शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तीन जिल्हा बँका संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 00:42 IST

थकीत कृषीकर्जाच्या बोजामुळे विदर्भातील तीन जिल्हा सहकारी बँका आणखी संकटात सापडल्या आहेत. या तीनही बँका सध्या प्रशासकाच्या छत्रछायेत आहेत.

- सोपान पांढरीपांडे,  नागपूरथकीत कृषीकर्जाच्या बोजामुळे विदर्भातील तीन जिल्हा सहकारी बँका आणखी संकटात सापडल्या आहेत. या तीनही बँका सध्या प्रशासकाच्या छत्रछायेत आहेत.या बँका म्हणजे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. यापैकी नागपूर व वर्धा बँकाचे बोर्ड, होम ट्रेड रोखे घोटाळ्यात अनुक्रमे १२४.६० कोटी व ३० कोटी नुकसान झाले म्हणून २००२ साली बरखास्त झाले आहे. बुलडाणा बँकेचे बोर्ड अनियमिततेमुळे बरखास्त झाले आहे.नागपूर जिल्हा बँकेचे एकूण कर्जवाटप ६६६.७७ कोटी आहे. त्यापैकी थकीत कृषी कर्ज ४८२.३० कोटी आहे. वर्धा बँकेचे एकूण कर्ज ३१९.७२ कोटी आहे व त्यापैकी थकीत कृषी कर्ज २४३.१० कोटी आहे तर बुलडाणा बँकेचे एकूण कर्ज ४९४.५५ कोटी व थकीत कृषी कर्ज ३६१.६७ कोटी आहे.दोन वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेने या बँकांना लायसन्स देण्याचे नाकारले म्हणून राज्य व केंद्र सरकारने नाबार्डमार्फत या बँकांना आर्थिक मदत दिली होती. यामध्ये नागपूर बँकेला १५६ कोटी, वर्धा बँकेला १६१ कोटी व बुलडाणा बँकेला २०६ कोटी मिळाले होते. त्यामुळे या बँकांना लायसन्स मिळाले; पण कर्जवसुली अभावी परिस्थिती सुधारली नाही. आजही बँकांना भांडवल निधीची पूर्तता करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. यात नागपूर बँकेला ५० कोटी, वर्धा बँकेला १२० कोटी तर बुलडाणा बँकेला ७० कोटींची गरज आहे. सरकारने ही २४० कोटींची मदत या बँकांना त्वरित करावी अन्यथा आधी मिळालेले ५२३ कोटी पाण्यात जातील, अशी भीती सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.मात्र कर्जमाफीमुळे या तीनही बँका आपोआप संकटमुक्त होणार आहेत. या सर्व बँकांचे कृषी कर्ज सेवा सहकारी संस्थांकडे अडकून पडले आहे. कर्जमाफी झाली तर सेवा सहकारी संस्थांना कर्जमाफीची रक्कम मिळेल व नंतर ती जिल्हा बँकांना कर्जफेड म्हणून मिळेल. अशा तऱ्हेने कर्जमाफीमुळे या तीनही जिल्हा बँका संकटमुक्त होतील.