शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

तीन जिल्हा बँका संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 00:42 IST

थकीत कृषीकर्जाच्या बोजामुळे विदर्भातील तीन जिल्हा सहकारी बँका आणखी संकटात सापडल्या आहेत. या तीनही बँका सध्या प्रशासकाच्या छत्रछायेत आहेत.

- सोपान पांढरीपांडे,  नागपूरथकीत कृषीकर्जाच्या बोजामुळे विदर्भातील तीन जिल्हा सहकारी बँका आणखी संकटात सापडल्या आहेत. या तीनही बँका सध्या प्रशासकाच्या छत्रछायेत आहेत.या बँका म्हणजे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. यापैकी नागपूर व वर्धा बँकाचे बोर्ड, होम ट्रेड रोखे घोटाळ्यात अनुक्रमे १२४.६० कोटी व ३० कोटी नुकसान झाले म्हणून २००२ साली बरखास्त झाले आहे. बुलडाणा बँकेचे बोर्ड अनियमिततेमुळे बरखास्त झाले आहे.नागपूर जिल्हा बँकेचे एकूण कर्जवाटप ६६६.७७ कोटी आहे. त्यापैकी थकीत कृषी कर्ज ४८२.३० कोटी आहे. वर्धा बँकेचे एकूण कर्ज ३१९.७२ कोटी आहे व त्यापैकी थकीत कृषी कर्ज २४३.१० कोटी आहे तर बुलडाणा बँकेचे एकूण कर्ज ४९४.५५ कोटी व थकीत कृषी कर्ज ३६१.६७ कोटी आहे.दोन वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेने या बँकांना लायसन्स देण्याचे नाकारले म्हणून राज्य व केंद्र सरकारने नाबार्डमार्फत या बँकांना आर्थिक मदत दिली होती. यामध्ये नागपूर बँकेला १५६ कोटी, वर्धा बँकेला १६१ कोटी व बुलडाणा बँकेला २०६ कोटी मिळाले होते. त्यामुळे या बँकांना लायसन्स मिळाले; पण कर्जवसुली अभावी परिस्थिती सुधारली नाही. आजही बँकांना भांडवल निधीची पूर्तता करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. यात नागपूर बँकेला ५० कोटी, वर्धा बँकेला १२० कोटी तर बुलडाणा बँकेला ७० कोटींची गरज आहे. सरकारने ही २४० कोटींची मदत या बँकांना त्वरित करावी अन्यथा आधी मिळालेले ५२३ कोटी पाण्यात जातील, अशी भीती सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.मात्र कर्जमाफीमुळे या तीनही बँका आपोआप संकटमुक्त होणार आहेत. या सर्व बँकांचे कृषी कर्ज सेवा सहकारी संस्थांकडे अडकून पडले आहे. कर्जमाफी झाली तर सेवा सहकारी संस्थांना कर्जमाफीची रक्कम मिळेल व नंतर ती जिल्हा बँकांना कर्जफेड म्हणून मिळेल. अशा तऱ्हेने कर्जमाफीमुळे या तीनही जिल्हा बँका संकटमुक्त होतील.