शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

ताडोबा, मेळघाटात व्याघ्र संरक्षण दल!

By admin | Updated: August 29, 2015 02:06 IST

वाघांच्या संरक्षणासाठी विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्पांत व्याघ्र संरक्षण दल (टायगर प्रोटेक्शन फोर्स) स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार मेळघाट

- गणेश वासनिक, अमरावतीवाघांच्या संरक्षणासाठी विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्पांत व्याघ्र संरक्षण दल (टायगर प्रोटेक्शन फोर्स) स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार मेळघाट व ताडोबा व्याघ्र प्रकल्पांत असे दल गठित करण्यात आले आहे. प्रारंभी पाच वर्षे या संरक्षण दलावर केंद्राचे नियंत्रण राहणार असून, त्यानंतर राज्य शासनावर सर्वस्वी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.मेळघाट व ताडोबा व्याघ्र प्रकल्पांना तस्करांनी लक्ष्य केल्यानंतर केंद्र सरकारने स्वतंत्रपणे व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने या दोन्ही व्याघ्र प्रकल्पांत संरक्षण दल गठित केले गेले. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात १२०, तर मेळघाटसाठी ८१ जवान या दलात दाखल करण्यात आले आहेत. आता पेंच, बोर व नवेगाव बांध अभयारण्यात व्याघ्र संरक्षण दलाची भरती प्रक्रिया प्रस्तावित असल्याने ती लवकर पूर्ण केली जाणार आहे.साहाय्यक वनसंरक्षक, पाच वनपालांच्या मार्गदर्शनात हे दल कार्यरत राहील. शिकार रोखणे, व्याघ्र प्रकल्पांत वाघांना धोका असलेल्या बाबी निदर्शनास येताच तसा अहवाल वरिष्ठांना देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी या व्याघ्र संरक्षण दलावर सोपविण्यात आली आहे. निमलष्करी दलाचा दर्जाटायगर प्रोटेक्शन फोर्सला निमलष्करी दलाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. अतिसंरक्षित क्षेत्रात वाघांच्या संरक्षणाबाबत काही धोकादायक बाबी आढळल्यास या दलातील जवानांना थेट फायरिंग करण्याचे विशेष अधिकारदेखील प्रदान करण्यात आले आहेत. या दलाच्या जवानांकडे एसएलआर रायफल, वरिष्ठांना रिव्हॉल्व्हर, वाहन, राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्याची फार पूर्वीची मागणी आहे. उशिरा का होईना, हे दल स्थापन झाल्याने विदर्भातील वाघांना संरक्षण मिळणार आहे. या दलाकडे वाघांच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मेळघाटचे क्षेत्र संचालक दिनेशकुमार त्यागी यांनी सांगितले.या दलाला तरी कालबाह्य प्रशिक्षण नकोव्याघ्र संरक्षण दल हे केवळ वाघांच्या संरक्षणासाठी गठित करण्यात आले आहे. मात्र वनविभागात जुन्याच पद्धतीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची परंपरा असल्याने हे प्रशिक्षण व्याघ्र संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांना दिल्यास ते काहीच उपयोगी पडणार नाही. त्यामुळे या दलाला अत्याधुनिक शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.