शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

राज्यात ‘बी.ए.4’ चे तीन, तर ‘बी.ए.5’ व्हेरिएंटचा एक रुग्ण; गृह विलगीकरणात झाले कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 05:20 IST

कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेच्या ताज्या अहवालानुसार, मुंबईत बी.ए. ४ चे तीन आणि बी. ए.५ व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आला आहे.

मुंबई :

कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेच्या ताज्या अहवालानुसार, मुंबईत बी.ए. ४ चे तीन आणि बी. ए.५ व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आला आहे. हे सर्व रुग्ण १४ मे ते २४ मे या कालावधीतील असून त्यातील दोन ११ वर्षांच्या मुली, तर दोन ४० ते ६० वर्षे वयोगटातील पुरुष आहेत. हे सर्व रुग्ण गृह विलगीकरणात बरे झाले असून  या सर्व रुग्णांचे इतर तपशील देखील घेण्यात येत आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरीही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली नाही, हा मोठा दिलासा आहे. आजही रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. बी. ए. ४ आणि ५ हे ओमायक्राॅन कुटुंबातील विषाणू आहेत. त्यामुळे त्याच्या वाढीला मर्यादा आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण आपल्याकडील तिसरी लाट ही ओमायक्रोनमुळेच आलेली होती. मात्र, तरीही आपण काळजी घेणे आवश्यक आहे आणि अतिजोखमीच्या आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.

का वाढ झाली? - कोरोनाची साथ आता एन्डॅमिक झाली आहे. याचा अर्थ अशा प्रकारचे कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळत राहतील.- सध्या आढळणाऱ्या रुग्णांना सौम्य संसर्ग होत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागत नाही.काय काळजी घ्यावी? -  नागरिकांनी कोरोना संसर्गाबाबत हलगर्जीपणा करू नये- गर्दीच्या ठिकाणी, रुग्णालयात, दवाखान्यात जाताना मास्क वापरावा- राज्यात मास्कची सक्ती केली नसली तरीही सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर करावा- कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी- वारंवार हात स्वच्छ पाण्याने धुवावे- नाक, तोंड याला वारंवार हाताने स्पर्श करू नये

राज्यात १७ हजारांहून अधिक रुग्णराज्यात सोमवारी १८८५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिवसभरात  ७७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण ७७,४७,१११ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात  १७,४८० रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ९७.९१% एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर १.८६% एवढा आहे. आजपर्यंत तपासलेल्या ८,१३,४६,२०४ नमुन्यांपैकी ०९.७३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,१२,४६२ झाली असून मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ८७१ इतका आहे. दिवसभरात नोंद झालेल्या मृतांमध्ये रायगड जिल्ह्यातील एक रुग्ण आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस