शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेटेंशी जवळीक पवारांना महागात; गेवराईत बदामरावांचे पारडे जड ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 12:22 IST

गेवराईत गेल्यावर पंकजा यांनी पवारांच्या घरी जाण्याचे टाळून बदामराव यांची भेट घेतली होती. यावरून बदामराव यांच्यासाठी पंकजा मुंडे सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गेवराईतून पवार की, बदाम आबा असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - लोकसभा निवडणूक पार पडताच महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. त्यानुसार विद्यमान आणि माजी आमदारांसह इच्छूकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. परंतु, मागील पाच वर्षांत झालेल्या पक्षांतरामुळे अनेक मतदार संघातील उमेदवारीवरून युतीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील बीड मतदार संघासह गेवराई मतदार संघाच्या उमेदवारीवरून पक्ष नेतृत्वासमोर अडचणी निर्माण होणार आहे.

गेवराई मतदार संघातील पंडितांचे आपापसातील वैर सर्वश्रूत आहे. एकेकाळी भाजपमध्ये असलेले आणि आता राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित आणि एकेकाळी राष्ट्रवादीत असलेले आणि आता शिवसैनिक झालेले बदामराव पंडीत यांच्यातून विस्तवही जात नसे. अशा स्थितीत गेवराईतून बदामराव पंडित यांनी २०१४ मध्ये गेवराई विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. दोन पंडितांच्या वादात गेवराईतून लक्ष्मण पवार यांनी बाजी मारली होती.

दरम्यान २०१९ येईपर्यंत गेवराईत मोठे राजकीय बदल झाले. बदामराव पंडित शिवसेनेत प्रवेश केला. अर्थात त्यांनी युती होणार नाही, असं गृहित धरले असावे. मात्र भाजप आणि शिवसेनेत युती होणार हे स्पष्ट आहे. तर पवार यांनी देखील विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे गेवराईची जागा युतीत कोणाला मिळणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. ही जागा भाजपलाच ठेवल्यास, बदामराव पंडितांच काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

दुसरीकडे आमदार पवार आणि पंकजा मुंडे यांच्यात तितकेसे सौख्य राहिले नाही. गेवराई पंचायत समिती सभापतीच्या निवडीवेळी पवार आणि मुंडे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जाते. त्यातच आमदार लक्ष्मण पवार यांची गेल्या काही दिवसात विनायक मेटे यांच्याशी वाढलेली जवळीक जिल्ह्यातील भाजप नेतृत्वाला रुचणारी नाही. गेवराईतील भाजपच्या कार्यक्रमाच्या वेळी पंकजा यांनी याचा सूचक इशाराही दिला होता.

गेवराईत गेल्यावर पंकजा यांनी पवारांच्या घरी जाण्याचे टाळून बदामराव यांची भेट घेतली होती. यावरून बदामराव यांच्यासाठी पंकजा मुंडे सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गेवराईतून पवार की, बदाम आबा असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

दरम्यान बदामराव पंडित यांनी जिल्हा परिषद निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांची मदत केली होती. त्याचा त्यांना मोबदला मिळण्याची आशा आहे. तर लक्ष्मण पवार यांना डावलून ही जागा शिवसेनेला सोडणे भाजप नेतृत्वाला मान्य होणार नाही. अशा या पेचात ही जागा कुणाच्या पदरी पडणार यावरून गेवराईत चर्चा रंगत आहे.