शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

युती फुटीच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: September 22, 2014 09:52 IST

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची २५ वर्षांपासूनची भगवी युती आता तुटण्याच्या उंबरठ्यावर आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वापरली आक्रमक भाषा

जयशंकर गुप्त, नवी दिल्लीभारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची २५ वर्षांपासूनची भगवी युती आता तुटण्याच्या उंबरठ्यावर आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वापरली आक्रमक भाषा आणि त्यानंतर नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेली वरिष्ठ भाजपा नेत्यांची बैठक या घटनाक्रमानंतर ही युती जागावाटपावरून कधीही तुटेल, अशी स्थिती आल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले. भाजपाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीपूर्वी महाराष्ट्रातील अनेक भाजपा नेत्यांनी स्वबळावर महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व जागा लढण्याचा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला होता. शिवसेना देऊ करीत असलेल्या ११९ जागांवर समझोता करण्यास भाजपा राजी नाही. जागावाटपाच्या बाबतीत दोन्ही पक्षांमधील कडवटपणा टोकाला गेल्यामुळे भाजपाची सगळी मदार आता मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक मंडळाची बैठक पार पडल्यानंतर मोदी आणि शहा यांनी १० मिनिटे स्वतंत्रपणे चर्चा केली. युती तोडून स्वतंत्रपणे लढल्यास कोणाचे किती नुकसान होईल आणि कोण किती फायद्यात राहील, याचा अंदाज घेणे भाजपाच्या गोटात अजूनही सुरू आहे. त्यासाठीच पक्षाध्यक्ष शहा यांनी महाराष्ट्रातील विभागीय संघटन प्रमुखांना दिल्लीत पाचारण केले आहे. त्यांच्याशी चर्चा होणे अपेक्षित आहे. भाजपाचा अधिकृत निर्णयही तोवर जाहीर केला जाणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. युतीतील या दोन्ही मित्रपक्षांचे संबंध एकमेकांची उणीदुणी काढण्याच्या पातळीवर आले आहेत. पूर्वीच्या अनेक घटनांचे स्मरण परस्परांना करून दिले जात आहे. त्याचवेळी दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते एकच भाषा बोलत आहेत़ ती अशी, एकत्र लढलो तर सत्ता आमचीच आहे. स्वतंत्र लढल्याने दोघांचेही नुकसान होईल. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एखादे पाऊल मागे घेण्याची शक्यता अजूनही आहे, असा भाजपातील सूत्रांचा दावा आहे. त्यानुसार ११९ पेक्षा दोन-चार अधिक जागा भाजपाच्या वाट्याला येऊ शकतात, अशी आशा दिल्लीत अजूनही शिल्लक आहे.