शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा.."; राज ठाकरे यांचे आयोगाला 'ओपन चॅलेंज'
2
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
3
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
4
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
5
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...
6
Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा
7
VIDEO: तुफान राडा! निवडणुकीचं तिकीट नाकारलं म्हणून RJD नेत्याने कुर्ता फाडला, भरपूर रडला...
8
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
9
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
10
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
11
IND W vs ENG W World Cup 2025 Match LIVE Streaming : सेमीचं परफेक्ट सेमीकरण सेट करण्याचं चॅलेंज
12
जैन समाजाने दाखवलं एकीचं बळ! एकाचवेळी खरेदी केल्या १८६ लक्झरी कार; प्रत्येक गाडीवर किती डिस्काउंट?
13
महिला क्रिकेटर लग्नबंधनात अडकणार; इंदूरची सून होणार, होणाऱ्या बॉलिवूडकर नवऱ्यानेच दिली खुशखबर...
14
अतूट प्रेम! लेकाच्या मृत्यूनंतर काही क्षणात आईनेही सोडला जीव; एकत्र काढली अंत्ययात्रा
15
पैसे तयार ठेवा! ऑनलाईन शॉपिंग कंपनी मीशो IPO आणण्यासाठी सज्ज! किती कोटींचा निधी उभारणार?
16
Smriti Mandhana Soon Marry : ठरलं! टीम इंडियाची 'क्वीन' लवकरच उरकणार लग्न; तिच्या 'राजकुमारानं'च दिली हिंट
17
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
18
Video - कामाचा मोबदला! रशियन महिलेने मेडला दिला महिन्याला ४५ हजार पगार, चर्चेला उधाण
19
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
20
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...

मातंग समाजातील तरुणांसाठीच्या तीन कोटींच्या गाड्या सडल्या

By यदू जोशी | Updated: August 23, 2019 06:30 IST

या महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांच्या कार्यकाळात मातंग तरुणांना भाजीविक्री व्यवसायासाठी अनुदानावर गाड्या पुरवण्याची योजना होती.

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बेरोजगार मातंग तरुणांना भाजी विक्रीसाठी पुरविण्यात यावयाच्या तब्बल तीन कोटी रुपयांच्या ४१ गाड्या सडल्या असून आता त्या भंगारात विकण्याशिवाय पर्याय नाही अशा अवस्थेत आहेत.

या महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांच्या कार्यकाळात मातंग तरुणांना भाजीविक्री व्यवसायासाठी अनुदानावर गाड्या पुरवण्याची योजना होती. ५९ गाड्या वाटण्यात आल्या. ४१ गाड्या कुठे गेल्या हे समजायला मार्ग नव्हता. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत पगारे यांनी दोन दिवसांपूर्वी या गाड्या जेथे आहेत येथे भेट दिली असता त्या गंजलेल्या अवस्थेत आढळल्या. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याच्या खडवली येथे एका मैदानावर त्या पडून असल्याचे आढळले.

या गाड्या आता बंद अवस्थेत आहेत. त्यांचे इंजिन पूर्णत: निकामी झाले. टायर, पत्रे सडले आहेत. भंगारात कवडीमोल विकणे हा एकच पर्याय उरला आहे. सदर प्रतिनिधीने गुरुवारी या ठिकाणी भेट दिली तेव्हा गाड्यांची दयनीय अवस्था पाहायला मिळाली. धक्कादायक म्हणजे गेली चार वर्षे ही वाहने आहे त्या अवस्थेत तशीच पडून होती. आपण ज्या वाहनांसाठी कोट्यवधी रुपये मोजले आहेत ती गेली कुठे याची शहानिशा करण्याची साधी तसदीदेखील साठे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही.

धक्कादायक माहिती अशी आहे की या गाड्यांचे फॅब्रिकेशनचे काम मीरा रोड येथील ज्या मिरॅकल मोटर्सला दिले होते त्यांनी फॅब्रिकेशन पूर्ण झाल्यानंतर गाड्या महामंडळाने घेऊन जाव्यात म्हणून तगादा लावल्ला आहे. मात्र, महामंडळाने प्रतिसाद दिला नाही. शेवटी त्यांनी या गाड्या खडवली येथे नेऊन टाकल्या. या प्रकरणीही चौकशी होण्याची आवश्यकता आहे.त्यानंतर लागला गाड्यांचा ठावठिकाणाइतक्या वर्षांनंतर महामंडळाच्या हे लक्षात आले कसे? याचा किस्साही धक्कादायक आहे. ही वाहने ज्या व्यक्तीच्या खासगी जागेवर उभी आहेत त्या व्यक्तीने इतकी वर्षे गाड्या ठेवल्याचे भाडे मागणारे पत्र महामंडळाच्या मुंबई मुख्यालयाला दिल्यानंतर गाड्यांचा ठावठिकाणा लागला.कारवाई होणार का?राजकुमार बडोले सामाजिक न्याय मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात या ४१ गाड्यांबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही. आता नवे मंत्री सुरेश खाडे काय करतात, याबाबत उत्सुकता आहे. या गाड्या भंगारात जाईपर्यंत अधिकारी का झोपले होते? या नुकसानीची जबाबदारी कोणाची? हे खाडे निश्चित करतील काय आणि त्यांच्यावर कारवाई करतील काय असा असा ‘लोकमत’चा सवाल आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र