शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

तीन वर्षांत राज्यात एकही दवाखाना नाही, आरोग्याचा कारभार जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 03:42 IST

भाजपा-शिवसेना सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील उपलब्ध वैद्यकीय सुविधेत कोणतेही मूलभूत बदल झालेले दिसून येत नाहीत. गत वर्षभरता एकही प्राथमिक आरोग्य केंद्र वाढलेले नाही, की आरोग्य पथकांच्या संख्येतही कसली वाढ झालेली नाही. आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलेले हे राज्याच्या आरोग्याचे चित्र आहे.

मुंबई  - भाजपा-शिवसेना सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील उपलब्ध वैद्यकीय सुविधेत कोणतेही मूलभूत बदल झालेले दिसून येत नाहीत. गत वर्षभरता एकही प्राथमिक आरोग्य केंद्र वाढलेले नाही, की आरोग्य पथकांच्या संख्येतही कसली वाढ झालेली नाही. आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलेले हे राज्याच्या आरोग्याचे चित्र आहे.सार्वजनिक आरोग्य विभाग शिवसेनेचे डॉ. दीपक सावंत यांच्याकडे तर वैद्यकीय शिक्षण विभाग गिरीश महाजन यांच्याकडे आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे आर्थिक पाहाणीत दिलेले निष्कर्ष चिंताजनक आहेत. २०१४ सालापासून सार्वजनिक, स्थानिक संस्था व विश्वस्थ संस्थांची संख्येत कोणताही बदल झालेला दिसून येत नाही. गोरगरीब रुग्णांना वेळवर औषधे मिळत नाहीत, आरोग्य सेवा मिळत नाही, अशा तक्रारी असताना आरोग्य विभागाने कोणतीही पावले उचलेली नाहीत, हे यातून दिसून येते.राज्यात २०१४ साली १४०२ रुग्णालये, ३०८७ दवाखाने, १०,५८० उपकेंद्रे, १८११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १९३ प्राथमिक आरोग्य पथके होती. ही संख्या २०१६ सालीदेखील तेवढीच आहे. दर लाख लोकसंख्येमागे फक्त १०८ बेड (खाटा) आहेत.

 

टॅग्स :Healthआरोग्य