शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘विधि’चे हजारो विद्यार्थी नापास, अजूनही ७ निकाल बाकीच! : पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची चिंता वाढली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 05:07 IST

सप्टेंबर महिना उजाडूनही, मुंबई विद्यापीठाकडून उत्तरपत्रिका तपासणी सुरू असून, अजूनही ७ निकाल जाहीर झालेले नाहीत. उत्तरपत्रिका एका गठ्ठ्यातून दुस-या गठ्ठ्यात गेल्याने, पुढचे निकाल लावण्यास विद्यापीठाला विलंब होत आहे, तर दुसरीकडे निकाल लागलेल्या विद्यार्थ्यांचेही हाल सुरू आहेत. कारण विधि अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले असले, तरी हजारो विद्यार्थी ‘पुराव्याचा कायदा’ या विषयात नापास झाल्याने, पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाचा प्रश्न उद्भवला आहे.

 मुंबई : सप्टेंबर महिना उजाडूनही, मुंबई विद्यापीठाकडून उत्तरपत्रिका तपासणी सुरू असून, अजूनही ७ निकाल जाहीर झालेले नाहीत. उत्तरपत्रिका एका गठ्ठ्यातून दुसºया गठ्ठ्यात गेल्याने, पुढचे निकाल लावण्यास विद्यापीठाला विलंब होत आहे, तर दुसरीकडे निकाल लागलेल्या विद्यार्थ्यांचेही हाल सुरू आहेत. कारण विधि अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले असले, तरी हजारो विद्यार्थी ‘पुराव्याचा कायदा’ या विषयात नापास झाल्याने, पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाचा प्रश्न उद्भवला आहे.विधि अभ्यासक्रमाच्या तीन व पाच वर्षे अभ्यासक्रमांतील ‘पुराव्याचा कायदा’ या विषयात हजारो विद्यार्थी नापास झाले आहेत. विशेष म्हणजे, इतर विषयांत विद्यार्थ्यांना ५० ते ६० गुण मिळाले असताना, एकाच विषयात १०, १५ ते २५, ३० असे गुण देण्यात आले आहेत. यामध्ये गेल्या परीक्षेतील टॉपर्स असलेले विद्याथीर्ही नापास झाले आहेत. त्यामुळे हा प्रकार संशयास्पद असल्याचे मत, स्टुडंट लॉ कौन्सिचे अध्यक्ष सचिन पवार यांनी व्यक्त केले.विधि अभ्यासक्रमाचे निकाल लागल्यापासून गोंधळ सुरूच आहे. विधि अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची मुदत १६ सप्टेंबरला संपत आहे, पण एकाच विषयात विद्यार्थी नापास झाल्यामुळे, आता या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, यासाठी फेरतपासणी व्हावी, या मागणीने आता जोर धरला आहे. त्यातच अजूनही ७ निकाल लागणे बाकी असून, आता उत्तरपत्रिका तपासणीचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे आता निकाल लागणार कधी, पुढील प्रवेशाचे काय, अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहे.प्राचार्यांचे परीक्षा नियंत्रकांना पत्रआॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा फटका सर्वच अभ्यासक्रमांना बसला आहे. त्यातही विधि अभ्यासक्रमाचे घाईघाईत लावलेल्या निकाचा फटका शासकीय विधि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही बसला आहे. शासकीय महाविद्यालयातील ४५० पैकी तब्बल १११ विद्यार्थी हे संबंधित एकाच विषयात नापास झाले आहेत. त्यामुळे प्राचार्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांना पत्र लिहून ही बाब लक्षात आणून दिली आहे. याबाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एलएलएम अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी अनिवार्य असलेल्या सीईटीत विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, पण विधिच्या पदवी अभ्यासक्रमात नापास झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करावी. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना एलएलएम अभ्यासक्रमासाठी तात्पुरता प्रवेश द्यावा. या संदर्भात प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पत्र दिले आहे.- सचिन पवार, अध्यक्ष स्टुडंट लॉ कौन्सिल

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठMumbaiमुंबईStudentविद्यार्थी