शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

राज्यात ‘बी.ए.4’ चे तीन, तर ‘बी.ए.5’ व्हेरिएंटचा एक रुग्ण; गृह विलगीकरणात झाले कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 05:20 IST

कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेच्या ताज्या अहवालानुसार, मुंबईत बी.ए. ४ चे तीन आणि बी. ए.५ व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आला आहे.

मुंबई :

कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेच्या ताज्या अहवालानुसार, मुंबईत बी.ए. ४ चे तीन आणि बी. ए.५ व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आला आहे. हे सर्व रुग्ण १४ मे ते २४ मे या कालावधीतील असून त्यातील दोन ११ वर्षांच्या मुली, तर दोन ४० ते ६० वर्षे वयोगटातील पुरुष आहेत. हे सर्व रुग्ण गृह विलगीकरणात बरे झाले असून  या सर्व रुग्णांचे इतर तपशील देखील घेण्यात येत आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरीही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली नाही, हा मोठा दिलासा आहे. आजही रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. बी. ए. ४ आणि ५ हे ओमायक्राॅन कुटुंबातील विषाणू आहेत. त्यामुळे त्याच्या वाढीला मर्यादा आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण आपल्याकडील तिसरी लाट ही ओमायक्रोनमुळेच आलेली होती. मात्र, तरीही आपण काळजी घेणे आवश्यक आहे आणि अतिजोखमीच्या आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.

का वाढ झाली? - कोरोनाची साथ आता एन्डॅमिक झाली आहे. याचा अर्थ अशा प्रकारचे कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळत राहतील.- सध्या आढळणाऱ्या रुग्णांना सौम्य संसर्ग होत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागत नाही.काय काळजी घ्यावी? -  नागरिकांनी कोरोना संसर्गाबाबत हलगर्जीपणा करू नये- गर्दीच्या ठिकाणी, रुग्णालयात, दवाखान्यात जाताना मास्क वापरावा- राज्यात मास्कची सक्ती केली नसली तरीही सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर करावा- कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी- वारंवार हात स्वच्छ पाण्याने धुवावे- नाक, तोंड याला वारंवार हाताने स्पर्श करू नये

राज्यात १७ हजारांहून अधिक रुग्णराज्यात सोमवारी १८८५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिवसभरात  ७७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण ७७,४७,१११ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात  १७,४८० रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ९७.९१% एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर १.८६% एवढा आहे. आजपर्यंत तपासलेल्या ८,१३,४६,२०४ नमुन्यांपैकी ०९.७३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,१२,४६२ झाली असून मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ८७१ इतका आहे. दिवसभरात नोंद झालेल्या मृतांमध्ये रायगड जिल्ह्यातील एक रुग्ण आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस