शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

युती फुटीच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: September 22, 2014 09:52 IST

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची २५ वर्षांपासूनची भगवी युती आता तुटण्याच्या उंबरठ्यावर आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वापरली आक्रमक भाषा

जयशंकर गुप्त, नवी दिल्लीभारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची २५ वर्षांपासूनची भगवी युती आता तुटण्याच्या उंबरठ्यावर आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वापरली आक्रमक भाषा आणि त्यानंतर नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेली वरिष्ठ भाजपा नेत्यांची बैठक या घटनाक्रमानंतर ही युती जागावाटपावरून कधीही तुटेल, अशी स्थिती आल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले. भाजपाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीपूर्वी महाराष्ट्रातील अनेक भाजपा नेत्यांनी स्वबळावर महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व जागा लढण्याचा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला होता. शिवसेना देऊ करीत असलेल्या ११९ जागांवर समझोता करण्यास भाजपा राजी नाही. जागावाटपाच्या बाबतीत दोन्ही पक्षांमधील कडवटपणा टोकाला गेल्यामुळे भाजपाची सगळी मदार आता मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक मंडळाची बैठक पार पडल्यानंतर मोदी आणि शहा यांनी १० मिनिटे स्वतंत्रपणे चर्चा केली. युती तोडून स्वतंत्रपणे लढल्यास कोणाचे किती नुकसान होईल आणि कोण किती फायद्यात राहील, याचा अंदाज घेणे भाजपाच्या गोटात अजूनही सुरू आहे. त्यासाठीच पक्षाध्यक्ष शहा यांनी महाराष्ट्रातील विभागीय संघटन प्रमुखांना दिल्लीत पाचारण केले आहे. त्यांच्याशी चर्चा होणे अपेक्षित आहे. भाजपाचा अधिकृत निर्णयही तोवर जाहीर केला जाणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. युतीतील या दोन्ही मित्रपक्षांचे संबंध एकमेकांची उणीदुणी काढण्याच्या पातळीवर आले आहेत. पूर्वीच्या अनेक घटनांचे स्मरण परस्परांना करून दिले जात आहे. त्याचवेळी दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते एकच भाषा बोलत आहेत़ ती अशी, एकत्र लढलो तर सत्ता आमचीच आहे. स्वतंत्र लढल्याने दोघांचेही नुकसान होईल. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एखादे पाऊल मागे घेण्याची शक्यता अजूनही आहे, असा भाजपातील सूत्रांचा दावा आहे. त्यानुसार ११९ पेक्षा दोन-चार अधिक जागा भाजपाच्या वाट्याला येऊ शकतात, अशी आशा दिल्लीत अजूनही शिल्लक आहे.