शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वारकरी संप्रदाय 'त्यांना' समजलाच नाही; शरद पवारांचे वारकरी परिषदेला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 15:34 IST

शरद पवार हे हिंदूविरोधी असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रीय वारकरी परिषदेने केला होता. शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत; त्यांना कार्यक्रमाला बोलावू नका, असं पत्रकच राष्ट्रीय वारकरी परिषदेनं प्रसिद्धीला दिलं होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्याला पवारांनी चोख प्रत्युत्तर दिले. 

मुंबई - आपण प्रसिद्धीसाठी राजकारण करत नाही. कोणताही हेतू मनात ठेवून इथं आलो नाही. पंढरपूर, देहू आणि आळंदीला नेहमी येत असतो. मात्र याच प्रदर्शन करण्याचा माझा हेतू नसतो. तुम्हाला यायला परवानगी नाही, असं कोणी सांगत असेल तर त्यांना वारकरी संप्रदाय समजलाच नाही, असा टोला शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला लगावला आहे. 

शरद पवार हे हिंदूविरोधी असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रीय वारकरी परिषदेने केला होता. शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत; त्यांना कार्यक्रमाला बोलावू नका, असं पत्रकच राष्ट्रीय वारकरी परिषदेनं प्रसिद्धीला दिलं होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्याला पवारांनी चोख प्रत्युत्तर दिले. 

कीर्तन परंपरेला आकार देण्यासाठी आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करणाऱ्या विष्णुपंत जोग महाराजांच्या शतकोत्तर पुण्यस्मरण सोहळ्यात ते बोलत होते. मला विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला, तुकोबांच्या दर्शनाला देहूला, माऊलीच्या दर्शनला आळंदीला यायंच असतं. त्यासाठी मला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. मात्र कोणी सांगत असेल तुम्हाला यायची परवानगी नाही, तर त्यांना वारकरी संप्रदायच समजला नाही, अशी टीका शरद पवारांना राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या त्या पत्रकावर केली. 

आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जबाबदारी घेतली. तसेच इंद्रायणी स्वच्छतेचे पवार घराण्याचे कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इंद्रायणीची स्वच्छता होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.