शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

MPSC उत्तीर्ण होऊन तीन वर्षे झाली, ‘ते’ अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेतच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 06:13 IST

शेकडाे तरुण-तरुणींना आले नैराश्य, एक ना अनेक कारणांमुळे नियुक्त्या रखडल्या; वाट पाहून थकलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

मुंबई - एमपीएससीची  पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व त्यानंतर मुलाखत होऊन त्यात पात्र ठरल्यावरही नियुक्ती मिळत नसल्याने शेकडो तरुण - तरुणी नैराश्याचा सामना करीत आहेत. सुमारे २१५ अभियंते तीन वर्षांपासून नियुक्तीची प्रतीक्षा करीत आहेत. आधी कोरोना, मग मराठा आरक्षण, पुढे इडब्ल्यूएसची गोची आणि आता न्यायालयीन प्रक्रिया, असे एक एक रडगाणे सांगत राज्य शासनाकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे पात्र अभियंते वाट पाहून थकले आहेत.

एमपीएससीने १८ मार्च २०२० रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा या विभागांतील स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ व गट ब साठी जाहिरात काढली. यात हजारो उमेदवारांनी मार्च २०२१मध्ये पूर्व परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झालेल्यांनी डिसेंबर २०२१ रोजी मुख्य परीक्षा दिली. दरम्यान, मे २०२० ला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. राज्य सरकारने त्यांना आर्थिक दुर्बल गटात (इडब्ल्यूएस) समाविष्ट करून प्रक्रिया पुढे सुरू केली. मात्र, यामुळे इडब्ल्यूएस गटातील मूळ उमेदवार बाहेर फेकले गेल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि पुन्हा रखडगाडी सुरू झाली.

अभियंत्यांच्या नियुक्तीस दिरंगाई का? एमपीएससीमार्फत झालेल्या २०२०च्या राज्य सेवा परीक्षा, एएमव्हीआय, आरटीओ पदांची भरतीप्रक्रिया आटोपून नियुक्त्याही मिळाल्या. आरक्षणाचा घोळ असतानाही त्या विभागांनी विद्यार्थांचे हित लक्षात घेऊन न्यायालयाच्या अधीन राहूनही तत्काळ नियुक्ती प्रक्रिया पूर्ण केली. जर नियम व कायदे सर्व नियुक्तीचे सारखे आहेत तर अभियंत्यांची नियुक्ती देण्यात संबंधित विभागांची दिरंगाई का? असा सवाल केला जात आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा