शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

‘हत्ती मोहीम’ पुस्तकातून देशभरात

By admin | Updated: March 19, 2015 23:51 IST

सिंधुदुर्ग वनविभागाचा उपक्रम : ‘मिशन एलिफंट’ इंग्रजीतून प्रसिद्ध

अनंत जाधव - सावंतवाडी -- महाराष्ट्रात प्रथमच सिंधुदुर्ग वनविभागाने यशस्वीपणे राबवलेली हत्ती पकड मोहीम आता पुस्तकरुपाने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे. यासाठी वनविभागाने ‘मिशन एलिफंट’ या नावाने इंग्रजीतून पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाच्या पहिल्या प्रती देशाचे वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आल्या आहेत. मोहिमेत विशेष लक्ष घालणारे खासदार विनायक राऊत यांनी हे पुस्तक केंद्रीयमंत्री व खासदारांना सुपूर्द केले आहे.जिल्ह्यात मार्च २०१३ मध्ये दाखल झालेल्या उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी जिल्ह्यात तळ ठोकलेल्या चार हत्तींचा अभ्यास केला. उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून हत्ती पकड मोहिमेला परवानगी मिळविली. परवानगी मिळाल्यानंतर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कर्नाटक सरकारशी संपर्क साधला. वनमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार यांचीही मदत घेतली. ८ ते १६ फेबु्रवारी २०१५ या अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत मोहीम यशस्वी झाली. सिंधुदुर्गवासीयांबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यात या यशस्वी मोहीमेची गाथा जावी, यासाठी वनविभागाने या मोहिमेची खास पुस्तकरुपी माहिती तयार केली आहे. या पुस्तकात हत्ती पकड मोहिमेबरोबरच हत्तींनी गेल्या काही वर्षात केलेले नुकसान तसेच हत्तीहल्ल्यात मृत पावलेले व जखमी ग्रामस्थ या माहितीसह मोहिमेसाठी कोणी कसे प्रयत्न केले, कर्नाटकमधून कोणत्या जंगलातून हत्ती आले, तसेच त्यांना लागणारी साधन सामुग्री, येथील हवामान याबाबतची इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे. हे पुस्तक उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांच्या कल्पनेतून तयार झाले असून, त्यांना सहाय्यक उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी यांचीही साथ लाभली आहे.सध्या या पुस्तकाच्या प्रती इंग्रजीमधून प्रसिद्ध करण्यात आल्या असून, वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर यांना पुस्तके देण्यात आली आहेत. खासदार विनायक राऊत यांनी हे पुस्तक संसदेत केंद्रीय मंत्री व खासदारांना प्रदान केले.मोहीम स्मरणात राहण्यासाठी पुस्तक : एस. रमेशकुमारमोहीम आमच्यासाठी महत्त्वाची होती आणि ती यशस्वीही झाली. पुस्तकरुपाने ही मोहीम लोकांच्या कायम स्मरणात रहावी, यासाठी पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे, असे मत उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी व्यक्त केले.