शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने विजेचे ५८ खांब कोसळले

By admin | Updated: May 21, 2016 01:02 IST

सोमेश्वरनगर (ता. बारामती) परिसराला गुरुवारी (दि. १९) चक्रीवादळाचा तडाखा बसला.

सोमेश्वरनगर : सोमेश्वरनगर (ता. बारामती) परिसराला गुरुवारी (दि. १९) चक्रीवादळाचा तडाखा बसला. वाऱ्याच्या प्रचंड वेगाने अनेक घरांचे पत्रे उडाले. अनेक वृक्ष उन्मळून पडले. तसेच परिसरातील तब्बल ५८ विद्युत खांब कोसळले आहेत. त्यामुळे ५ किलोमीटर पर्यंत विद्युत तारा तुटल्या आहेत. कोसळलेले विद्युत खांब शोधण्याची मोहीम सुरूच आहे. आणखी २५ ते ३० कोसळलेले खांब सापडतील असे महावितरणने सांगितले आहे. गुरुवारी सायंकाळी सोमेश्वरनगर परिसरामध्ये अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसाबरोबर वाहणाऱ्या वाऱ्याचे अचानक चक्री वादळामध्ये रूपांतर झाल्याने अवघ्या एकाच तासात होत्याचे नव्हते झाले. घरांचे पत्र उडणे, भिंती कोसळणे, विद्युत खांब कासळणे, वृक्ष उन्मळून पडणे, टोमॅटो कोथिंबीर, कारली, दोडका, कडवळ यासारखी पिके अक्षरश: भुईसपाट झाली. त्याबरोबर उसाची पिकेही काही ठिकाणी भुईसपाट झाली. घरांची कौले उडणे, टेलिव्हिजनचे डिश उडून जाणे, पत्र्यांची शेड कोसळणे, नारळाची झाडे कोसळणे असे प्रकार घडले. अनेक रस्त्यांवर वृक्ष कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मळशी ते सोमेवर कारखाना दरम्यान नीरा डाव्या कालव्याचा रस्ता वृक्ष पडल्याने अजूनही बंदच आहे. शेतकऱ्यांबरोबर सर्वांत जादा नुकसान महावितरणचे झाले आहे. परिसरातील तब्बल ५८ विद्युत खांब कोसळले आहेत. वादळी वाऱ्यानंतर महावितरणने तातडीने २४ कर्मचारी असलेल्या ३ गँगमनच्या तुकड्यांना पाचारण केले आहे. सकाळपासूनच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व गँगमन मिळून खांब उभे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शुक्रवारी (दि. २०) सकाळपासून वाणेवाडी, वाघळवाडी, मुरूम या ठिकाणावरील विद्युत पुरवठा सुरू करण्यात महावितरणला यश आले आहे. सर्वांत जादा नुकसान झालेल्या मळशी गावामध्ये शनिवारी (दि. २१) संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा सुरू होऊ शकतो असे सोमेश्वरनगर येथील महावितरणचे उपअभियंता अभिजित बिरनाळे यांनी सांगितले. या चक्रीवादळामध्ये महावितरणचे जवळपास ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशी माहितीही त्यांनी दिली. (वार्ताहर)>शहारे आणणारे वादळगेल्या दोन वर्षांपूर्वी सोमेश्वरनगर परिसराला अशाच प्रकारच्या चक्रीवादळाने तडखा दिला होता. त्या वेळी दीड ते दोन हजार वृक्ष पडले होते. तर १५०च्या वर विद्युत खांब कोसळल्याने तब्बल १५ दिवस सोमेश्वरनगर परिसर अंधारात होता. त्याच चक्रीवादळाची आठवण सोमेश्वरवासीयांना झाली होती.