शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 05:50 IST

नापिकी आणि पीककर्ज न मिळाल्याने नांदेड जिल्ह्यातील दोन आणि परभणी जिल्ह्यातील एका शेतकºयाने मृत्यूला कवटाळले.

औरंगाबाद : नापिकी आणि पीककर्ज न मिळाल्याने नांदेड जिल्ह्यातील दोन आणि परभणी जिल्ह्यातील एका शेतकºयाने मृत्यूला कवटाळले.माहूर (जि. नांदेड) तालुक्यातील मालवडा येथील सुभाष भोपा जाधव या अल्पभूधारक शेतकºयाने सततची नापिकी, राष्ट्रीयीकृत बँकेचे थकित कर्ज व बँकेत चकरा मारूनही पीककर्ज मिळत नसल्याने रविवारी दुपारी ४ वाजता स्वत:च्या शेतात विष प्राशन करुन आत्महत्या केली. तालुक्यात एकमेव असलेल्या एस.बी.आय. बँकेकडे मागील दोन महिन्यांपासून अनेक शेतकºयांचे पीककर्ज प्रलंबित आहे. ३० जुलै रोजी मयताचे मोठे बंधू अशोक भोपा जाधव यांनी तहसील कार्यालयात निवेदन देऊन शासनाच्या शेतकरी आत्महत्या योजनेतून कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.मुखेड तालुक्यातील सलगरा बु. येथील शेतकरी शेख तय्यबसाब उमेदअली (५०) यांनी दोन वर्षांपासून सततच्या नापिकीला कंटाळून सोमवारी पहाटे विष प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांनी काही लोकांकडून खाजगी कर्ज घेतले होते. मुलगा व पत्नी नेहमीच आजारी पडत असल्याने खाजगी लोकांचे कर्ज फेडायचे कसे, या चिंतेने ते ग्रासले होते़ त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवार आहे.

रेल्वेसमोर उडी घेतलीसततची नापिकी व बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या चिंतेतून मुंजाजी बापूराव बोकारे (६५) या शेतकºयाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६़४५ च्या सुमारास फुकटगाव (जि़ परभणी) परिसरात उघडकीस आली़ बोकारे यांना फुकटगाव शिवारात अडीच एकर शेती आहे़ त्यांच्यावर महाराष्ट्र बँकेचे एक लाख रुपयांचे कर्ज होते़ चार वर्षांपासून शेती पिकत नव्हती़ बँकेचे कर्ज कसे फेडावे, याची चिंता त्यांना होती़ यातूनच मुंजाजी बोकारे यांनी सोमवारी फुकटगाव शिवारात कोणत्या तरी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली़ ही घटना सायंकाळी ६़४५ च्या सुमारास उघडकीस आली़ त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे़

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्या