शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

कुंभमेळ्याला अडीच हजार कोटी अन् पूरग्रस्तांना १५४ कोटींची मदत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 18:07 IST

पूरग्रस्त भागात अनेक लोक आपली घरं सोडून छावण्यांमध्ये राहत आहेत. अनेकांची घरही वाहुन गेली आहेत. या पीडितांना पुन्हा संसार उभारण्यासाठी भरघोस मदतीची गरज आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च करणाऱ्या सरकारने पूरग्रस्तांच्या संसार उभारणीसाठीचे पॅकेज वाढवावे ही माफक इच्छा पीडितांची आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर अनेक अंशी राजकारणाच्या व्याख्या बदलल्या आहेत. या बदलांकडे सकारात्मकतेने पाहिल्यास देश आधुनिकतेची कास धरतोय, असंच दिसत. जटील समस्यांवर निर्णय घेतले जात आहेत. ही नव्या भारताची नांदीच म्हणावी लागले. परंतु, अजुनही काही बाबींवर काम होणे गरजेचे आहे. महापुरातील विस्थापितांसाठी जाहीर झालेले पॅकेज आणि नाशिक येथील कुंभमेळ्यामध्ये खर्च करण्यात आलेल्या रक्कमेत मोठा दुजाभाव दिसून येतो. हा दुजाभाव संपुष्टात आणण्याची आज गरज आहे.

गेल्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात महापूर आला. या महापुरामुळे हजारो लोकांचे संसार देशोधडीला लागले. अनेकांच्या संसाराचा गाडा पाच ते दहा वर्षांनी मागे गेला. या परिस्थितीत पिडीतांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. मात्र या आपत्तीत प्रशासन आणि सरकार काही प्रमाणात मागे राहिलं अशी ओरड होत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारीत एक चित्रपट आला होता. त्या चित्रपटात एक वाक्य मनाला शिवून गेलं होतं. ते म्हणजे 'ये नया इंडिया है', पण हे वाक्य चित्रपटापुरतच राहिलं का, अस वाटत आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरात अनेकांना जीव गमवावा लागला. तर हजारो लोकांच्या संसाराची वाताहत झाली. पुरग्रस्तांना सरकारकडून १५४ कोटी रुपये मदत जाहीर करण्यात आली. यानुसार कुटुंबाला प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात येणार आहे. ही मदत फारच तोकडी आहे. याउलट २०१५ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी याच सरकारने सुमारे अडीच हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. भक्तीसाठी सरकार अडीच हजार कोटींचा निधी देते, मात्र पुरग्रस्तांचे विस्थापित झालेले संसार उभारण्यासाठी केवळ १५४ कोटी रुपये, नव्या भारतात पूरग्रस्तांसोबत असा दुजाभाव का, असा प्रश्न उपस्थित होतो.

पूरग्रस्त भागात अनेक लोक आपली घरं सोडून छावण्यांमध्ये राहात आहेत. अनेकांची घरही वाहुन गेली आहेत. या पीडितांना पुन्हा संसार उभारण्यासाठी भरघोस मदतीची गरज आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करणाऱ्या सरकारने पूरग्रस्तांच्या संसार उभारणीसाठीचे पॅकेज वाढवावे हिच माफक इच्छा महापूर पीडितांची आहे.