शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

ते जगताहेत वंचिताचं जगणं..!

By admin | Updated: June 7, 2015 02:47 IST

विठ्ठला तुझे धन अपार करील नामाचा व्यापार , तुझे धन सरता सरेना किती घेता मन हे भरेना ,

रमेश भोसले, औरंगाबाद - 

विठ्ठला तुझे धन अपार करील नामाचा व्यापार ,तुझे धन सरता सरेना किती घेता मन हे भरेना ,पंढरपूरचा तु सावकार ..करील नामाचा व्यापार ..,गल्लो गल्ली चाळीबोळी घ्या हो घ्या हो देतो आरोळी ..गाढला संतांचा बाजार ..करील नामाचा व्यापार ..खंजिरीवर नाजुक बोटांची खणखणीत थाप देऊन विठ्ठलनामाचा महिमा शाहिरी अंदाजात पेश करताना असंख्य रसिकांना खिळवून ठेवलं आहे ते लोककलावंत मीरा उमप यांनी. वडील वामन उमप यांच्याकडून मिळालेला वारसा पुढे चालू ठेवत अवघ्या महाराष्ट्रभर पारंपरिक लोककलेचं लेणं आपल्या भारूड, भजन, गवळण, गाणी यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पाच दशकांपासून त्या करीत आहेत. निरक्षर असलेल्या मीराताई यांनी सतत साक्षरतेचा वसा गावागावांत पोहोचविला आहे. दिल्ली, मुंबई यांसारख्या महानगरांमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या बहारदार खंजिरी वादनाचे कौतुक केले असून, अनेक नाट्य आणि साहित्य संमेलनेही त्यांनी गाजवली आहेत. मात्र ‘गेल्या सहा महिन्यांपासून कुठलाच कार्यक्रम झालेला नाहीये. राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार, व्यसनमुक्ती पुरस्कार, संत गाडगेबाबा पुरस्कार असे एक ना अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत़ पण मग पुरस्कारांनी पोट भरतं का,’ असा प्रतिप्रश्न त्या विचारतात. राज्य शासनाच्या वतीने अनेक कलाकारांना मानधन दिले जाते़ पण, जे खरे कलाकार पोटाला चिमटा काढून आपली कला जोपसतात त्यांना यापासून वंचित ठेवले जात असल्याची खंत मीरातार्इंनी बोलून दाखविली. लोककलेला लोकाश्रय मिळण्याची गरज असून, कलाकारांची कदर होत नसल्याचे त्या सांगतात.वास्तूशांती, बारसे यासारखे छोटे-मोठे कार्यक्रम करून आपल्या सोबत असलेल्या बारा- तेरा सहकलाकारांचं पथक सांभळतांना ओढाताण होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रम नसल्याने कुठेही देवळात, शाळेत कार्यक्रम सादर करून लोकांनी केलेली मदत घेऊनच आला दिवस मागे लोटण्याची वेळ आली आहे. विटभट्टीवर काम करून ऊसतोडणी करताना उसाच्या फडातच तालीम केली असल्याचे त्या सांगायला विसरल्या नाहीत. कार्यक्रम नसले तर कानाकोपऱ्यात धिमडी वाजवित बसले तर तेवढेच लोक पाहतील आणि घरी जातील. लोककलेला लोकाश्रय मिळण्याची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.उद्याच्या भाकरीची चिंता...ज्या ठिकाणी रंगमंचावर कार्यक्रम सादर करत असताना समोरील रसिकांना पाहून आपण अपार धनसंपत्तीचे मालक असल्याचे वाटते.. पण जशी पावलं घराची वाट चालायला लागतात ना तसं उद्याच्या भाकरीची चिंता वाढायला लागते... अन् तार्इंचा कंठ दाटतो!