राइतका उपयोग केलेली माणसे दिसतात. मात्र, डोळ्यादेखत काही माणसे वाया गेलेली पाहिली आहेत. भाषेच्यादृष्टीने आपण नक्कीच श्रीमंत आहोत. शब्दांनी श्रीमंती, शौर्य दिले आहे. या ताकदीचा उपयोग झाला पाहिजे. महाराष्ट्र विनाकारण गरीब होत चालला आहे. महाराष्ट्राने ज्ञानेश्वरांपासून माडगूळकर, शिवाजीराव सावंत असे अनेक साहित्यिक दिले. पण एवढीच सीमा आहे का?, अशी खंत व्यक्त करून पुरंदरे यांनी मराठीला इतके गरीब होऊ देऊ नका. मी तुमच्यापुढे मराठीच्या श्रीमंतीसाठी झोळी पसरतोय, अशा शब्दांत कळकळीचे आवाहन केले. डॉ. मुजुमदार यांनी ‘मृत्युंजय’ने अनेक पीडित, अन्यायग्रस्तांना धीर दिल्याचे सांगितले. तर ‘मृत्युंजय’मधील कर्णाने पारधी, वडार तसेच इतर पददलितांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिल्याचे प्रभुणे म्हणाले. वाचन संस्कृतीच्या शिडीची पहिली आणि अंतिम पायरी ‘मृत्युंजय’ असल्याचे डॉ. शोभणे यांनी नमूद केले. अमिताभ सावंत यांनी सूत्रसंचालन केले. >ज्ञानाचे दरवाजे उघडायलाच हवेत‘मृत्युंजय’ कादंबरीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त पुढील वर्षभर वाचन प्रसाराचे कार्य केले जाणार आहे. त्यामध्ये राज्यभर सुमारे ५० व्याख्याने तसेच निबंध स्पर्धा, परिसंवाद, मृत्युंजयचे अभिवाचन, सर्वभाषीय लेखांचा मेळावा असे विविध उपक्रम घेतले जाणार असल्याचे डॉ. देशपांडे यांनी सांगितले.शिवाजीमहाराजांनी लिहिलेल्या एका ३० शब्दांच्या पत्रात २० शब्द पर्शियन होते. आता ही जागा इंग्रजी घेणार की काय, अशी भीती वाटू लागली आहे. ज्ञानाचे दरवाजे उघडायलाच हवेत. त्यासाठी इंग्रजीही शिकणे गरजेचे आहे. पण मराठीकडेही दुर्लक्ष होता कामा नये, असे पुरंदरे यांनी नमूद केले. शिवाजीराव सावंत यांच्याविषयीच्या काही आठवणीही पुरंदरे यांनी सांगितल्या.