शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

ताडोबा, मेळघाटात व्याघ्र संरक्षण दल!

By admin | Updated: August 29, 2015 02:06 IST

वाघांच्या संरक्षणासाठी विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्पांत व्याघ्र संरक्षण दल (टायगर प्रोटेक्शन फोर्स) स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार मेळघाट

- गणेश वासनिक, अमरावतीवाघांच्या संरक्षणासाठी विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्पांत व्याघ्र संरक्षण दल (टायगर प्रोटेक्शन फोर्स) स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार मेळघाट व ताडोबा व्याघ्र प्रकल्पांत असे दल गठित करण्यात आले आहे. प्रारंभी पाच वर्षे या संरक्षण दलावर केंद्राचे नियंत्रण राहणार असून, त्यानंतर राज्य शासनावर सर्वस्वी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.मेळघाट व ताडोबा व्याघ्र प्रकल्पांना तस्करांनी लक्ष्य केल्यानंतर केंद्र सरकारने स्वतंत्रपणे व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने या दोन्ही व्याघ्र प्रकल्पांत संरक्षण दल गठित केले गेले. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात १२०, तर मेळघाटसाठी ८१ जवान या दलात दाखल करण्यात आले आहेत. आता पेंच, बोर व नवेगाव बांध अभयारण्यात व्याघ्र संरक्षण दलाची भरती प्रक्रिया प्रस्तावित असल्याने ती लवकर पूर्ण केली जाणार आहे.साहाय्यक वनसंरक्षक, पाच वनपालांच्या मार्गदर्शनात हे दल कार्यरत राहील. शिकार रोखणे, व्याघ्र प्रकल्पांत वाघांना धोका असलेल्या बाबी निदर्शनास येताच तसा अहवाल वरिष्ठांना देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी या व्याघ्र संरक्षण दलावर सोपविण्यात आली आहे. निमलष्करी दलाचा दर्जाटायगर प्रोटेक्शन फोर्सला निमलष्करी दलाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. अतिसंरक्षित क्षेत्रात वाघांच्या संरक्षणाबाबत काही धोकादायक बाबी आढळल्यास या दलातील जवानांना थेट फायरिंग करण्याचे विशेष अधिकारदेखील प्रदान करण्यात आले आहेत. या दलाच्या जवानांकडे एसएलआर रायफल, वरिष्ठांना रिव्हॉल्व्हर, वाहन, राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्याची फार पूर्वीची मागणी आहे. उशिरा का होईना, हे दल स्थापन झाल्याने विदर्भातील वाघांना संरक्षण मिळणार आहे. या दलाकडे वाघांच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मेळघाटचे क्षेत्र संचालक दिनेशकुमार त्यागी यांनी सांगितले.या दलाला तरी कालबाह्य प्रशिक्षण नकोव्याघ्र संरक्षण दल हे केवळ वाघांच्या संरक्षणासाठी गठित करण्यात आले आहे. मात्र वनविभागात जुन्याच पद्धतीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची परंपरा असल्याने हे प्रशिक्षण व्याघ्र संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांना दिल्यास ते काहीच उपयोगी पडणार नाही. त्यामुळे या दलाला अत्याधुनिक शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.