शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Maharashtra Political Crisis : ...तरीही ‘त्या’ आमदारांचे निलंबन होणारच - राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 10:47 IST

न्यायालयाच्या निकालामुळे मिळालेल्या वेळेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू, असे सांगून संजय राऊत म्हणाले की,  जे काही बंडखोर आमदार वागले आहेत, ते योग्य नाही.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांना मुदत दिली आहे. न्यायालयाबद्दल आम्हांला आदर आहे; पण महाराष्ट्राची जनता या बंडखोर आमदारांना माफ करणार नाही. या मुदतीनंतर आमदारांचे निलंबन होणारच, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे मिळालेल्या वेळेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू, असे सांगून संजय राऊत म्हणाले की,  जे काही बंडखोर आमदार वागले आहेत, ते योग्य नाही. कायद्याच्या मंदिरात गेल्यानंतर तारीख पे तारीख चालत राहील. हे आमदार जेव्हा मुंबईत येतील, तेव्हा त्यांच्यासोबत नीट बोलणे करता येईल. निलंबन त्यांनी तूर्तास टाळले आहे; मात्र ते होणारच. त्यात बदल होणार नाही. स्वत:ला शिवसेनेचे वाघ म्हणवतात; मग त्यांना मुंबईत यायला भीती का वाटते?  असाही प्रश्न राऊत यांनी केला. तसेच, ४० बॉड्यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचेही राऊत म्हणाले. ‘ज्यांचा आत्मा मेला आहे, अशा लोकांची शरीरे या ठिकाणी येतील,’ असे मी म्हटले होते. त्याचा विपर्यास केला गेला. ईडीच्या नोटिसीबाबत विचारले असता, ‘हा तपास यंत्रणांचा गैरवापरच आहे. मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, तरीही नोटीस दिली जाते आहे. याबाबत कोण सूचना देत आहे, याची मला कल्पना आहे. या लोकांना विरोधकच संपवायचे आहेत. जे काही चाललंय ते चुकीचं आहे,’ असे राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे