शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते - नीलम गोऱ्हे

By admin | Updated: October 7, 2016 19:38 IST

कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा अमानुषपणे खून करणाऱ्या आरोपींवर तातडीने आरोपपत्र दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, आरोपींच्या सर्व चाचण्या

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 07 -  कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा अमानुषपणे खून करणाऱ्या आरोपींवर तातडीने आरोपपत्र दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, आरोपींच्या सर्व चाचण्या व अहवाल येण्यास वेळ लागला. त्यामुळे आरोपींवर आरोपपत्र दाखल होण्यास उशीर झाला असला तरी सरकार याबाबत गंभीर आहे. या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते, असा विश्वास शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी सांगलीत व्यक्त केला.विधानपरिषद विशेषाधिकार समितीच्या बैठकीच्या निमित्ताने आ. गोऱ्हे सांगली दौऱ्यावर होत्या. या समितीच्या कामकाजाची माहिती त्या पत्रकारांना देत असतानाच कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर दोषारोपपत्र दाखल झाल्याचे वृत्त धडकल्याने त्यांनी यावर भूमिका स्पष्ट केली.गोऱ्हे म्हणाल्या की, पोलिस महासंचालकांच्या अहवालानुसार पंधरा दिवसात आरोपींवर दोषारोप दाखल होणे अपेक्षित होते मात्र, डीएनए चाचणीसह अन्य अहवाल येण्यास उशीर झाल्याने दोषारोपपत्रास विलंब झाला असला तरी सरकार या घटनेबाबत गंभीर असल्याने आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. या खटल्याचे विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आहे.राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत त्या म्हणाल्या की, विद्यमान सरकारच्या कालावधीत गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी केवळ सहा टक्क्यांवर असलेले हे प्रमाण आता ३० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सांगली आणि मुंबईमध्ये तर शिक्षेचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने कायद्याचे राज्य स्थापित करण्यात सरकार यशस्वी झाले आहे.शिवसेना भेकड नाहीदसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी मराठा समाजाची माफी मागून मराठा समाजाचा राग कमी करण्याचा प्रयत्न केला, हा विरोधकांचा आरोप चुकीचा असून उलट ठाकरे यांनी ददिलगिरी व्यक्त केल्याने जनतेसमोर आपण नम्र आहोत, हेच दिसून आले आहे. विरोधकांच्या आरोपांमुळे दसरा मेळाव्याला बाधा पोहचणार नसून असे हजारो मेळावे शिवसेना घेतच राहील. विरोधकांच्या आरोपांना घाबरण्याएवढी शिवसेना भेकड नाही, असे आ. गोऱ्हे म्हणाल्या.