शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

कर्जमाफीच्या नावाखाली आदिवासी विकासाचे तीन हजार कोटी कापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 03:20 IST

कर्जमाफीच्या नावाखाली आदिवासी विकास महामंडळाचे ८,८०० कोटींच्या निधींपैकी तब्बल ३००० कोटी रूपये कापण्यात आले आहेत. विकासापासून दूर असलेल्या आदिवासींच्या विकासाला जबर ब्रेक लागणार आहे.

- रूपेश उत्तरवारयवतमाळ - कर्जमाफीच्या नावाखाली आदिवासी विकास महामंडळाचे ८,८०० कोटींच्या निधींपैकी तब्बल ३००० कोटी रूपये कापण्यात आले आहेत. विकासापासून दूर असलेल्या आदिवासींच्या विकासाला जबर ब्रेक लागणार आहे.आदिवासी युवकांना स्वयंरोजगार करता यावा म्हणून शबरी आर्थिक विकास महामंडळ कर्ज उपलब्ध करून देते. मात्र या महामंडळाकडेच निधी नाही. त्यांची हमी घेण्यास राज्य सरकारने नकार दिला. त्यामुळे या मंडळाला कर्जच उपलब्ध झाले नाही. गेल्या चार वर्षांपासून मंडळाकडे लाभार्थी कर्जासाठी नुसत्या चकरा मारत आहेत. मात्र त्यांना कर्ज मिळणे दुरापास्त झाले आहे. आदिवासी विकास विभागाकडून डिझेल इंजिन आणि पीव्हीसी पाईपची योजना आदिवासी शेतकरी बांधवासाठी राबविली जात होती. ही योजना आता कृषी विभागाकडे वळती करण्यात आली. मात्र कृषी विभागाला लाभार्थीच मिळाले नाही. त्यामुळे ही योजनाही पूर्णत: कोलमडली आहे. हा निधीही शासनाकडे परत जाणार आहे.राज्यात सत्तांतर होताच, खावटी कर्ज देणे बंद करण्यात आल्याने आदिवासींचा आधार गेला होता. आता मोठी आर्थिक कपात झाल्याने विकासच ठप्प होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.तुरीची डाळ घेणार कोण?महामंडळाने गत दोन वर्षात १६ हजार ५०० क्विंटल तुरीची खरेदी केली. या तुरीची डाळ करण्यासाठी शासनाची परवानगी मिळाली. मात्र, ही डाळ आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहांना विकता येणार नाही. तसे सुधारित आदेशच वसतिगृहात धडकले. यामुळे तुरीची गुणवत्ता घसरल्यास महामंडळाला नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. सरकारच्या या धोरणाविरूद्ध मंडळाचे संचालक भारत दुधनाग, अशोक मंगाम, मिनाक्षी वेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.सरकार आदिवासींविरोधात काम करीत आहे. महामंडळाच्या तीन हजार कोटींची कपात झाली. हा प्रकार आदिवासींचे खच्चीकरण करणारा आहे. - सुनील भुसार, संचालक, आदिवासी विकास महामंडळ

टॅग्स :MONEYपैसाBudgetअर्थसंकल्प