शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांना’ आजही रस्ता, वीज, पाणी नाही!

By admin | Updated: November 3, 2016 01:33 IST

ब्रिटिश राजवटीत काही विमुक्त जाती-जमाती या गुन्हेगार म्हणून ओळखल्या जात होत्या.

कळस : ब्रिटिश राजवटीत काही विमुक्त जाती-जमाती या गुन्हेगार म्हणून ओळखल्या जात होत्या. या कायद्यांतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या लोकांना कारागृहात बंदिस्त करण्यात आले होते. आजही या जाती-जमाती अतिशय मागासलेल्या आहेत. अजूनही त्यांचा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक विकास होऊ शकलेला नाही. कडबनवाडी (ता. इंदापूर) येथील गावकुसाबाहेर राहणाऱ्या रामोशी या भटक्या विमुक्त जातीतील नागरिक आजही रस्ता, वीज व पाणी या मूलभूत सुविधांपासून वंचितच आहेत.या ठिकाणी खोमणे, भंडलकर, जाधव, चव्हाण, मदने व बोडरे या आडनावांची सुमारे ९० कुटुंबे गेली काही दशके राहत आहेत. काही कुटुंबांकडे असणाऱ्या थोड्याफार कोरडवाहू शेतीवर हा समाज उदरनिर्वाह करतो. मात्र, अनेक कुटुंबांकडे शेती नसल्याने मोलमजुरी करावी लागते. अनेक कुटुंबांकडे राहायला पक्के घर नाही. सुमारे ५०० लोकवस्ती असलेल्या या समाजात उचशिक्षित कोणीही नाही. लढाऊ आणि शूर असलेला हा समाज विकासापासून अद्याप खूप दूर आहे. महाराष्ट्रातून स्वातंत्र्यानंतर जे रामोशी आंध्रात गेले, त्यांचा समावेश आदिवासींमध्ये झाला. कर्नाटकातही वाल्मीकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच रामोशी समाजाला आदिवासींचा दर्जा देण्यात आला, तर महाराष्ट्रात मात्र हा समाज गुन्हेगार जमात म्हणूनच ओळखला जाऊ लागला.रामोशी लोक स्वत:ला रामवंशी म्हणवितात. आॅगस्ट १९५१मध्ये सोलापूर येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तारेचे कुंपण मोडून इंग्रजांनी गुन्हेगारी ठरवलेल्या या जमातीला मुक्त केले. तेव्हापासून ‘विमुक्त’ म्हणून ओळखली जाऊ लागले. १९६१मध्ये १४ जातींना विमुक्त व २८ भटक्या जाती-जमातींची स्वतंत्र यादी करून आरक्षण दिले. मात्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांत आदिवासी वर्गात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यांना तिकडे सोयीसवलती मिळतात. महाराष्ट्रातला हा समाज मात्र यापासून वंचितच आहे. (वार्ताहर)>मोठी लोकवस्ती आहे. आजही विज, पाणीपुरवठ्याची सोय नाही. शेळगाव-कळस रस्त्यावर वाहतुकीची सोय नाही. येथील समाज मंदिरही अर्धवट अवस्थेत आहे. गावगाड्यात सामावून घेतले जात नाही. इतर समाजाप्रमाणे आम्हाला सुविधा मिळत नाहीत. गारपिटीत आमच्या समाजाची सुमारे ७ घरे पडली होती. मात्र, आजही पाठपुरावा करून दखल घेतली जात नाही. आजही अनेक लोकांना राहायला घरासाठी जागा नाही. गावपातळीवरील राजकारणामुळे वंचित राहावे लागत आहे. - महेश खोमणे,