शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'प्रत्येकाने त्याग केल्यानेच हे सरकार झाले'; भरत गोगावलेंच्या विधानावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 16:08 IST

भरत गोगावलेंच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे आमच्या जिवावर मुख्यमंत्री झाले आहेत, असे विधान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी येथे केले. एकाने पत्नी आत्महत्या करेल, दुसऱ्याने राजीनामा देतो, तर तिसऱ्याने नारायण राणे संपवतील, अशी गळ तीन आमदारांनी मुख्यमंत्र्यांना घातली. त्यामुळे पेचात पडलेल्या मुख्यमंत्र्यांना संबंधित आमदारांना मंत्रिपद द्या असे सांगून मी आजपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहिल्याची खंत देखील भरत गोगावले यांनी बोलून दाखवली. 

भरत गोगावलेंच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची मुख्यंमंत्र्यांसोबत काय व कशी चर्चा झाली मला माहित नाही. पण प्रत्येकाने त्याग केल्यानेच हे सरकार झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल प्रत्येकाच्या भावना मजबूत होत्या. मी काम करणारा व्यक्ती म्हणूण त्यांच्याकडे पाहतो, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. तसेच मी थांबून जातो यांना मंत्री करा या भूमिका घेतल्यानेच गोगावले मागे राहिल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. 

दिव्यांग मंत्रालय स्थापन झाल्यावर मला दिव्यांग मंत्रालय अभियानाचा प्रमुख केल आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन दिव्यांगांच्या तक्रारी ऐकून त्यावर तज्ञांकडून कायमस्वरूपी धोरण आखण्यासाठी 3 डिसेंबर पर्यंत आणायचं आमचं प्रयत्न राहील. इथून पुढे दिव्यांगांसाठी सरकार जागोजागी कसं त्यांच्यासोबत उभं राहील यासाठी आमचे प्रयत्न आहे, अशं बच्चू कडू म्हणाले. 

भरत गोगावले कोण आहेत?

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नेत्यांपैकी एक भरत गोगावले आहेत. सरपंच ते आमदार आणि आता शिवसेनेतील बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद असा प्रवास भरत गोगावलेंचा आहे. २००९ नंतर २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन वेळा भरत गोगावले महाड मतदारसंघात शिवसेनेचं आमदार म्हणून प्रतिनिधित्त्व करत आहेत. शेतकरी कामगार पक्षाचा सुद्धा एक गड रायगड जिल्ह्यात आहे. असं असतानाही भरत गोगावलेंनी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवली आणि महाडमध्ये आपले पाय रोवले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदे