शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

‘विधि’चे हजारो विद्यार्थी नापास, अजूनही ७ निकाल बाकीच! : पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची चिंता वाढली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 05:07 IST

सप्टेंबर महिना उजाडूनही, मुंबई विद्यापीठाकडून उत्तरपत्रिका तपासणी सुरू असून, अजूनही ७ निकाल जाहीर झालेले नाहीत. उत्तरपत्रिका एका गठ्ठ्यातून दुस-या गठ्ठ्यात गेल्याने, पुढचे निकाल लावण्यास विद्यापीठाला विलंब होत आहे, तर दुसरीकडे निकाल लागलेल्या विद्यार्थ्यांचेही हाल सुरू आहेत. कारण विधि अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले असले, तरी हजारो विद्यार्थी ‘पुराव्याचा कायदा’ या विषयात नापास झाल्याने, पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाचा प्रश्न उद्भवला आहे.

 मुंबई : सप्टेंबर महिना उजाडूनही, मुंबई विद्यापीठाकडून उत्तरपत्रिका तपासणी सुरू असून, अजूनही ७ निकाल जाहीर झालेले नाहीत. उत्तरपत्रिका एका गठ्ठ्यातून दुसºया गठ्ठ्यात गेल्याने, पुढचे निकाल लावण्यास विद्यापीठाला विलंब होत आहे, तर दुसरीकडे निकाल लागलेल्या विद्यार्थ्यांचेही हाल सुरू आहेत. कारण विधि अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले असले, तरी हजारो विद्यार्थी ‘पुराव्याचा कायदा’ या विषयात नापास झाल्याने, पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाचा प्रश्न उद्भवला आहे.विधि अभ्यासक्रमाच्या तीन व पाच वर्षे अभ्यासक्रमांतील ‘पुराव्याचा कायदा’ या विषयात हजारो विद्यार्थी नापास झाले आहेत. विशेष म्हणजे, इतर विषयांत विद्यार्थ्यांना ५० ते ६० गुण मिळाले असताना, एकाच विषयात १०, १५ ते २५, ३० असे गुण देण्यात आले आहेत. यामध्ये गेल्या परीक्षेतील टॉपर्स असलेले विद्याथीर्ही नापास झाले आहेत. त्यामुळे हा प्रकार संशयास्पद असल्याचे मत, स्टुडंट लॉ कौन्सिचे अध्यक्ष सचिन पवार यांनी व्यक्त केले.विधि अभ्यासक्रमाचे निकाल लागल्यापासून गोंधळ सुरूच आहे. विधि अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची मुदत १६ सप्टेंबरला संपत आहे, पण एकाच विषयात विद्यार्थी नापास झाल्यामुळे, आता या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, यासाठी फेरतपासणी व्हावी, या मागणीने आता जोर धरला आहे. त्यातच अजूनही ७ निकाल लागणे बाकी असून, आता उत्तरपत्रिका तपासणीचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे आता निकाल लागणार कधी, पुढील प्रवेशाचे काय, अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहे.प्राचार्यांचे परीक्षा नियंत्रकांना पत्रआॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा फटका सर्वच अभ्यासक्रमांना बसला आहे. त्यातही विधि अभ्यासक्रमाचे घाईघाईत लावलेल्या निकाचा फटका शासकीय विधि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही बसला आहे. शासकीय महाविद्यालयातील ४५० पैकी तब्बल १११ विद्यार्थी हे संबंधित एकाच विषयात नापास झाले आहेत. त्यामुळे प्राचार्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांना पत्र लिहून ही बाब लक्षात आणून दिली आहे. याबाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एलएलएम अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी अनिवार्य असलेल्या सीईटीत विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, पण विधिच्या पदवी अभ्यासक्रमात नापास झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करावी. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना एलएलएम अभ्यासक्रमासाठी तात्पुरता प्रवेश द्यावा. या संदर्भात प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पत्र दिले आहे.- सचिन पवार, अध्यक्ष स्टुडंट लॉ कौन्सिल

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठMumbaiमुंबईStudentविद्यार्थी