शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने विजेचे ५८ खांब कोसळले

By admin | Updated: May 21, 2016 01:02 IST

सोमेश्वरनगर (ता. बारामती) परिसराला गुरुवारी (दि. १९) चक्रीवादळाचा तडाखा बसला.

सोमेश्वरनगर : सोमेश्वरनगर (ता. बारामती) परिसराला गुरुवारी (दि. १९) चक्रीवादळाचा तडाखा बसला. वाऱ्याच्या प्रचंड वेगाने अनेक घरांचे पत्रे उडाले. अनेक वृक्ष उन्मळून पडले. तसेच परिसरातील तब्बल ५८ विद्युत खांब कोसळले आहेत. त्यामुळे ५ किलोमीटर पर्यंत विद्युत तारा तुटल्या आहेत. कोसळलेले विद्युत खांब शोधण्याची मोहीम सुरूच आहे. आणखी २५ ते ३० कोसळलेले खांब सापडतील असे महावितरणने सांगितले आहे. गुरुवारी सायंकाळी सोमेश्वरनगर परिसरामध्ये अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसाबरोबर वाहणाऱ्या वाऱ्याचे अचानक चक्री वादळामध्ये रूपांतर झाल्याने अवघ्या एकाच तासात होत्याचे नव्हते झाले. घरांचे पत्र उडणे, भिंती कोसळणे, विद्युत खांब कासळणे, वृक्ष उन्मळून पडणे, टोमॅटो कोथिंबीर, कारली, दोडका, कडवळ यासारखी पिके अक्षरश: भुईसपाट झाली. त्याबरोबर उसाची पिकेही काही ठिकाणी भुईसपाट झाली. घरांची कौले उडणे, टेलिव्हिजनचे डिश उडून जाणे, पत्र्यांची शेड कोसळणे, नारळाची झाडे कोसळणे असे प्रकार घडले. अनेक रस्त्यांवर वृक्ष कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मळशी ते सोमेवर कारखाना दरम्यान नीरा डाव्या कालव्याचा रस्ता वृक्ष पडल्याने अजूनही बंदच आहे. शेतकऱ्यांबरोबर सर्वांत जादा नुकसान महावितरणचे झाले आहे. परिसरातील तब्बल ५८ विद्युत खांब कोसळले आहेत. वादळी वाऱ्यानंतर महावितरणने तातडीने २४ कर्मचारी असलेल्या ३ गँगमनच्या तुकड्यांना पाचारण केले आहे. सकाळपासूनच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व गँगमन मिळून खांब उभे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शुक्रवारी (दि. २०) सकाळपासून वाणेवाडी, वाघळवाडी, मुरूम या ठिकाणावरील विद्युत पुरवठा सुरू करण्यात महावितरणला यश आले आहे. सर्वांत जादा नुकसान झालेल्या मळशी गावामध्ये शनिवारी (दि. २१) संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा सुरू होऊ शकतो असे सोमेश्वरनगर येथील महावितरणचे उपअभियंता अभिजित बिरनाळे यांनी सांगितले. या चक्रीवादळामध्ये महावितरणचे जवळपास ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशी माहितीही त्यांनी दिली. (वार्ताहर)>शहारे आणणारे वादळगेल्या दोन वर्षांपूर्वी सोमेश्वरनगर परिसराला अशाच प्रकारच्या चक्रीवादळाने तडखा दिला होता. त्या वेळी दीड ते दोन हजार वृक्ष पडले होते. तर १५०च्या वर विद्युत खांब कोसळल्याने तब्बल १५ दिवस सोमेश्वरनगर परिसर अंधारात होता. त्याच चक्रीवादळाची आठवण सोमेश्वरवासीयांना झाली होती.