शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ते जगताहेत वंचिताचं जगणं..!

By admin | Updated: June 7, 2015 02:47 IST

विठ्ठला तुझे धन अपार करील नामाचा व्यापार , तुझे धन सरता सरेना किती घेता मन हे भरेना ,

रमेश भोसले, औरंगाबाद - 

विठ्ठला तुझे धन अपार करील नामाचा व्यापार ,तुझे धन सरता सरेना किती घेता मन हे भरेना ,पंढरपूरचा तु सावकार ..करील नामाचा व्यापार ..,गल्लो गल्ली चाळीबोळी घ्या हो घ्या हो देतो आरोळी ..गाढला संतांचा बाजार ..करील नामाचा व्यापार ..खंजिरीवर नाजुक बोटांची खणखणीत थाप देऊन विठ्ठलनामाचा महिमा शाहिरी अंदाजात पेश करताना असंख्य रसिकांना खिळवून ठेवलं आहे ते लोककलावंत मीरा उमप यांनी. वडील वामन उमप यांच्याकडून मिळालेला वारसा पुढे चालू ठेवत अवघ्या महाराष्ट्रभर पारंपरिक लोककलेचं लेणं आपल्या भारूड, भजन, गवळण, गाणी यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पाच दशकांपासून त्या करीत आहेत. निरक्षर असलेल्या मीराताई यांनी सतत साक्षरतेचा वसा गावागावांत पोहोचविला आहे. दिल्ली, मुंबई यांसारख्या महानगरांमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या बहारदार खंजिरी वादनाचे कौतुक केले असून, अनेक नाट्य आणि साहित्य संमेलनेही त्यांनी गाजवली आहेत. मात्र ‘गेल्या सहा महिन्यांपासून कुठलाच कार्यक्रम झालेला नाहीये. राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार, व्यसनमुक्ती पुरस्कार, संत गाडगेबाबा पुरस्कार असे एक ना अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत़ पण मग पुरस्कारांनी पोट भरतं का,’ असा प्रतिप्रश्न त्या विचारतात. राज्य शासनाच्या वतीने अनेक कलाकारांना मानधन दिले जाते़ पण, जे खरे कलाकार पोटाला चिमटा काढून आपली कला जोपसतात त्यांना यापासून वंचित ठेवले जात असल्याची खंत मीरातार्इंनी बोलून दाखविली. लोककलेला लोकाश्रय मिळण्याची गरज असून, कलाकारांची कदर होत नसल्याचे त्या सांगतात.वास्तूशांती, बारसे यासारखे छोटे-मोठे कार्यक्रम करून आपल्या सोबत असलेल्या बारा- तेरा सहकलाकारांचं पथक सांभळतांना ओढाताण होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रम नसल्याने कुठेही देवळात, शाळेत कार्यक्रम सादर करून लोकांनी केलेली मदत घेऊनच आला दिवस मागे लोटण्याची वेळ आली आहे. विटभट्टीवर काम करून ऊसतोडणी करताना उसाच्या फडातच तालीम केली असल्याचे त्या सांगायला विसरल्या नाहीत. कार्यक्रम नसले तर कानाकोपऱ्यात धिमडी वाजवित बसले तर तेवढेच लोक पाहतील आणि घरी जातील. लोककलेला लोकाश्रय मिळण्याची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.उद्याच्या भाकरीची चिंता...ज्या ठिकाणी रंगमंचावर कार्यक्रम सादर करत असताना समोरील रसिकांना पाहून आपण अपार धनसंपत्तीचे मालक असल्याचे वाटते.. पण जशी पावलं घराची वाट चालायला लागतात ना तसं उद्याच्या भाकरीची चिंता वाढायला लागते... अन् तार्इंचा कंठ दाटतो!